शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘संथारा’ बंदीविरुद्ध यवतमाळात सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा

By admin | Updated: August 22, 2015 02:35 IST

जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

२४ आॅगस्टला आयोजन : भारत बंदमध्ये सहभाग यवतमाळ : जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यामुळे जैनधर्मीयांच्या भावना दुखावल्या असून न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी यवतमाळातील सकल जैन समाजाच्यावतीने २४ आॅगस्ट रोजी मूक व शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील राजेंद्रनगर स्थित मावजी देवजी निसर जैन स्थानकातून सकाळी ९.३० वाजता शांती मोर्चाला प्रारंभ होणार आहे. गुरु महाराज जिनेंद्र मुनी आदी संत आणि सतींचा आशीर्वाद घेऊन हा मोर्चा स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस चौक, एलआयसी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले जाणार आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. या दिवशी जैनधर्मीयांची प्रतिष्ठाने बंद राहतील. तसेच शाळेतील जैन विद्यार्थी व नोकरीतील जैन कर्मचारी देखील विरोध नोंदविण्यासाठी या दिवशी सुटी घेणार आहे. जैन धर्मामध्ये आत्मा आणि शरीर वेगवेगळे मानले जाते. आत्मकल्याणाला प्राथमिकता दिली असून शरीराला केवळ आत्मकल्याणाचे माध्यम मानले गेले आहे. शरीराच्या माध्यमातून मानव साधना करून उच्चत्तम श्रेणी प्राप्त करू शकतो. साधकाला उच्चत्तम श्रेणीत जाण्यासाठी मोह त्यागने अत्यावश्यक आहे. बाह्य साधनांनी मोह दूर सारताना शरीराचा मोह ही हटवावा लागतो. तेव्हाच मनुष्य पूर्ण साधनेत रममाण होतो आणि याच मानवी अवस्थेला संथारा असे म्हटले जाते. ही संपूर्ण संतुष्ट होण्याची स्थिती आहे. याला कदापिही आत्महत्या म्हटले जाऊ शकत नाही. आत्महत्या राग, मोह, लोभ, छलकपट आदी बाबींमुळे केली जाते. या वाईट गोष्टींचा त्याग करणे हा जैन धर्माचा उद्देश आहे आणि यासाठी संथारा अतिशय आवश्यक आहे. परंतु उच्च न्यायालयाने संथारा व्रत परंपरेवर बंदी आणली आहे. या निर्णयामुळे जैनधर्मीयांमध्ये तीव्र भावना उमटत आहे. या निकालाविरोधात आयोजित मूक मोर्चा आणि भारत बंदमध्ये जैनधर्मीय पुरुष, महिला, तरुण, तरुणी आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी पुरुषांनी पांढरा ड्रेस व महिलांनी चुनरीची साडी घालून सहभागी व्हावे तसेच जिल्ह्यातील सर्व जैन बांधवांनी आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्याचे आवाहनही सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)