शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

‘संथारा’ बंदीविरुद्ध यवतमाळात सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा

By admin | Updated: August 22, 2015 02:35 IST

जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

२४ आॅगस्टला आयोजन : भारत बंदमध्ये सहभाग यवतमाळ : जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यामुळे जैनधर्मीयांच्या भावना दुखावल्या असून न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी यवतमाळातील सकल जैन समाजाच्यावतीने २४ आॅगस्ट रोजी मूक व शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील राजेंद्रनगर स्थित मावजी देवजी निसर जैन स्थानकातून सकाळी ९.३० वाजता शांती मोर्चाला प्रारंभ होणार आहे. गुरु महाराज जिनेंद्र मुनी आदी संत आणि सतींचा आशीर्वाद घेऊन हा मोर्चा स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस चौक, एलआयसी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले जाणार आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. या दिवशी जैनधर्मीयांची प्रतिष्ठाने बंद राहतील. तसेच शाळेतील जैन विद्यार्थी व नोकरीतील जैन कर्मचारी देखील विरोध नोंदविण्यासाठी या दिवशी सुटी घेणार आहे. जैन धर्मामध्ये आत्मा आणि शरीर वेगवेगळे मानले जाते. आत्मकल्याणाला प्राथमिकता दिली असून शरीराला केवळ आत्मकल्याणाचे माध्यम मानले गेले आहे. शरीराच्या माध्यमातून मानव साधना करून उच्चत्तम श्रेणी प्राप्त करू शकतो. साधकाला उच्चत्तम श्रेणीत जाण्यासाठी मोह त्यागने अत्यावश्यक आहे. बाह्य साधनांनी मोह दूर सारताना शरीराचा मोह ही हटवावा लागतो. तेव्हाच मनुष्य पूर्ण साधनेत रममाण होतो आणि याच मानवी अवस्थेला संथारा असे म्हटले जाते. ही संपूर्ण संतुष्ट होण्याची स्थिती आहे. याला कदापिही आत्महत्या म्हटले जाऊ शकत नाही. आत्महत्या राग, मोह, लोभ, छलकपट आदी बाबींमुळे केली जाते. या वाईट गोष्टींचा त्याग करणे हा जैन धर्माचा उद्देश आहे आणि यासाठी संथारा अतिशय आवश्यक आहे. परंतु उच्च न्यायालयाने संथारा व्रत परंपरेवर बंदी आणली आहे. या निर्णयामुळे जैनधर्मीयांमध्ये तीव्र भावना उमटत आहे. या निकालाविरोधात आयोजित मूक मोर्चा आणि भारत बंदमध्ये जैनधर्मीय पुरुष, महिला, तरुण, तरुणी आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी पुरुषांनी पांढरा ड्रेस व महिलांनी चुनरीची साडी घालून सहभागी व्हावे तसेच जिल्ह्यातील सर्व जैन बांधवांनी आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्याचे आवाहनही सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)