शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

मोदी सरकारने सामान्य माणसांची फसगत केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:17 IST

‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखवून पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने या देशातील सामान्य माणसांची प्रचंड फसगत केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : वणीत पार पडली काँग्रेसची सभा, सरकारचा भर आॅनलाईनवर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखवून पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने या देशातील सामान्य माणसांची प्रचंड फसगत केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे केला.सोमवारी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. देशात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या रोखण्यासाठी मोदी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही. सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची थाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारली होती. मात्र या विषयातही शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे ते म्हणाले. लोकांनी तुम्हाला विश्वास ठेऊन सत्तेवर पाठविले. परंतु जनतेची तुम्ही फसवणूक केली. हे सरकार संवदेनहिन असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या देशात मोठ्या उद्योगपतींना कर्ज दिले जाते. परंतु या उद्योगपतींनी कर्ज बुडविल्याने आता सामान्य माणसालाही कर्ज मिळणे कठीण झाले आहे. या सरकारचा आॅनलाईनवर भर आहे, परंतु हे सरकारच आॅफलाईन झाले असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, चंद्रकांत हांडोरे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र लोढा, माजी आमदार वामनराव कासावार व बाळू धानोरकर यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर कडवी टिका केली. संचालन विवेक मांडवकर यांनी केले, तर आभार प्रमोद निकुरे यांनी मानले. सकाळी १० वाजताच्या या सभेला अशोक चव्हाण तब्बल साडेपाच तास विलंबाने उपस्थित झाले. व्यासपिठावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार सुभाष धोटे, अ‍ॅड.देविदास काळे, मुनाफ हकीम आदी उपस्थित होते.