शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

मोबाईल वापरामुळे मुलांवरील तणाव वाढला; पालकांसमोर नवी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 14:09 IST

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल हाताळण्याचे प्रमाणही वाढले आहे. बाल मनावरील तणाव व त्यांचा चिडचिडेपणा वाढत चालला असून, ही एक नवी समस्या पालकांसमोर निर्माण झाली आहे.

 यवतमाळ : कोरोना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यांना मोकळ्या वातावरणात खेळायला मिळत नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांचे मोबाईल हाताळण्याचे प्रमाणही वाढले आहे. बाल मनावरील तणाव व त्यांचा चिडचिडेपणा वाढत चालला असून, ही एक नवी समस्या पालकांसमोर निर्माण झाली आहे. याला डॉक्टरांनीसुद्धा दुजोरा दिला आहे.

मार्च २०२०पासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. काेराेना संक्रमण कमी न झाल्याने शासनाच्या आदेशान्वये वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांसमोर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय ठेवण्यात आला. मुलांनी घरात बसून मोबाईलवर शिक्षण घेतले व परीक्षाही दिली. या काळात काेराेना संक्रमण कमी-अधिक होत राहिल्याने शालेय मुलांना घराबाहेर खेळायला पाठवणेही दुरापास्त झाले. मैदानावर मोकळ्या वातावरणात मुक्तपणे खेळणे शक्य नसल्याने तसेच घरी कोणी समवयस्क खेळायला येत नसल्याने मुले वेळ घालवण्यासाठी बराच काळ टीव्ही बघणे, मोबाईलवर गेम खेळणे, याच बाबी करायला लागले. पालकांसमोर दुसरा पर्याय उरला नाही. या प्रकारामुळे बालमनावरील तणाव अप्रत्यक्षरित्या वाढत गेल्याने चिडचिड, भांडण वाढले आहे. या बाबीला डॉक्टरांनीसुद्धा दुजोरा दिला आहे.

बाल मनावर दीर्घकाळ असलेल्या तणावामुळे आरोग्यावर याचा विपरित होण्याची शक्यता आहे. मुलांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी पालकांनी तसेच घरातील मंडळींनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्यांच्याकडे मोबाईल देऊन दुर्लक्ष करू नये, त्यांच्याशी सतत गप्पा-गोष्टी कराव्या, त्यांच्यासोबत लहान-मोठे खेळ, खेळाविषयी त्यांचा उत्साह कायम टिकून राहील. तसेच त्यांना कंटाळवाणे वाटणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :MobileमोबाइलEducationशिक्षण