शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवर्समुळे नागरी आरोग्याला धोका

By admin | Updated: July 8, 2014 23:42 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे टॉवर्स आहेत. या टॉवर्समुळे नागरिकांना धोका होण्याची शक्यता वाढली आहे. आधुनिक युगात भ्रमणध्वनीला फार महत्व आले आहे. खेडोपाडी भ्रमणध्वनी पोहोचले आहे.

वणी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे टॉवर्स आहेत. या टॉवर्समुळे नागरिकांना धोका होण्याची शक्यता वाढली आहे.आधुनिक युगात भ्रमणध्वनीला फार महत्व आले आहे. खेडोपाडी भ्रमणध्वनी पोहोचले आहे. अगदी गुराख्याच्या हातातही भ्रमणध्वनी दिसून येत आहे. एकाच घरात अनेक भ्रमणध्वनी आहेत. अनेकांकडे तर दोन-दोन भ्रमणध्वनी आहेत. या भ्रमणध्वनीच्या कव्हरेजसाठी आता गावांमध्ये टॉवर्स उभारण्यात आले. आता हेच टॉवर्स नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.केंद्र शासनाने सन १९९६ मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा तयार केला. मात्र या कायद्याची सर्रास पायमल्ली होत आहे. या कायद्याने टॉवर्स उभारणीसाठी काही मागदर्शक तत्वे पाळण्याचे बंधन घातले आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या मतानुसार टॉवर्स व ब्रॉडबँड मशिनरीमधून निघणाऱ्या लहरींमुळे मानव, वनस्पती, प्राणी, पक्षी, मासे आणि सूक्ष्मजीवांवर पेशीय, उपपेशीय, रेणूविय, उपरेणूविय जैवरासायनिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या परिणामामुळे मानवाला कर्करोग, हृदयरोग, डोळ्यांचे व हाडांचे आजार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. टॉवर्समधील किरणोत्साराच्या लहरींमुळे बाळांना व्यंगत्व,आंधळेपणा येण्याची शक्यताही असते. टॉवर किमान २०० फूट उंचावर असले, तरी त्यातून निघणाऱ्या उच्च किरणोत्सार लहरी २०० फूट समांतर जमिनीस सिमेंट काँक्रीटच्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात. त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)