शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवर्समुळे धोका

By admin | Updated: February 9, 2015 23:21 IST

शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स उभे झाले आहेत. मात्र या टॉवर्समधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वणी : शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स उभे झाले आहेत. मात्र या टॉवर्समधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सध्याच काळ आधुनिकतेचा आहे. या युगात जग अत्यंत जवळ आले आहे. क्षणभरात लाखो किलोमीटर अंतरावरील व्यक्तीशी संवाद साधणे अत्यंत सहज आणि सोपे झाले आहे. त्यासाठी भ्रमणध्वनीला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी आता खेडोपाडी भ्रमणध्वनी पोहोचले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी पोहोचल्याने अगदी गुराख्याच्या हातातही भ्रमणध्वनी दिसून येतो. गावोगावी एकाच घरात अनेक भ्रमणध्वनी असल्याची उदाहरणेही आहेत. काहींकडे तर दोन-दोन भ्रमणध्वनी आहेत. भ्रमणध्वनीच्या ‘कव्हरेज’साठी अनेक गावांमध्ये टॉवर्स उभारण्यात आले आहेत. हेच टॉवर्स ग्रामस्थांसाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या टॉवर्समार्फतच संबंधित भ्रमणध्वनी कंपनी आपल्या ग्राहकांना सेवा पुरविते. त्यातून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो. सोबतच इतर पशु, पक्षांवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. केंद्र सरकारने सन १९९६ मध्ये नवीन पर्यावरण संरक्षण कायदा अस्तित्वात आणला आहे. तथापि, या कायद्याची टॉवर्स उभारताना सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. या कायद्यानुसार टॉवर्स उभारणीसाठी काही मागदर्शक तत्वे पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या सूचनेनुसार टॉवर्स व ब्रॉडबँड मशिनरीमधून निघणाऱ्या लहरींमुळे मानव, वनस्पती, प्राणी, पक्षी, मासे आणि सूक्ष्मजीवांवर पेशीय, उपपेशीय, रेणूविय, उपरेणूविय जैवरासायनिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.या लहरींमुळे मानवाला कर्करोग, हृदयरोग, डोळ्यांचे व हाडांचे आजार होण्याची शक्यताही विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने वर्तविली आहे. टॉवर्समधून निघणाऱ्या किरणोत्साराच्या लहरींमुळे लहान बाळांना व्यंगत्व, आंधळेपणा येण्याची शक्यताही मंडळाने वर्तविली आहे. हे टॉवर २०० फूट उंच असले, तरी त्यातून निघणाऱ्या उच्च किरणोत्सार लहरी २०० फूट समांतर जमिनीस सिमेंट काँक्रीटच्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात, असे मंडळानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आता गावागावांत असे टॉवर्स उभे झाले आहे. भ्रमणध्वनी ही जीवनातील गरज झाली आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकाकडे भ्रमणध्वनी आला आहे. त्यावर अनेक ‘सोशीयल मीडिया’ची चलती आहे. फेसबुक, व्हॉटस् अप यासारख्यांचा वापर वाढला आहे. परिणामी भ्रमणधनी ही अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे. मात्र या भ्रमणध्वनीसाठी गावोगावी उभारण्यात येणारे टॉवर्स मानवी जीवनाला अपायकारक ठरण्याची शक्यता आहे. अनेक गावांमध्ये हे टॉवर्स विजेवर चालतात. वीज नसल्यास डिझेलचा वापर करण्यात येतो. त्यातूनही प्रदूषणाला चालना मिळते. त्यामुळे भ्रम्णध्वनी ही आवश्यक वस्तू झाली असतानाही त्याकडे जागृततेने बघण्याची गरज आहे. टॉवर्स किमान गावापासून दूर उभारण्यासाठी सर्वांनची प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)