शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आमदार एप्रिलपर्यंत ‘वेटींग’वर

By admin | Updated: November 20, 2014 22:58 IST

जिल्ह्यातील भाजपाच्या पाचही आमदारांना विकास निधीसाठी एप्रिलपर्यंत वेटींगवर रहावे लागणार आहे. कारण आमदार निधीचे दोन कोटी रूपये काँग्रेस आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण खर्च केले.

विकास निधी : काँग्रेस आमदारांनी दोन कोटींचा निधी निवडणुकीपूर्वीच केला खर्च राजेश निस्ताने - यवतमाळजिल्ह्यातील भाजपाच्या पाचही आमदारांना विकास निधीसाठी एप्रिलपर्यंत वेटींगवर रहावे लागणार आहे. कारण आमदार निधीचे दोन कोटी रूपये काँग्रेस आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण खर्च केले. यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी पाच जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. यापूर्वी या जागा काँग्रेसकडे होत्या. २०१४ च्या निवडणुकीत यवतमाळातून मदन येरावार, राळेगावमधून प्रा.डॉ.अशोक उईके, उमरखेडमधून राजेंद्र नजरधने, वणीतून संजीवरेड्डी बोदकुरवार तर आर्णी-केळापूरमध्ये राजू तोडसाम निवडून आले. यातील येरावार वगळता भाजपाचे अन्य चारही आमदार पहिल्यांदाच विधानसभेवर गेले आहेत. गेली महिनाभर हार-तुरे, सत्कारात निघून गेल्यानंतर आता हे आमदार विकास कामांचा विचार करीत आहेत. सत्कार घेणारी मंडळीही आपल्या गावाला, संस्थेला निधी मिळावा, आपली रस्ते, नाल्या, समाज मंदिर, प्रवासी निवारे आदी विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून आस लावून आहेत. सत्कार घेणाऱ्यांचा छूपा अजेंडा ओळखून आमदारही आश्वासन देण्यात कुठे कमी पडताना दिसत नाहीत. तुमच्या गावाचा सर्वागिण विकास करू, समस्या सोडवू, कायापालट करू असे भरीव आश्वासन ही आमदार मंडळी देत आहेत. मात्र प्रत्यक्षात या आमदारांकडे सध्या तरी कोणताही विकास निधी उपलब्ध नाही. या निधीसाठी त्यांना आणखी चार महिने अर्थात नव्या ‘बजेट इअर’ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारने प्रतीक्षेत न ठेवता विशेष निधीची काही तरी तरतूद करावी म्हणून भाजपा आमदारांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. आमदारांना आपल्या विधानसभा मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी शासन वर्षाकाठी दोन कोटी रुपयांचा निधी देते. हा निधी वर्षभरात खर्च केला जातो. त्यासाठी कधी नागरिक कामे सूचवितात तर कधी आमदार आपल्या सोईने कामांचे प्रस्ताव तयार करतात. बहुतांश आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मार्च महिन्यात अधिकाधिक कामांचे प्रस्ताव मंजूर केले जातात. परंतु यावर्षी भाजपाच्या पाच विद्यमान आमदारांवर तशी वेळच येणार नाही. कारण त्यांच्या मतदारसंघासाठीचा आमदार निधीच शिल्लक नाही. या पाचही मतदारसंघाचे नेतृत्व आधी काँग्रेसकडे होते. नंदिनी पारवेकर, वसंत पुरके, विजय खडसे, वामनराव कासावार, शिवाजीराव मोघे या काँग्रेस आमदारांनी विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वीच आपला सन २०१४-१५ वर्षासाठी तरतूद झालेला दोन कोटींचा वार्षिक निधी पूर्णत: खर्च केला. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या आमदारांना आता निधीसाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस आमदारांनी दोन कोटींच्या विकास निधीतून मंजूर केलेली कामे प्रत्यक्षात सुरू झाली की नाही, हा मात्र संशोधनाचा विषय ठरला आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहरराव नाईक तर दिग्रसला शिवसेनेचे संजय राठोड आमदार आहेत. त्यांनीही आपला बहूतांश निधी निवडणूकीपुर्वी खर्च केला. मात्र ते पुन्हा निवडून आल्याने त्यांची तेवढी अडचण होताना दिसत नाही.