शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

आमदार राजकारणात, शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: July 2, 2014 23:26 IST

जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातच मशगूल आहेत. इकडे पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर आहे,

यवतमाळ : जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातच मशगूल आहेत. इकडे पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर आहे, नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. मात्र या सर्वांना वाऱ्यावर सोडून नेते मंडळी बिनधास्त आहे. त्यांना मतदारराजा असलेल्या जनतेचे काहीच सोयरसूतक नाही, असेच सरसकट चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. जून महिना कोरडा गेला, जुलैचाही आठवडा संपायला आला. परंतु पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यात सव्वालाख हेक्टरवर पेरणी झाली. हे सर्व क्षेत्र पावसाअभावी धोक्यात आहे. त्यातही कपाशीचा पेरा अधिक आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेत पहिली पेरणी केली. परंतु आता पुन्हा पेरणीची सोय नाही आणि बँकही कर्ज देणार नाही. त्यामुळे सावकाराच्या दारी जाण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा अवघा काही दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहराची ही स्थिती आहे. आणखी आठवडाभर अशीच स्थिती राहिल्यास श्रीमंतांच्या वस्त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असे चित्र आहे. या वास्तवापासून जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी, लोकप्रतिनिधी मात्र जणू कोसोदूर असल्याचे दिसून येते. पावसाअभावी जिल्हाभर निर्माण झालेल्या या स्थितीवर बोलण्यास कुणालाही वेळ नाही. गेली कित्येक दिवस जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे दर्शन नाही. आता आर्णी तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवार ३ जुलैचा मुहूर्त ठरला आहे. परंतु यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता पालकमंत्री येणार की नाही याबाबत साशंकता आहे. पालकमंत्रीच नसल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकली नाही. जिल्ह्यातील कुण्याही मंत्री, आमदाराने या दुष्काळी स्थितीचा प्रशासनाकडून आढावा घेण्यासाठी एखादी बैठक बोलविण्याचे सौजन्य अद्याप दाखविलेले नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांच्या कुरघोड्या काढण्यातच व्यस्त आहे. तर विरोधी पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनाही जनतेच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अद्याप तरी सवड मिळालेली नाही. जिल्हा परिषद आणि प्रशासनाने तर टंचाईच्या उपाययोजनाही गुंडाळल्या. आता सरकारने त्याला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने पुन्हा या उपाययोजना बाहेर काढून खानापूर्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरही पदाधिकारी आमदारांचाच कित्ता गिरवत आहे. त्यांनाही शेतकऱ्यांचे सोयरसूतक नसल्याचे चित्र आहे. संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून केवळ निवडणुकांमध्ये मतासाठी ‘हात’ जोडणाऱ्या या नेत्यांना पुन्हा निवडून द्यायचे का, याचे चिंतन करण्याची वेळ जिल्हाभरातील नागरिकांवर आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)