शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महावितरणचा भोंगळ कारभार

By admin | Updated: August 9, 2014 23:58 IST

महावितरणचा कारभार आता चांगलाच ढेपाळला असून विजेच्या समस्यांनी ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. फिडरची कामे रखडल्याने कधीही वीज गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड

फीडर रखडले : अद्याप कामांना सुरूवातच नाही, ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोषवणी : महावितरणचा कारभार आता चांगलाच ढेपाळला असून विजेच्या समस्यांनी ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. फिडरची कामे रखडल्याने कधीही वीज गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. ग्राहकांच्या संतापाचा आता उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील महावितरणच्या ३७ पैकी तब्बल १६ फीडरचे काम अपूर्ण आहे. पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंत्याच्या अखत्यारीत हे तालुके येतात. या तीन तालुक्यात ३७ फीडर आहेत. मात्र त्यापैकी १६ फिडरची कामे अपूर्ण असल्याने विजेचा संपूर्ण भार २१ फिडरवर येत आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ओलितासाठी प्रयत्न केले. मात्र फिडरची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना ओलित करणेही कठीण झाले आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे पीक करपले. त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातच अचानक वीज गुल होण्याचे प्रमाण प्रचड वाढल्याने शेतकऱ्यांसह वीज ग्राहक प्रचंड संतापले आहेत. ग्राहकांच्या संतापाचा बांध कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासोबतच तीनही तालुक्यात योग्य दाबाचा वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे घरातील वीज उपकरणे शोभेचे ठरत आहे. मोटारपंप सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. तरीही महावितरण प्रचंड सुस्त आहे. रखडलेल्या फिडरच्या कामांना वेग देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली जात नाही. रखडलेल्या १६ फिडरपैकी नऊ फिडरची कामे सुरू झाल्याचे आत्तापर्यंत सांगण्यात येत होते. उर्वरित सात फिडरची कामे बंदच होती. मात्र सुरू झालेली कामेही रेंगाळली आहेत. कंत्राटदारांनी कामाला सुरूवातच केली नाही. तरीही महावितरण त्यांना काम सुरू करण्याबाबत निर्देश देत नाहीत. या सर्व प्रकारामुळे तीनही तालुक्यात विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. फिडरची कामे रेंगाळल्याने वीज ग्राहकांना नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)