शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा भोंगळ कारभार

By admin | Updated: August 9, 2014 23:58 IST

महावितरणचा कारभार आता चांगलाच ढेपाळला असून विजेच्या समस्यांनी ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. फिडरची कामे रखडल्याने कधीही वीज गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड

फीडर रखडले : अद्याप कामांना सुरूवातच नाही, ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोषवणी : महावितरणचा कारभार आता चांगलाच ढेपाळला असून विजेच्या समस्यांनी ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. फिडरची कामे रखडल्याने कधीही वीज गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. ग्राहकांच्या संतापाचा आता उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील महावितरणच्या ३७ पैकी तब्बल १६ फीडरचे काम अपूर्ण आहे. पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंत्याच्या अखत्यारीत हे तालुके येतात. या तीन तालुक्यात ३७ फीडर आहेत. मात्र त्यापैकी १६ फिडरची कामे अपूर्ण असल्याने विजेचा संपूर्ण भार २१ फिडरवर येत आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ओलितासाठी प्रयत्न केले. मात्र फिडरची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना ओलित करणेही कठीण झाले आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे पीक करपले. त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातच अचानक वीज गुल होण्याचे प्रमाण प्रचड वाढल्याने शेतकऱ्यांसह वीज ग्राहक प्रचंड संतापले आहेत. ग्राहकांच्या संतापाचा बांध कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासोबतच तीनही तालुक्यात योग्य दाबाचा वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे घरातील वीज उपकरणे शोभेचे ठरत आहे. मोटारपंप सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. तरीही महावितरण प्रचंड सुस्त आहे. रखडलेल्या फिडरच्या कामांना वेग देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली जात नाही. रखडलेल्या १६ फिडरपैकी नऊ फिडरची कामे सुरू झाल्याचे आत्तापर्यंत सांगण्यात येत होते. उर्वरित सात फिडरची कामे बंदच होती. मात्र सुरू झालेली कामेही रेंगाळली आहेत. कंत्राटदारांनी कामाला सुरूवातच केली नाही. तरीही महावितरण त्यांना काम सुरू करण्याबाबत निर्देश देत नाहीत. या सर्व प्रकारामुळे तीनही तालुक्यात विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. फिडरची कामे रेंगाळल्याने वीज ग्राहकांना नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)