शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

लाखो रुपयांचे सागवान बेवारस

By admin | Updated: August 28, 2016 00:10 IST

दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे सागवान वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बेवारस स्थितीत हे वृक्ष आहेत.

समूळ उखडली वृक्ष : दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र सावळीसदोबा : दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे सागवान वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बेवारस स्थितीत हे वृक्ष आहेत. वनविभागाकडून या वृक्षांची विल्हेवाट लावली जात नाही. या सागवानावर कधी हातआरी चालेल याची वाट तर वनविभागाचे अधिकारी पाहात नसावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रांतर्गत सावळीसदोबा विभागासह ३१ कक्ष आहेत. यामध्ये इचोरा, राणीधानोरा, कुऱ्हा, अंतरगावपर्यंत जवळपास २० किलोमीटर अंतरामध्ये दक्षिण आर्णी क्षेत्र आहे. या सर्व कक्षामध्ये कोट्यवधी रुपयांचे सागवान पडून आहे. मे आणि जूनमध्ये आलेल्या वादळामुळे १०० वर्षापूर्वींची झाडे कोसळलेली आहे. गेली तीन महिन्यांपासून याकडे वनविभागाने थोडेही लक्ष दिलेले नाही. दक्षिण आर्णी-सावळी वनक्षेत्रापासून विदर्भ-मराठवाडा ही सीमा शून्य किलोमीटरमध्ये आहे. या आधी दक्षिण आर्णीमधील चोरीचे सागवान मराठवाड्यातून जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह दोन वनपाल, दोन वनरक्षक आणि एका वनमजुरावर निलंबनाची कारवाई झाली होती. या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नव्याने रुजू झालेले उपवनसंरक्षक हिंगे यांनी दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र, सावळीसदोबा परिसरातील जंगलाची पाहणी करून उन्मळून पडलेल्या वृक्षांची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरून जातानाही ही वृक्ष सहज दृष्टीस पडतात. त्यावर चोरट्यांची नजर पडण्यापूर्वी विल्हेवाट लावली जावी, अशी मागणी आहे. कक्ष क्र. ७ व ८ ची परिस्थितीही दयनीय आहे. या भागात अनेक थुटं पाहावयास मिळतात. वनविभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)