शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

लाखो रुपयांचे सागवान बेवारस

By admin | Updated: August 28, 2016 00:10 IST

दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे सागवान वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बेवारस स्थितीत हे वृक्ष आहेत.

समूळ उखडली वृक्ष : दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र सावळीसदोबा : दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे सागवान वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बेवारस स्थितीत हे वृक्ष आहेत. वनविभागाकडून या वृक्षांची विल्हेवाट लावली जात नाही. या सागवानावर कधी हातआरी चालेल याची वाट तर वनविभागाचे अधिकारी पाहात नसावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रांतर्गत सावळीसदोबा विभागासह ३१ कक्ष आहेत. यामध्ये इचोरा, राणीधानोरा, कुऱ्हा, अंतरगावपर्यंत जवळपास २० किलोमीटर अंतरामध्ये दक्षिण आर्णी क्षेत्र आहे. या सर्व कक्षामध्ये कोट्यवधी रुपयांचे सागवान पडून आहे. मे आणि जूनमध्ये आलेल्या वादळामुळे १०० वर्षापूर्वींची झाडे कोसळलेली आहे. गेली तीन महिन्यांपासून याकडे वनविभागाने थोडेही लक्ष दिलेले नाही. दक्षिण आर्णी-सावळी वनक्षेत्रापासून विदर्भ-मराठवाडा ही सीमा शून्य किलोमीटरमध्ये आहे. या आधी दक्षिण आर्णीमधील चोरीचे सागवान मराठवाड्यातून जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह दोन वनपाल, दोन वनरक्षक आणि एका वनमजुरावर निलंबनाची कारवाई झाली होती. या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नव्याने रुजू झालेले उपवनसंरक्षक हिंगे यांनी दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र, सावळीसदोबा परिसरातील जंगलाची पाहणी करून उन्मळून पडलेल्या वृक्षांची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरून जातानाही ही वृक्ष सहज दृष्टीस पडतात. त्यावर चोरट्यांची नजर पडण्यापूर्वी विल्हेवाट लावली जावी, अशी मागणी आहे. कक्ष क्र. ७ व ८ ची परिस्थितीही दयनीय आहे. या भागात अनेक थुटं पाहावयास मिळतात. वनविभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)