शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

एमआयडीसीतील भूखंड जप्तीच्या मार्गावर

By admin | Updated: April 6, 2017 00:30 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग संजिवनी योजना २०१५ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील भूखंडधारकांना

अविकसित भूखंड निशाण्यावर : ३० एप्रिलर्यंत संजीवनी योजनेला दिली मुदतवाढ यवतमाळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग संजिवनी योजना २०१५ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील भूखंडधारकांना ३० एप्रिल २०१७ पर्यंत संजिवनी दिली आहे. या दरम्यान या योजनेचा लाभ न घेतल्यास जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील भूखंडांवर जप्तीची कारवाई निश्चित आहे. सध्या एमआयडीसीच्या ५० ते ५५ भूखंडांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान एमआयडीसी क्षेत्रातील ज्या भूखंडधारकांनी बांधकाम पूर्ण करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करून घेतला नाही तथा ३० एप्रिल पर्यंत दाखला प्राप्त करून घेणार नाहीत, तसेच उत्पादनात गेल्याचे पुरावे सादर करणार नाहीत, असे भूखंड आहे त्या स्थितीत महामंडळाकडे वर्ग होतील. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात ८३ भूखंडधारकांना संजिवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र अद्याप ५० ते ५५ भूखंडधारकांनी अटी व शर्ती पूर्ण केलेल्या नाहीत. संजिवनी योजनेनुसार उद्योग सुरू करण्यासाठी भूखंडधारकांना ही शेवटची संधी असून ३० एप्रिल २०१७ पर्यंत बांधकाम पूर्ण करून ते केल्याचा दाखल प्राप्त करून घ्यावा व उत्पादनात जावे किंवा १ मे रोजी भूखंड मोकळा करावा, असे एमआयडीसीकडून सबंधित भूखंडधारकांना ठणकविण्यात आले आहे. यामुळे भूखंडधारक धास्तावले आहे. (प्रतिनिधी)