शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

निधीअभावी मध्यान्ह भोजन योजना सापडली अडचणीत

By admin | Updated: January 14, 2015 23:17 IST

प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़

वणी : प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना शाळांमध्ये सुरू झाली़ ग्रामीण भागातील शाळांत धान्याचा पुरवठा कंत्राटदाराद्वारे केला जातो़ शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळाचा पुरवठा केला जाते़ उर्वरित दाळ, कडधान्ये, तिखट, मीठ, हळद, मसाला हे बाजारातून विकत घेऊन विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याची सक्ती आहे़ ग्रामीण भागातील शाळांना भाजीपाला, इंधन, पूरक आहार व शिजविण्याची मजुरी यावरील खर्चाची रक्कम देण्यात येते़ शहरी भागातील शाळांना तांदूळाव्यतीरिक्त सर्व वस्तूंसाठी निधी दिला जातो़ मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून शाळांना हा निधी मिळाला नाही़ पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची सप्टेंबर महिन्यापर्यंतची रक्कम देण्यात आली आहे़ मात्र सहावी ते आठवीसाठीची आॅगस्ट महिन्यापासूनची रक्कम शाळांना अद्याप मिळाली नाही़ पाच महिन्यांपासून उधारीवर व्यवहार सुरू आहे़ आता मुख्याध्यापकांची ‘पत’ संपण्याची वेळ आली आहे़ मजुरी न मिळाल्याने स्वयंपाक करणारे मजूर व बचत गटही आर्थिक अडचणीत आले आहे़ त्यामुळे मध्यान्ह भोजनातील ‘कस’ लुप्त होण्याची वेळ आली आहे़चार-पाच महिन्यांसाठी दुकानदारही उधार देण्यास नकार देतात़ भाजीपाला व इंधन उधार मिळत नसल्याने त्यावरील खर्च मुख्याध्यापकांना स्वत:जवळून करावा लागतो़ मुख्याध्यापकांची चार-पाच महिन्याची रक्कम गुंतल्याने तेही अडचणीत आले आहे़ मध्यान्ह भोजन योजना व्यवस्थित चालवायची असेल, तर दर महिन्याला निधी मिळणे आवश्यक आहे़ रक्कम न मिळाल्याने आपोआपच या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागण्याची शक्यता बळावते. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)