शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

निधीअभावी मध्यान्ह भोजन योजना सापडली अडचणीत

By admin | Updated: January 14, 2015 23:17 IST

प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़

वणी : प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना शाळांमध्ये सुरू झाली़ ग्रामीण भागातील शाळांत धान्याचा पुरवठा कंत्राटदाराद्वारे केला जातो़ शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळाचा पुरवठा केला जाते़ उर्वरित दाळ, कडधान्ये, तिखट, मीठ, हळद, मसाला हे बाजारातून विकत घेऊन विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याची सक्ती आहे़ ग्रामीण भागातील शाळांना भाजीपाला, इंधन, पूरक आहार व शिजविण्याची मजुरी यावरील खर्चाची रक्कम देण्यात येते़ शहरी भागातील शाळांना तांदूळाव्यतीरिक्त सर्व वस्तूंसाठी निधी दिला जातो़ मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून शाळांना हा निधी मिळाला नाही़ पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची सप्टेंबर महिन्यापर्यंतची रक्कम देण्यात आली आहे़ मात्र सहावी ते आठवीसाठीची आॅगस्ट महिन्यापासूनची रक्कम शाळांना अद्याप मिळाली नाही़ पाच महिन्यांपासून उधारीवर व्यवहार सुरू आहे़ आता मुख्याध्यापकांची ‘पत’ संपण्याची वेळ आली आहे़ मजुरी न मिळाल्याने स्वयंपाक करणारे मजूर व बचत गटही आर्थिक अडचणीत आले आहे़ त्यामुळे मध्यान्ह भोजनातील ‘कस’ लुप्त होण्याची वेळ आली आहे़चार-पाच महिन्यांसाठी दुकानदारही उधार देण्यास नकार देतात़ भाजीपाला व इंधन उधार मिळत नसल्याने त्यावरील खर्च मुख्याध्यापकांना स्वत:जवळून करावा लागतो़ मुख्याध्यापकांची चार-पाच महिन्याची रक्कम गुंतल्याने तेही अडचणीत आले आहे़ मध्यान्ह भोजन योजना व्यवस्थित चालवायची असेल, तर दर महिन्याला निधी मिळणे आवश्यक आहे़ रक्कम न मिळाल्याने आपोआपच या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागण्याची शक्यता बळावते. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)