शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

शेतकऱ्यांना सोडले व्यापाऱ्यांच्या दयेवर

By admin | Updated: June 16, 2014 23:45 IST

जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दयेवर सोडल्याचे चित्र समोर आले. आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या

यवतमाळ : जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दयेवर सोडल्याचे चित्र समोर आले. आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजार समित्या यात आघाडीवर आहे. सहकार विभागानेही या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या आठवड्यात एकाच दिवसात शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी मार्केट यार्डवर आल्यानंतर हजार, ९००, ७०० रुपये इतके दर दाबले गेले. राष्ट्रीयस्तरावर भाव पडले नसले तरी स्थानिक स्तरावर व्यापाऱ्यांनी ते पाडले. बाजार समित्यांना ही बाब माहीत पडूनही त्यांनी कोणतीही पावले बाजार दर सावरण्यास उचलली नाहीत. उलट व्यापारी जो भाव देत आहे तो मान्य करून कापूस विका, दर पटत नसेल तर परत घेवून जा, आम्ही व्यापाऱ्यांना कापूस खरेदीविषयी सक्ती करू शेत नाही, अशी भूमिका घेतली. देश, राज्यभराच्या बाजारपेठेतील दराची शेतकऱ्यांना बाजार समितीत आणि घरबसल्याही माहिती मिळते, पण त्याचा उपयोग होत नाही. पावसाळा काही दिवसांवर आला, खरेदीत मोजकेच व्यापारी उरले. उरलेल्या व्यापाऱ्यांनी संधी साधून आपआपले उखळ पांढरे करून घेतले. सहकार विभागावर शेतकऱ्यांच्या हितसंवर्धनाची जबाबदारी असते तशी रास्त अपेक्षाही असते. पण या विभागाला शेतकऱ्यांची अशी काही लुबाडणूक होत आहे याची साधी कल्पनाही नसावी, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. शेवटी-शेवटी दर वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी थोडाफार कापूस रोखून ठेवला होता. दरलाभ मिळण्याऐवजी मान मुरगळली गेली. या स्थितीनंतरही राजकीय पक्ष व शेतकऱ्यांच्या संघटनांची भूमिका कोठे दिसली नाही. (वार्ताहर)