शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

व्यापाऱ्यांच्या आंब्याला राजाश्रय, तुरीची हयगय

By admin | Updated: May 20, 2017 02:34 IST

मोजून पाच दुकानांचा बाजार अन् नाव ठेवले महोत्सव. शेतकऱ्यांच्या नावाने आयोजित आंबा महोत्सवाच्या

बळीराजा चेतना अभियानाची ‘पोलखोल’ : दत्त चौकातून खरेदी केलेले आंबे आणले विक्रीला लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मोजून पाच दुकानांचा बाजार अन् नाव ठेवले महोत्सव. शेतकऱ्यांच्या नावाने आयोजित आंबा महोत्सवाच्या आडून जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क व्यापाऱ्यांनी आंबे विकले. तेही कार्बाइडने पिकविलेले आंबे चढ्या दराने ग्राहकांच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोप करीत लोकजागृती मंचचे प्रमुख देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत बळीराजा चेतना अभियानाची पोलखोल केली. व्यापाऱ्यांच्या आंब्याला राजाश्रय दिला, मात्र शेतकऱ्यांची तुरी आज मार्केट यार्डमध्येही कुणी घ्यायला तयार नसल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत आंबा महोत्सव पार पडला. शेतकऱ्यांचे शुद्ध आंबे थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा महोत्सव घेण्यात आला. महोत्सवाला भेट दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची पोलखोल केली. ते म्हणाले, तेथे केवळ ४ स्टॉल लागले. त्यातही अमित सरोदे वगळता इतर स्टॉल स्थानिक फळविक्रेत्यांचे होते. वणीचे डॉ. महेंद्र लोढा यांचे दुकान होते, पण ते स्वत: नव्हते तर भास्कर घुटके हा इसम विक्री करीत होता. या महोत्सवाकडे शेतकरी फिरकलेच नाही. शेवटी बळीराजा चेतना अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना फोन करून बोलावले. त्यातही केवळ आर्णीचे गजानन केसेवार कसेबसे आले. महेश गावंडे, दादाराव कांबळे, दिपाली चिकटे या स्थानिक फळविक्रेत्यांनीच महोत्सवात आंबेविक्री केली, अशी माहिती पवार यांनी दिली. देवानंद पवार म्हणाले, आंबा महोत्सवाच्या आडून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केवळ कौतुकासाठी असे भावनात्मक खेळ करू नये. बाजारात आंबे महाग मिळत आहे, अशी कुणाची तक्रार नव्हती. आंबा महोत्सव घेण्यासाठी कुणी निवेदनही दिले नव्हते. तरी व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी हा महोत्सव घेण्यात आला. पण चौकात शेतकऱ्यांचा कांदा बेभाव विकला जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय प्रयत्न केले? शेतकऱ्यांचे भले करायचे आहे तर तुरी विकत घ्या, जिल्हाधिकारी तुरीसाठी महोत्सव का घेत नाही? शेतकऱ्यांच्या तुरी घेताना त्याचा सातबारा तपासता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात व्यापाऱ्यांना कार्बाइडने पिकविलेला आंबा विकू देता, हा कुठला न्याय, असा सवाल देवानंद पवार यांनी उपस्थित केला.