शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

व्यापाऱ्यांच्या आंब्याला राजाश्रय, तुरीची हयगय

By admin | Updated: May 20, 2017 02:34 IST

मोजून पाच दुकानांचा बाजार अन् नाव ठेवले महोत्सव. शेतकऱ्यांच्या नावाने आयोजित आंबा महोत्सवाच्या

बळीराजा चेतना अभियानाची ‘पोलखोल’ : दत्त चौकातून खरेदी केलेले आंबे आणले विक्रीला लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मोजून पाच दुकानांचा बाजार अन् नाव ठेवले महोत्सव. शेतकऱ्यांच्या नावाने आयोजित आंबा महोत्सवाच्या आडून जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क व्यापाऱ्यांनी आंबे विकले. तेही कार्बाइडने पिकविलेले आंबे चढ्या दराने ग्राहकांच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोप करीत लोकजागृती मंचचे प्रमुख देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत बळीराजा चेतना अभियानाची पोलखोल केली. व्यापाऱ्यांच्या आंब्याला राजाश्रय दिला, मात्र शेतकऱ्यांची तुरी आज मार्केट यार्डमध्येही कुणी घ्यायला तयार नसल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत आंबा महोत्सव पार पडला. शेतकऱ्यांचे शुद्ध आंबे थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा महोत्सव घेण्यात आला. महोत्सवाला भेट दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची पोलखोल केली. ते म्हणाले, तेथे केवळ ४ स्टॉल लागले. त्यातही अमित सरोदे वगळता इतर स्टॉल स्थानिक फळविक्रेत्यांचे होते. वणीचे डॉ. महेंद्र लोढा यांचे दुकान होते, पण ते स्वत: नव्हते तर भास्कर घुटके हा इसम विक्री करीत होता. या महोत्सवाकडे शेतकरी फिरकलेच नाही. शेवटी बळीराजा चेतना अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना फोन करून बोलावले. त्यातही केवळ आर्णीचे गजानन केसेवार कसेबसे आले. महेश गावंडे, दादाराव कांबळे, दिपाली चिकटे या स्थानिक फळविक्रेत्यांनीच महोत्सवात आंबेविक्री केली, अशी माहिती पवार यांनी दिली. देवानंद पवार म्हणाले, आंबा महोत्सवाच्या आडून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केवळ कौतुकासाठी असे भावनात्मक खेळ करू नये. बाजारात आंबे महाग मिळत आहे, अशी कुणाची तक्रार नव्हती. आंबा महोत्सव घेण्यासाठी कुणी निवेदनही दिले नव्हते. तरी व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी हा महोत्सव घेण्यात आला. पण चौकात शेतकऱ्यांचा कांदा बेभाव विकला जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय प्रयत्न केले? शेतकऱ्यांचे भले करायचे आहे तर तुरी विकत घ्या, जिल्हाधिकारी तुरीसाठी महोत्सव का घेत नाही? शेतकऱ्यांच्या तुरी घेताना त्याचा सातबारा तपासता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात व्यापाऱ्यांना कार्बाइडने पिकविलेला आंबा विकू देता, हा कुठला न्याय, असा सवाल देवानंद पवार यांनी उपस्थित केला.