शहरं
Join us  
Trending Stories
1
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
2
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
3
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
4
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
5
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
6
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
7
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
9
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...
10
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
11
Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक
12
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
13
PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम
14
चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!
15
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
16
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
17
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
18
कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक
19
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
20
"तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट

बाजार समित्यांवर व्यापाऱ्यांचाच ताबा

By admin | Updated: February 10, 2016 03:01 IST

शेतकरी आत्महत्येमुळे संपूर्ण जगाचे लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे केंद्रीत झाले आहे. याचवेळी शेतमालास भाव न देण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे.

बेभाव बोली : किनवट, कारंजा तेज, पण यवतमाळात मंदीरूपेश उत्तरवार यवतमाळ शेतकरी आत्महत्येमुळे संपूर्ण जगाचे लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे केंद्रीत झाले आहे. याचवेळी शेतमालास भाव न देण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे. यावर उपाय न झाल्याने स्थिती हाताबाहेर गेली. तूर आणि कापूस उत्पादकांना याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. याचवेळी जिल्ह्यालगतच्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर वधारलेले आहे. यवतमाळच्या बाजारात मात्र, मंदीची लाट आहे. जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. अपेक्षित पीक झाले नाही. कसेबसे घरात असलेले धान्य शेतकऱ्यांनी विकायला काढले. याच सुमारास बाजारात धान्याची बोली घसरली. कापूस आणि तुरीच्या दरात कमी बोली लावली. कापसाचा खुल्या पद्धतीने लिलाव झाला नाही. यामुळे कापसाला यवतमाळात २०१५-२०१६ ला चांगले दर मिळाले नाही. मात्र अमरावती, राळेगाव, हिंगणघाट, धामणगाव या ठिकाणी कापसाचे दर क्विंटलमागे ३०० ते ४०० रूपयांनी अधिक आहे. तुरीच्या बाबतीत असेच घडले. इतर बाजारापेक्षा यवतमाळचे दर ५०० रूपयाने कमी राहीले आहे. इतर ठिकाणी तुरीची बोली ८००० रूपये क्विंटलपासून सुरू होते. तर यवतमाळात तुरीची बोली ७ हजार ५०० रूपये क्विंटलपासून सुरू होते. नाफेडची खुली बोली का नाही?कृत्रिम तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र शासनाने नाफेडच्या मदतीने तुरीची खरेदी सुरू केली आहे. शेतमालाचे दर पडू नये, शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे, असा यामागचा उद्देश आहे. मात्र यवतमाळात खुली बोली बोलण्याचा अधिकार नाफेडच्या खरेदीदारांना नाही. इतर केंद्रांवर मात्र नाफेड खुल्या पद्धतीने तुरीची खरेदी करीत आहे. यवतमाळवरच हा अन्याय का, हा संशोधनाचा विषय आहे. तीन महिन्यात तूर तीन हजारांनी घसरलीतुरडाळीचे वाढलेले दर स्थिर करण्यासाठी केंद्राने तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ५६ लाख मेट्रीक टन विदेशी डाळ देशात दाखल होणार आहे. ही डाळ स्थानिक बाजारात येताच दर घसरणार आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी त्यापूर्वीच भाव घसरविणे सुरू केले आहे. यामुळे तीन महिन्यात तुरीचे दर क्विंटलमागे तीन हजारांनी घसरले आहेत. ११ हजार २०० रूपये क्विंटलची तूर ८ हजार ८०० पर्र्यंत खाली आली आहे.