शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

निधी वाटपातून सदस्य बाद

By admin | Updated: March 15, 2015 00:23 IST

केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना बाद करण्यात आले आहे.

यवतमाळ : केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना बाद करण्यात आले आहे. आतापर्यंत या सदस्यांना अनुक्रमे २० आणि १० टक्के निधी विकासासाठी दिली जात होता. मात्र हा निधी आता ग्रामपंचायतीकडे वळता केला जाणार आहे. वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून राज्याला मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जातो. या निधीच्या माध्यमातून जिल्हे केंद्राला जोडले गेले आहे. १३ व्या वित्त आयोगापर्यंत ७० टक्के निधी हा ग्रामपंचायतींना दिला जायचा, तर जिल्हा परिषद सदस्यांना २० व पंचायत समिती सदस्यांना १० टक्के निधी दिला जात होता. निधीच्या या वाटपातही अनेक ठिकाणी राजकीय सोयीने पक्षपात केला जायचा. ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाच्या सदस्यांना अधिक निधी देण्याचा प्रयत्न व्हायचा. यवतमाळ जिल्हा परिषदेतही हा प्रकार घडला होता. त्यातही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक सदस्यांकडून टक्केवारीवर जोर देत सिमेंट रोडच्या कामांवरच अधिक भर दिला जायचा. परंतु आता १४ व्या वित्त आयोगाचा निधी वाटप करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे आर्थिक अधिकार काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता या आयोगाचा सर्व १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना वितरित केला जाणार आहे. या निधीतून एकही ग्रामपंचायत वंचित राहणार नाही. मात्र लोकसंख्येच्या निकषानुसार निधीचे हे वाटप होईल. कमीत कमी एक लाख आणि त्यावर १० लाखापर्यंत हा निधी वितरित केला जाऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्याला मिळणाऱ्या या निधीचे ग्रामपंचायतीच्या संख्येनुसार समतोल वाटप केले जाईल. मात्र लोकसंख्या हा प्रमुख निकष राहील. दर तीन महिन्यांनी टप्प्यानुसार या निधीचे वाटप केले जाते. एका जिल्ह्याला १५ ते २० कोटीपर्यंत हा निधी मिळू शकतो. (जिल्हा प्रतिनिधी)