शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

विदर्भ जनआंदोलन समितीचा जनहिताच्या प्रश्नांवर मेळावा

By admin | Updated: October 4, 2014 23:33 IST

शेतकरी आणि ग्रामीण जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत. समाजाचे मेळावे घेवून पोट

यवतमाळ : शेतकरी आणि ग्रामीण जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत. समाजाचे मेळावे घेवून पोट भरण्याचा व्यवसाय काही समाजसेवकांनी सुरू केला आहे. मात्र आपण जनहिताचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करणाऱ्यांसोबतच जाण्याचा निर्णय ५ आॅक्टोबरला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात घेतला जाणार आहे, अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.केंद्रात भाजपाचे सरकार आल्यास सातबारा कोरा करण्याचे, लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा, कापूस, सोयाबीन व धानाला देण्याचे, संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणूक काळात देण्यात आले. मात्र या मागण्यांचा भाजपाला विसर पडला असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. आपल्या जाहीरनाम्यात अन्न व निवारा, टोलमुक्त महाराष्ट्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कापूस-सोयाबीन-धानासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव सर्व शाळांना दुपारचे जेवण अक्षयपात्र योजनेनुसार वृद्ध-निराधारांना अनुदान आदी बाबींचा समावेश करणाऱ्यांना पाठिंब्याचा ५ आॅक्टोबरच्या निर्धार मेळाव्यात निर्णय घेतला जाईल, असे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)