शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ जनआंदोलन समितीचा जनहिताच्या प्रश्नांवर मेळावा

By admin | Updated: October 4, 2014 23:33 IST

शेतकरी आणि ग्रामीण जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत. समाजाचे मेळावे घेवून पोट

यवतमाळ : शेतकरी आणि ग्रामीण जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत. समाजाचे मेळावे घेवून पोट भरण्याचा व्यवसाय काही समाजसेवकांनी सुरू केला आहे. मात्र आपण जनहिताचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करणाऱ्यांसोबतच जाण्याचा निर्णय ५ आॅक्टोबरला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात घेतला जाणार आहे, अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.केंद्रात भाजपाचे सरकार आल्यास सातबारा कोरा करण्याचे, लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा, कापूस, सोयाबीन व धानाला देण्याचे, संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणूक काळात देण्यात आले. मात्र या मागण्यांचा भाजपाला विसर पडला असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. आपल्या जाहीरनाम्यात अन्न व निवारा, टोलमुक्त महाराष्ट्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कापूस-सोयाबीन-धानासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव सर्व शाळांना दुपारचे जेवण अक्षयपात्र योजनेनुसार वृद्ध-निराधारांना अनुदान आदी बाबींचा समावेश करणाऱ्यांना पाठिंब्याचा ५ आॅक्टोबरच्या निर्धार मेळाव्यात निर्णय घेतला जाईल, असे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)