शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यांत्रिक युगातही बैलांची मागणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:19 IST

आजच्या यांत्रिक युगात शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. तरीही काही ठिकाणी बैलांद्वारेच शेतीची कामे केली जात आहे. सध्या कळंब येथे सुरू असलेल्या बैलबाजारात शेतकऱ्यांचा कल बैलजोडी खरेदीकडे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकळंबचा बैलबाजार फुलला : खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, ठिकठिकाणच्या जोड्या दाखल

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : आजच्या यांत्रिक युगात शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. तरीही काही ठिकाणी बैलांद्वारेच शेतीची कामे केली जात आहे. सध्या कळंब येथे सुरू असलेल्या बैलबाजारात शेतकऱ्यांचा कल बैलजोडी खरेदीकडे दिसून येत आहे.उन्हाळ्याची चाहुल लागली की बळीराजा मशागतीच्या कामाला लागतो. तेव्हा त्याला प्रकर्षाने बैलांची आठवण होते. बैलाचे काम यंत्र करीत असले तरी, सर्वच कामे यंत्राच्या साह्याने शक्य नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या दारी एक जोडी का होईना बैल ठेवतोच. कळंब येथील बैलबाजारात देवळी, बाभूळगाव, वीरखेड, वर्धा, तळेगाव, राळेगाव आदी प्रमुख गावातील दावणा (बैल) आहेत. बाजारात बैल घेणे, विकणे आणि अलटीपलटी या तीन प्रकारात व्यवहार केला जातो.येथील बैलबाजारात बैलजोडी कमीतकमी ६० हजार आणि जास्तीतजास्त दोन लाख किंमत असणारी आहे. बैलबाजाराच्या निमित्ताने बैलांना नाल ठोकणारे, शिंगे शिलणाऱ्या, चारा विकणार, हॉटेल व्यावसायिक लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे. राहुटी करून शेतकरी बैलासोबतच (दावण) मुक्कामाला असतो.बैलाच्या किमतीनुसार कमिशनबैलबाजारात जास्तीतजास्त व्यवहार दलालामार्फतच होतो. दलालाविना सौदा शक्यतो पूर्ण होत नाही, असा अनुभव आहे. परस्पर सौदा करणाऱ्याची दिशाभुल करुन त्यांना बिचकविल्या जाते. दलाल बैल घेणारा व विकणाऱ्याकडून बैलाच्या किमतीनुसार कमीशनची मागणी करतो, तर दुसरीकडे बैलबाजार हर्रास घेणाराही बैलाप्रमाणे फीची आकारणी करतो. बाजारात बैल घेणाऱ्यांसोबतच बैल पाहणाऱ्यांचीही गर्दी असते. काही बैलजोड्या फारच देखण्या आहे. यावर्षी पाहिजे तशी बैल खरेदी-विक्री झाली नसल्याची माहिती आहे. तरीही बैल घेण्याची शेतकºयांची इच्छा लपून राहत नाही, हे दिसून येते.