शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मे हिटचा ३५० गावांना तडाखा

By admin | Updated: May 25, 2017 01:13 IST

मे महिन्यात तापमानात वाढ होताच जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये पाणीटंचाईचा भडका उडाला आहे.

पाणीटंचाई भीषण वळणावर : १०० विहिरी अधिग्रहित लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मे महिन्यात तापमानात वाढ होताच जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे १५ टँकर सुरू करण्यात आले असून १०० खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.यावर्षी जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ प्रथम दोन कोटी ८८ लाखांचा कृती आराखडा तयार केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आधी चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाचा जाब विचारल्याने हा आराखडा रखडला. हा निधी प्राधान्यायाने पाणीटंचाई उपाययोजनांवर खर्च करावयाचा असताना ग्रामपंचायतींनी तो भलत्याच कामांवर खर्च केल्याने ही वेळ ओढवली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात आठ शासकीय आणि सात खासगी, अशा १५ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, दिग्रस तालुक्यातील आरंभी, मरसूळ, पुसद तालुक्यातील म्हैसमाळ, शिवाजीनगर, उपवनवाडी, बाळवाडी, उमरखेड तालुक्यातील बोथावन, यवतमाळ तालुक्यातील पिंप्री, पांढरी, माळम्हसोला, धानोरा, बोथ, जांभुळवाणी, गोदणी, लोहारा आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. याशिवाय विविध तालुक्यात १०० खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यवतमाळ तालुक्यात १९, दिग्रस तालुक्यात १८, पुसद तालुक्यात १३, नेर तालुक्यात ११, मारेगाव तालुक्यात पाच, दारव्हा तालुक्यात चार, तर वणी तालुक्यात वरझडी बंडा येथील एक खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. या विहिरींवरून ग्रामस्थ तहान भागवित आहे. ग्रामीण भागात हाहाकार जिल्ह्यातील जवळपास ३५० गावांम्ध्ये तीव्र पाणीटंचाईने नागरिक व्याकूळ झाले आहे. जिल्हा परिषदेने तेथील पाणीटंचाई निवारणार्थ २१ टँकर आणि २७२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्तास केवळ १५ टँकर आणि १०० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यास मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे उर्वरित गावातील पाणीटंचाई तीव्र झाली असून नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. २८ गावांमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनांची दुरुस्ती होईपर्यंत पावसाळा सुरू होईल.