शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

मे हिटचा ३५० गावांना तडाखा

By admin | Updated: May 25, 2017 01:13 IST

मे महिन्यात तापमानात वाढ होताच जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये पाणीटंचाईचा भडका उडाला आहे.

पाणीटंचाई भीषण वळणावर : १०० विहिरी अधिग्रहित लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मे महिन्यात तापमानात वाढ होताच जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे १५ टँकर सुरू करण्यात आले असून १०० खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.यावर्षी जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ प्रथम दोन कोटी ८८ लाखांचा कृती आराखडा तयार केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आधी चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाचा जाब विचारल्याने हा आराखडा रखडला. हा निधी प्राधान्यायाने पाणीटंचाई उपाययोजनांवर खर्च करावयाचा असताना ग्रामपंचायतींनी तो भलत्याच कामांवर खर्च केल्याने ही वेळ ओढवली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात आठ शासकीय आणि सात खासगी, अशा १५ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, दिग्रस तालुक्यातील आरंभी, मरसूळ, पुसद तालुक्यातील म्हैसमाळ, शिवाजीनगर, उपवनवाडी, बाळवाडी, उमरखेड तालुक्यातील बोथावन, यवतमाळ तालुक्यातील पिंप्री, पांढरी, माळम्हसोला, धानोरा, बोथ, जांभुळवाणी, गोदणी, लोहारा आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. याशिवाय विविध तालुक्यात १०० खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यवतमाळ तालुक्यात १९, दिग्रस तालुक्यात १८, पुसद तालुक्यात १३, नेर तालुक्यात ११, मारेगाव तालुक्यात पाच, दारव्हा तालुक्यात चार, तर वणी तालुक्यात वरझडी बंडा येथील एक खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. या विहिरींवरून ग्रामस्थ तहान भागवित आहे. ग्रामीण भागात हाहाकार जिल्ह्यातील जवळपास ३५० गावांम्ध्ये तीव्र पाणीटंचाईने नागरिक व्याकूळ झाले आहे. जिल्हा परिषदेने तेथील पाणीटंचाई निवारणार्थ २१ टँकर आणि २७२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्तास केवळ १५ टँकर आणि १०० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यास मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे उर्वरित गावातील पाणीटंचाई तीव्र झाली असून नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. २८ गावांमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनांची दुरुस्ती होईपर्यंत पावसाळा सुरू होईल.