शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मे हिटचा ३५० गावांना तडाखा

By admin | Updated: May 25, 2017 01:13 IST

मे महिन्यात तापमानात वाढ होताच जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये पाणीटंचाईचा भडका उडाला आहे.

पाणीटंचाई भीषण वळणावर : १०० विहिरी अधिग्रहित लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मे महिन्यात तापमानात वाढ होताच जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे १५ टँकर सुरू करण्यात आले असून १०० खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.यावर्षी जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ प्रथम दोन कोटी ८८ लाखांचा कृती आराखडा तयार केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आधी चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाचा जाब विचारल्याने हा आराखडा रखडला. हा निधी प्राधान्यायाने पाणीटंचाई उपाययोजनांवर खर्च करावयाचा असताना ग्रामपंचायतींनी तो भलत्याच कामांवर खर्च केल्याने ही वेळ ओढवली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात आठ शासकीय आणि सात खासगी, अशा १५ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, दिग्रस तालुक्यातील आरंभी, मरसूळ, पुसद तालुक्यातील म्हैसमाळ, शिवाजीनगर, उपवनवाडी, बाळवाडी, उमरखेड तालुक्यातील बोथावन, यवतमाळ तालुक्यातील पिंप्री, पांढरी, माळम्हसोला, धानोरा, बोथ, जांभुळवाणी, गोदणी, लोहारा आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. याशिवाय विविध तालुक्यात १०० खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यवतमाळ तालुक्यात १९, दिग्रस तालुक्यात १८, पुसद तालुक्यात १३, नेर तालुक्यात ११, मारेगाव तालुक्यात पाच, दारव्हा तालुक्यात चार, तर वणी तालुक्यात वरझडी बंडा येथील एक खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. या विहिरींवरून ग्रामस्थ तहान भागवित आहे. ग्रामीण भागात हाहाकार जिल्ह्यातील जवळपास ३५० गावांम्ध्ये तीव्र पाणीटंचाईने नागरिक व्याकूळ झाले आहे. जिल्हा परिषदेने तेथील पाणीटंचाई निवारणार्थ २१ टँकर आणि २७२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्तास केवळ १५ टँकर आणि १०० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यास मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे उर्वरित गावातील पाणीटंचाई तीव्र झाली असून नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. २८ गावांमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनांची दुरुस्ती होईपर्यंत पावसाळा सुरू होईल.