शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

निराधार वृद्धांची माऊली शेषराव डोंगरे

By admin | Updated: June 24, 2015 00:20 IST

तळहातावरील फोडाप्रमाणे मुलांना जपणाऱ्या आईवडिलांनाच मुले वृद्धापकाळात घराबाहेर काढतात.

आंतरराष्ट्रीय पितृदिन : उमरी पठार येथील वृद्धाश्रमकाशिनाथ लाहोरे यवतमाळ तळहातावरील फोडाप्रमाणे मुलांना जपणाऱ्या आईवडिलांनाच मुले वृद्धापकाळात घराबाहेर काढतात. मुलांसाठी वृद्ध आईवडील अडगळ ठरू लागतात. जिवंतपणी मरणयातना देणारी कार्टी मातृछायेत-पितृछायेत सुखात लोळत असतात. माणूसकीचा थोडा अंश शिल्लक राहिलेली मुले आईबापाला वृद्धाश्रमात ठेवून कृतकृत्यर्थ झाल्यासारखी वागतात. याच निराधार वृद्धांची माऊली म्हणून आर्णी तालुक्यातील उमरी पठार शेषराव डोंगरे काम करीत आहेत. वृद्धापकाळात मरण येत नाही आणि जगण्याची सोय नाही अशा बेवारस व्यक्तीचे जगणे हाच त्यासाठी शाप ठरू पाहत आहे. वॉटस्अ‍ॅपवर मातृ व पितृदिनाच्या शुभेच्छा पाठविण्यात धन्यता मानणारी पिढी, आजची विभक्त कुटुंबपद्धती, बदललेली मूल्य पाहून संवेदनशील माणसाला म्हातारपण येऊ नये असे वाटल्याशिवाय राहत नाही. याच समाज व्यवस्थेत निरांजनाच्या प्रकाशेत आपल्या मर्यादेत वृद्धांना मायेची उब देणारी माऊली शेषराव डोंगरेंच्या रुपात निराधार वृद्धांची काळजी घेताना दिसतात.कोणाच्याही ध्यानीमनी नसताना १९९१ साली गांधी जयंतीला अचानक गरजेपोटी आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथे वृद्धाश्रमाची स्थापना झाली. उमरीच्या काही लोकांनी तेथे युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते. काही वृद्धांनी आपली व्यथा त्यांना सांगितली होती. त्याचवेळी सरपंच असलेल्या शेषराव डोंगरेंनाच वृद्धाश्रम काढण्याची सूचना त्यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी नंतर २५ वृद्धांची परवानगी दिली. प्रारंभी १४ वृद्ध जनकलाल जयस्वाल यांच्याकडे राहू लागले. सहा महिन्यांनी वृद्धाश्रम समाज भवनात गेला. सहा वर्षांनी शंकर तलमले यांच्या घरी गेला. पुढे आर्णीच्या प्रेमचंद अग्रवाल यांच्या दातृत्वाने अर्धा एकर जागा मिळाली. त्यावर दहा खोल्यांचे बांधकाम करून जवळा-दिग्रस मार्गावर दोलामहाराज वृद्धाश्रमाची कायमची सोय झाली. भटक्या जातीजमातीतील उपेक्षित झाडी, बंजारा समाजात जन्मलेले शेषराव डोंगरे यांना अनपेक्षितपणे तरुण वयातच सर्व जाती, धर्माची निराधार वृद्धांना सांभाळण्याचे कार्य करावे लागले. मनाच्या कोपऱ्यातील सेवाभावी वृत्तीला यातून चालना मिळत गेली. अडचणींचा सामना करत या वृद्धाश्रमाला २५ व्या वर्षात पदापर्ण केले आहे. या वाटेने चालताना डोंगरे यांना आपली शेती विकावी लागली. प्रसंगी पत्नी, मुलांसह मजुरी करावी लागली. कर्ज झाले तरीही या सेवेच्या व्रतात त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही. २५ वृद्धांचा परिवार चालवताना कधी-कधी जेवणापेक्षा औषधांचा खर्च जास्त होतो. २० वर्षात ४० अंत्यविधी शेषराव यांनी मुलांप्रमाणे पार पाडले. निराधारांचा मुलगा ही आज त्यांची ओळख झाली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मित्रांच्या सहकार्याने २७ व्या वर्षी सरपंच होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. पुढे जाऊन राजकारण करण्यापेक्षा समाजकारणात ते एकरूप झाले आहेत. आपले आयुष्य सेवेतच कृतार्थ व्हावे ही त्यांची इच्छा आहे. मध्यंतरी वृद्धाश्रम आर्थिक डबघाईस आला असताना लोणी येथील रमेशभाऊ कोष्टवार आणि जयंत नंदापुरे यांनी शेषरावजींना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले तेव्हा त्यांना हिंमत आली. सेवेचा वसा अखंड चालू राहावा ही सर्वांची तळमळ आहे. लोणी येथील डॉ. प्रजय चौधरी हे लंडनला राहत असल्याने त्यांनी त्यांची तीन एकर जमीन संस्थेला दान दिली आहे. आश्रमात पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून डॉ. विजय कावलकर यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ५० हजार खर्च करून बोअरवेल खोदून दिली. निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या शेषराव डोंगरेंना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले तरीही हा माणूस आपले पाय जमिनीत घट्ट रोवून उभा आहे.