उमरखेड : दिवसेंदिवस साखरेचे भाव घसरत असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. दोन हजार रुपये क्ंिवटल एवढा निच्चांकी भाव आला असून या भावातही व्यापाऱ्यांची मागणी नाही, ही चिंतेची बाब असल्याचे वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले. अलिकडे केंद्र सरकारने साडेसहा हजार कोटींचे कर्जाऊ स्वरूपात पॅकेज जाहीर केले आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने नऊ हजार कोटी रुपयांचे पॅकेज कर्जाऊ दिले होते. या रकमांची परतफेड साखर कारखाने कशा पद्धतीने करू शकतील, हा साखर कारखानदारी पुढील मोठा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य सरकार कर्ज स्वरूपात मदत करीत आहे. ती रक्कम कारखान्यांना अनुदान स्वरूपात देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. देशातल्या ज्या कारखान्याकडे को-जनरेशन, डिस्ट्रलरी, इथेलॉन प्रकल्प नसतील त्या कारखान्यांंना प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने सर्वातोपरी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली.वसंत सहकारी साखर कारखान्याचेसुद्धा १५ मार्च ते २४ मार्चपर्यंतच्या शेवटच्या पंधरवाड्यातील ११ दिवसांचे १२ हजार टन ऊसाचे पेमेंट थकले आहे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यास उशीर होत आहे. आगामी आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून जिल्हा बँकेने तशा हालचाली सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी गाळप हंगामात कारखाने चालू शकत नाही, ही वस्तू स्थिती असून याची जाणीव ठेऊन शासनाने आता कारखान्यांना मदत करावी, असे आवाहन प्रकाश देवसरकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
साखरेच्या भावातील घसरण चिंतेची बाब
By admin | Updated: June 26, 2015 02:25 IST