शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलसंपदा विभागाच्या कारभारावर ‘मॅट’चे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:55 IST

जलसंपदा विभागाच्या कारभारावर मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील चार प्रतिवादींना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

ठळक मुद्देचार प्रतिवादींना दहा हजारांचा दंड विधवेचा अनुकंपा अर्ज केला गहाळपत्रव्यवहाराला दहा वर्षे प्रतिसादही नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अर्ज गहाळ करणे, येरझारा मारायला लावणे, दहा वर्षे पत्रव्यवहाराला प्रतिसाद न देणे, अनुकंपा नोकरी मागणाऱ्या आईच नव्हे तर मुलालाही वारंवार त्रास देणे या जलसंपदा विभागाच्या कारभारावर मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील चार प्रतिवादींना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.दीपक भिकाजी कांबळे (धरणग्रस्त वसाहत, ता. करवीर जि. कोल्हापूर) यांच्याप्रकरणात २९ जानेवारी रोजी ‘मॅट’ने निर्णय दिला. दीपकचे नाव अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ठ करावे, त्याचा १२ डिसेंबर २००६ चा मूळ अर्ज मान्य करुन प्रतीक्षा यादीत तेव्हाची ज्येष्ठता द्यावी, त्यानंतरच्यांना नोकरी दिली असेल तर दीपकलाही प्राधान्याने शासकीय नोकरीत नेमणूक द्यावी, दोन महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले.दीपक कांबळे यांनी अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’मध्ये हे प्रकरण दाखल केले होते. त्यात दुधगंगा कॅनॉल विभाग क्र. १० चे उपकार्यकारी अभियंता, कोल्हापूरचे जलसंपदा अधीक्षक अभियंता, जलसंपदा खात्याचे सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे सचिव या चौघांना प्रतिवादी बनविण्यात आले होते. या प्रतिवादींवर दंड बसवित ‘मॅट’ने त्यांना दणका दिला. शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली.

नोकरीसाठी विधवेचा दहा वर्षे संघर्षप्रकरण असे, जलसंपदा विभागात वर्ग-४ चे कर्मचारी असलेल्या दीपक यांच्या वडिलांचे ३ जुलै १९९६ ला निधन झाले. त्यावेळी दीपक अज्ञान होते. म्हणून दीपकची आई शालन यांनी १४ मार्च १९९७ ला अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. वारंवार प्रत्यक्ष भेट घेऊन व स्मरणपत्रे देऊनही दहा वर्ष (२००६ पर्यंत) त्यांच्या पत्रांना जलसंपदा खात्याने कोणताही प्रतिसाद अथवा उत्तर दिले नाही. १२ डिसेंबर २००६ ला त्यांनी अखेरचे स्मरणपत्र दिले होते. सोबतच मी वयात बसत नसेल तर माझ्या मुलाला (दीपक) अनुकंपा नोकरी द्या, अशी विनंती केली होती.

कार्यालय स्थानांतरणात अर्ज गहाळमुलगा दीपक सज्ञान झाल्यानंतर त्यांनी ११ जानेवारी २००७ ला अर्ज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने मंत्रालयस्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला. तेव्हा जलसंपदा कार्यालयाच्या स्थलांतरणात शालन कांबळे यांचा अर्ज गहाळ झाल्याचे मंत्रालयातून कळविले गेले. या प्रकरणात जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने एकमेकांकडे बोट दाखविले. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले गेले.

निर्णय घेण्याचे आदेश थेट मंत्रालयातूनमंत्रालयातून किमान दीपकच्या अर्जावर निर्णय घ्या असे निर्देश दिले गेले. तेव्हा दीपकच्या अर्जाला विलंब झाला, २००३ ला तो सज्ञान झाला असताना तीन वर्ष तीन महिने विलंबाने अर्थात २००७ ला अर्ज केला. नियमानुसार दोन वर्षापेक्षा अधिक विलंब काळ माफ करता येत नाही, असे जलसंपदा विभागाने सांगत दीपकचा अर्ज फेटाळून लावला.कमिटीपुढे प्रकरणच ठेवले गेले नाहीअशा माफीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या स्तरावर कमिटी असते. त्यांच्या तीन बैठका झाल्या, मात्र त्यात दीपकचे प्रकरण ठेवले गेले नाही. २०१६ ला हे प्रकरण ठेवले असता या कमिटीने विलंबाच्या कारणावरून फेटाळले. अनेक प्रकरणांमध्ये पाच ते सात वर्ष विलंबानंतरही प्रकरणे मंजूर केली असताना दीपकलाच वेगळा न्याय का असा मुद्दा अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांनी उपस्थित केला.

गोंधळाला जलसंपदा विभाग जबाबदारया गोंधळाला जलसंपदा विभाग जबाबदार आहे. दीपकच्या आईला वेळीच नियुक्ती मिळाली असती तर आज त्यांच्यावर न्यायालयात येण्याची वेळ आली नसती, याकडे ‘मॅट’चे लक्ष वेधले गेले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांचा हवालाही देण्यात आला. मात्र अनुकंपा नोकरी देणे हा कायदेशीर हक्क नाही असा आक्षेप सरकारी पक्षातर्फे क्रांती गायकवाड यांनी नोंदविला. मात्र तो फेटाळून लावत ‘मॅट’ने दीपकला दिलासा दिला. अर्जाला झालेला विलंब माफ करता येत नाही हा २२ जून २०१७ चा आदेश रद्द करण्यात आला. जलसंपदा विभागाचा निष्काळजीपणाच या गोंधळाला जबाबदार असून त्यामुळेच दीपकला न्यायालयात धाव घ्यावी लागली असा ठपका न्यायालयाने ठेवला.

निष्काळजीपणा माफ करण्यासारखा नाहीजलसंपदा विभागाचा निष्काळजीपणा गंभीर आहे, तो माफ करण्यासारखा नाही, सरकारच्या धोरणाला छेद देणारा आहे, तांत्रिक मुद्दे विनाकारण उपस्थित करून जबाबदारी टाळणारा आहे, अशा शब्दात ‘मॅट’ने कोल्हापूर जलसंपदा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय