शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

गणिताच्या विद्यार्थ्यांना ‘सायन्स’ला प्रवेश नाही

By admin | Updated: May 20, 2017 02:30 IST

गेल्या दोन शैक्षणिक सत्रांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीला सामान्य गणित विषय घेतला होता, त्यांना आता विज्ञान शाखेत

अकरावी, बारावी प्रवेश : मूळ गुणपत्रिका जोडल्यावरच स्वीकारणार अर्ज अविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गेल्या दोन शैक्षणिक सत्रांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीला सामान्य गणित विषय घेतला होता, त्यांना आता विज्ञान शाखेत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, असा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जारी केला आहे. विशेष म्हणजे, सध्या अकरावीची परीक्षा दिलेल्या अशा विद्यार्थ्यांना बारावीची अ‍ॅडमिशन करतानाही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. इतर विषयात गती असताना केवळ गणित कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांची दहावीत अडचण होऊ नये म्हणून बिजगणिताऐवजी ‘सामान्य गणित’ हा पर्याय निर्माण करण्यात आला. जिल्ह्यात शेकडो विद्यार्थ्यांनी दहावीला सामान्य गणितच घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, सामान्य गणिताच्या आधारे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जाणार नाही. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी सामान्य गणित घेतले होते, त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश देऊ नये, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे सध्या दहावीची परीक्षा दिलेल्या सामान्य गणिताच्या विद्यार्थ्यांना कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याशिवाय पर्याय नाही. तसेच २०१५-१६ या सत्रात ज्यांनी सामान्य गणितासह दहावी उत्तीर्ण केली, त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी २०१६-१७ मध्ये अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. परंतु, आता २०१५-१६ मधील सामान्य गणिताच्या विद्यार्थ्यांनाही विज्ञान शाखेत प्रवेश न देण्याच्या सूचना आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा बारावी विज्ञान प्रवेश कठीण होणार आहे. २३ महाविद्यालयांना नोटीस विशेष म्हणजे, यावर्षी बारावी विज्ञानची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळाने पडताळणी केली असता, अनेक विद्यार्थ्यांनी दहावीला सामान्य गणित घेतल्याचे निष्पन्न झाले. अशा विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांना मंडळाने नोटीसाही बजावल्या. दहावीला सामान्य गणित असताना अकरावी-बारावीला विज्ञान शाखा घेता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांना नोटीस आल्या. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच शिक्षण विभाग जागा झाला. हा प्रकार पुढे होऊ नये म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी विज्ञान शाखेच्या प्रवेशावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रवेशाच्या वेळी मूळ गुणपत्रिका जोडल्याशिवाय पुढील कार्यवाहीच न करण्याच्या सूचना आहेत.