शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

५० हजार नागरिकांना मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापन कक्षांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १६७ महिला बचत गटांतील २०० महिला या कामी योगदान देत आहे.

ठळक मुद्देदारव्हा पंचायत समितीचा पुढाकार : कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील ५० हजारांवर नागरिकांना मास्कचे मोफत सुरक्षा कवच देण्याचा निर्णय पंचायत समितीने घेतला. त्यानुसार ३० हजार मास्क तयार झाले आहे.गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ही जबाबदारी घेतली. बचत गटामार्फत मास्क तयार करण्यात येत असून इतर उपाययोजना व गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या खोकला, शिंकण्याने संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले. नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापन कक्षांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १६७ महिला बचत गटांतील २०० महिला या कामी योगदान देत आहे. तसेच दुसऱ्यांदा गावागावात घाणीच्या ठिकाणी, रस्त्याच्याकडेला, नालीवर किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. गावातील दिव्यांगांना अन्नधान्य, सॅनिटायजर, साबण यासह जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये याची खबरदारी घेऊन ग्रामपंचायतीमार्फत इतर उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहे.नियमांचे पालन करणे आवश्यककोरोना आजार आणि त्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी लक्षात घेता ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना शक्य तेवढ्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याउपरही काही अडचण असल्यास ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बीडीओ राजीव शिंदे यांनी केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या