लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील ५० हजारांवर नागरिकांना मास्कचे मोफत सुरक्षा कवच देण्याचा निर्णय पंचायत समितीने घेतला. त्यानुसार ३० हजार मास्क तयार झाले आहे.गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ही जबाबदारी घेतली. बचत गटामार्फत मास्क तयार करण्यात येत असून इतर उपाययोजना व गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या खोकला, शिंकण्याने संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले. नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापन कक्षांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १६७ महिला बचत गटांतील २०० महिला या कामी योगदान देत आहे. तसेच दुसऱ्यांदा गावागावात घाणीच्या ठिकाणी, रस्त्याच्याकडेला, नालीवर किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. गावातील दिव्यांगांना अन्नधान्य, सॅनिटायजर, साबण यासह जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये याची खबरदारी घेऊन ग्रामपंचायतीमार्फत इतर उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहे.नियमांचे पालन करणे आवश्यककोरोना आजार आणि त्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी लक्षात घेता ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना शक्य तेवढ्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याउपरही काही अडचण असल्यास ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बीडीओ राजीव शिंदे यांनी केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.
५० हजार नागरिकांना मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST
मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापन कक्षांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १६७ महिला बचत गटांतील २०० महिला या कामी योगदान देत आहे.
५० हजार नागरिकांना मास्क
ठळक मुद्देदारव्हा पंचायत समितीचा पुढाकार : कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना