शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार नागरिकांना मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापन कक्षांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १६७ महिला बचत गटांतील २०० महिला या कामी योगदान देत आहे.

ठळक मुद्देदारव्हा पंचायत समितीचा पुढाकार : कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील ५० हजारांवर नागरिकांना मास्कचे मोफत सुरक्षा कवच देण्याचा निर्णय पंचायत समितीने घेतला. त्यानुसार ३० हजार मास्क तयार झाले आहे.गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ही जबाबदारी घेतली. बचत गटामार्फत मास्क तयार करण्यात येत असून इतर उपाययोजना व गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या खोकला, शिंकण्याने संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले. नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापन कक्षांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १६७ महिला बचत गटांतील २०० महिला या कामी योगदान देत आहे. तसेच दुसऱ्यांदा गावागावात घाणीच्या ठिकाणी, रस्त्याच्याकडेला, नालीवर किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. गावातील दिव्यांगांना अन्नधान्य, सॅनिटायजर, साबण यासह जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये याची खबरदारी घेऊन ग्रामपंचायतीमार्फत इतर उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहे.नियमांचे पालन करणे आवश्यककोरोना आजार आणि त्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी लक्षात घेता ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना शक्य तेवढ्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याउपरही काही अडचण असल्यास ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बीडीओ राजीव शिंदे यांनी केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या