शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

शहीद स्मारक अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:55 IST

येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.

ठळक मुद्देराजकीय पक्षांचे दुर्लक्ष : कळंब नगर पंचायतीला बांधकामाचा मुहूर्तच मिळेना

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज काळे यांनी हा विषय विरोधी पक्षात असताना अनेकदा जोरदारपणे लाऊन धरला होता. उपोषणाचेही हत्यार त्यांनी उपसले होते. त्यामुळेच ग्रामपंचायत अस्तित्वात असताना मागासक्षेत्र अनुदान निधीतून स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात आली़ परंतु मागील दहा वर्षांपासून स्मारक बांधकामाला मुहूर्तच सापडलेला नाही़दुसरीकडे स्मारक समिती नेमणाºयांनी समितीत असण्यातच धन्यता मानली. त्यापुढे त्यांचे पाऊल सरकलेच नाही. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. महत्वाचे म्हणजे ज्यांनी हा विषय सातत्याने उपस्थित केला तेच मनोज काळे आता उपनगराध्यक्ष आहे. त्यांनी सत्ता आली तेव्हापासून शहीद स्मारकाचा विषय बाजूला ठेवला. विरोधी पक्षात असताना शहीद स्मारकासाठी रान उठविणारेच आता सत्तेत असूनही तोंड उघडायला तयार नाही, ही शोकांतिका आहे.देश पारतंत्र्यात असताना तालुक्यातील वीरांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन इंग्रज राजवटीच्या विरोधात लढ्यात उडी घेतली़ यामध्ये रामभाऊ महादेव माळी़, वासूदेव दाजीबा आष्टीकर, महादेव शिवराम माळी व चंपत मराठा या चौघांना वीरमरण आले़ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील इंदिरा गांधी चौकात १९७३ साली शहीद स्मारक उभारण्यात आले़ परंतु काळाच्या ओघात याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले़ वास्तविक शहीद स्मारकांचे सौंदर्यीकरण व स्मृती जपण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे़ मागील ५० वर्षात मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी स्मारकांच्या सौंदर्यीकरणासाठी अनेकदा आश्वासन दिले़ परंतु शब्द पाळला नाही, ही वास्तविकता आहे.