शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शहीद स्मारक अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:55 IST

येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.

ठळक मुद्देराजकीय पक्षांचे दुर्लक्ष : कळंब नगर पंचायतीला बांधकामाचा मुहूर्तच मिळेना

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज काळे यांनी हा विषय विरोधी पक्षात असताना अनेकदा जोरदारपणे लाऊन धरला होता. उपोषणाचेही हत्यार त्यांनी उपसले होते. त्यामुळेच ग्रामपंचायत अस्तित्वात असताना मागासक्षेत्र अनुदान निधीतून स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात आली़ परंतु मागील दहा वर्षांपासून स्मारक बांधकामाला मुहूर्तच सापडलेला नाही़दुसरीकडे स्मारक समिती नेमणाºयांनी समितीत असण्यातच धन्यता मानली. त्यापुढे त्यांचे पाऊल सरकलेच नाही. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. महत्वाचे म्हणजे ज्यांनी हा विषय सातत्याने उपस्थित केला तेच मनोज काळे आता उपनगराध्यक्ष आहे. त्यांनी सत्ता आली तेव्हापासून शहीद स्मारकाचा विषय बाजूला ठेवला. विरोधी पक्षात असताना शहीद स्मारकासाठी रान उठविणारेच आता सत्तेत असूनही तोंड उघडायला तयार नाही, ही शोकांतिका आहे.देश पारतंत्र्यात असताना तालुक्यातील वीरांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन इंग्रज राजवटीच्या विरोधात लढ्यात उडी घेतली़ यामध्ये रामभाऊ महादेव माळी़, वासूदेव दाजीबा आष्टीकर, महादेव शिवराम माळी व चंपत मराठा या चौघांना वीरमरण आले़ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील इंदिरा गांधी चौकात १९७३ साली शहीद स्मारक उभारण्यात आले़ परंतु काळाच्या ओघात याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले़ वास्तविक शहीद स्मारकांचे सौंदर्यीकरण व स्मृती जपण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे़ मागील ५० वर्षात मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी स्मारकांच्या सौंदर्यीकरणासाठी अनेकदा आश्वासन दिले़ परंतु शब्द पाळला नाही, ही वास्तविकता आहे.