शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लाजवंतीच्या विवाहात प्रत्येक जण वऱ्हाडी अन् पालक

By admin | Updated: December 13, 2015 02:26 IST

बिन बुलाये मेहमान... ही म्हण इतरवेळी इतरांना चिडवण्यासाठी हक्काची. पण शनिवारी सायंकाळी यवतमाळातील प्रत्येक संवेदनशील माणूस हीच पदावली बिरूद म्हणून स्वत:हून मिरवत होता.

यवतमाळ : बिन बुलाये मेहमान... ही म्हण इतरवेळी इतरांना चिडवण्यासाठी हक्काची. पण शनिवारी सायंकाळी यवतमाळातील प्रत्येक संवेदनशील माणूस हीच पदावली बिरूद म्हणून स्वत:हून मिरवत होता. सोहळाच तसा होता. अनाथ लाजवंती आणि नव्या विचाराचा श्रीराम या उभयतांचा सामाजिक विवाह सोहळा यवतमाळला नवी दिशा देणारा ठरला. या सोहळ्यातील हजारो माणसांची गर्दी म्हणजेच एक कुटुंब बनले होते. जात-पात, धर्म विसरून प्रत्येक जण भारतीय बनला होता. गर्दीतला प्रत्येक जण वऱ्हाडीही होता अन् वधू-वरांचा पालकही!शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या लाजवंती आणि दिग्रस येथील श्रीराम सरमोकदम यांचा हा विवाह. वझ्झर (जि. अमरावती) येथील बालगृहात लहानाची मोठी झालेली लाजवंती दिग्रसची सून झाली. यवतमाळातील नंदूरकर महाविद्यालयाच्या पटांगणात सायंकाळी हजारोंच्या हजेरीत लाजवंती-श्रीरामवर आशीर्वादाच्या अक्षता उधळल्या. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता याच ठिकाणी वैदिक पद्धतीने विवाहविधी पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी लाजवंतीचे कन्यादान केले. सकाळी झालेल्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पालकमंत्री लाजवंतीचे पालक या नात्याने स्वत: दारात उभे राहून डोक्यावर फेटा बांधून पाहुण्यांचे स्वागत करीत होते. तर सभागृहात बसलेल्या पाहुणे मंडळींची वास्तपूस्त करण्यासाठी खास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह जातीने लक्ष घालत होते. श्रीमंता घरी लक्ष्मी पाणी भरते म्हणतात. पण प्रामाणिक माणसांच्या दारात विद्वता वास करते, हे या सोहळ्यात पदोपदी जाणवत राहिले. शंकरबाबांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे हा विवाह ‘सामाजिक’ बनला. अन् त्यांच्याच प्रांजळ प्रयत्नांना मनोमन सलाम करत पालकमंत्री, खासदार, विविध आमदार, जिल्हाधिकारी, एसपी असे अधिकारी स्वत: पाहुण्यांची सरबराई करीत होते. सायंकाळी ६ वाजतापासून नंदूरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो सद्गृहस्थांनी धाव घेतली. अनेक जणांना औपचारिक निमंत्रणही नव्हते. पण सारेच आले. आपण एका क्रांतिकारी क्षणाचे साक्षीदार होत आहोत, याच भावनेने वऱ्हाडी जमले. आशीर्वादांनी ओतप्रोत भरलेल्या गर्दीतच अनाथ लाजवंतीचा उल्लेख ‘चिंसौकां’ असा झाला अन् तिच्या चर्येवरचे भावही नव्या नवरीला साजेसेच खुलून गेले. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सुभाष राय, ‘लोकमत’चे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, डॉ. प्रकाश नंदूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, एसपी अखिलेखकुमार सिंग यांनी लाजवंतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.