शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लाजवंतीच्या विवाहात प्रत्येक जण वऱ्हाडी अन् पालक

By admin | Updated: December 13, 2015 02:26 IST

बिन बुलाये मेहमान... ही म्हण इतरवेळी इतरांना चिडवण्यासाठी हक्काची. पण शनिवारी सायंकाळी यवतमाळातील प्रत्येक संवेदनशील माणूस हीच पदावली बिरूद म्हणून स्वत:हून मिरवत होता.

यवतमाळ : बिन बुलाये मेहमान... ही म्हण इतरवेळी इतरांना चिडवण्यासाठी हक्काची. पण शनिवारी सायंकाळी यवतमाळातील प्रत्येक संवेदनशील माणूस हीच पदावली बिरूद म्हणून स्वत:हून मिरवत होता. सोहळाच तसा होता. अनाथ लाजवंती आणि नव्या विचाराचा श्रीराम या उभयतांचा सामाजिक विवाह सोहळा यवतमाळला नवी दिशा देणारा ठरला. या सोहळ्यातील हजारो माणसांची गर्दी म्हणजेच एक कुटुंब बनले होते. जात-पात, धर्म विसरून प्रत्येक जण भारतीय बनला होता. गर्दीतला प्रत्येक जण वऱ्हाडीही होता अन् वधू-वरांचा पालकही!शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या लाजवंती आणि दिग्रस येथील श्रीराम सरमोकदम यांचा हा विवाह. वझ्झर (जि. अमरावती) येथील बालगृहात लहानाची मोठी झालेली लाजवंती दिग्रसची सून झाली. यवतमाळातील नंदूरकर महाविद्यालयाच्या पटांगणात सायंकाळी हजारोंच्या हजेरीत लाजवंती-श्रीरामवर आशीर्वादाच्या अक्षता उधळल्या. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता याच ठिकाणी वैदिक पद्धतीने विवाहविधी पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी लाजवंतीचे कन्यादान केले. सकाळी झालेल्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पालकमंत्री लाजवंतीचे पालक या नात्याने स्वत: दारात उभे राहून डोक्यावर फेटा बांधून पाहुण्यांचे स्वागत करीत होते. तर सभागृहात बसलेल्या पाहुणे मंडळींची वास्तपूस्त करण्यासाठी खास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह जातीने लक्ष घालत होते. श्रीमंता घरी लक्ष्मी पाणी भरते म्हणतात. पण प्रामाणिक माणसांच्या दारात विद्वता वास करते, हे या सोहळ्यात पदोपदी जाणवत राहिले. शंकरबाबांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे हा विवाह ‘सामाजिक’ बनला. अन् त्यांच्याच प्रांजळ प्रयत्नांना मनोमन सलाम करत पालकमंत्री, खासदार, विविध आमदार, जिल्हाधिकारी, एसपी असे अधिकारी स्वत: पाहुण्यांची सरबराई करीत होते. सायंकाळी ६ वाजतापासून नंदूरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो सद्गृहस्थांनी धाव घेतली. अनेक जणांना औपचारिक निमंत्रणही नव्हते. पण सारेच आले. आपण एका क्रांतिकारी क्षणाचे साक्षीदार होत आहोत, याच भावनेने वऱ्हाडी जमले. आशीर्वादांनी ओतप्रोत भरलेल्या गर्दीतच अनाथ लाजवंतीचा उल्लेख ‘चिंसौकां’ असा झाला अन् तिच्या चर्येवरचे भावही नव्या नवरीला साजेसेच खुलून गेले. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सुभाष राय, ‘लोकमत’चे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, डॉ. प्रकाश नंदूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, एसपी अखिलेखकुमार सिंग यांनी लाजवंतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.