शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी मुला-मुलींचा विवाह मेळावा

By admin | Updated: December 16, 2015 02:46 IST

आर्थिक तंगीपायी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची प्रेरणा देण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियान सुरू केले आहे.

सीईओंचा पुढाकार : बळीराजा चेतना अभियानाचे पुढचे पाऊल, २८ फेब्रुवारीला होणार सोहळायवतमाळ : आर्थिक तंगीपायी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची प्रेरणा देण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलामुलींचा विवाह मेळावा घेण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. हा विवाह मेळावा येत्या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी होणार आहे. त्यातून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. बळीराजा चेतना अभियानात गावोगावी भजन, कीर्तन, पथनाट्य असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. स्थानिक कलावंत आणि प्रबोधनकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रबोधनासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा तातडीने देण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सामूहिक विवाह मेळाव्याची संकल्पना मांडली. त्याला जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाकडून दुजोरा मिळाला. २८ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा विवाह मेळावा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी कुटुंबीयांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून संबंधित गावातील शेतकरी कुटुंबातील उपवर मुलेमुली, आर्थिक तंगीत असलेली शेतकरी कुुटुंबे यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हाभरातील माहिती गोळा झाल्यानंतर या मेळाव्याचे अंतिम नियोजन केले जाणार आहे. शिवाय इच्छूक शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना स्वत:हूनही या मेळाव्यासाठी आपली नाव नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. मेळाव्यातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास विवाह मेळाव्यापूर्वी परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या कामासाठी शासनाचे विविध विभाग, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आदींचीही मदत घेतली जाणार आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे प्रामुख्याने मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या खर्चाचा मोठा प्रश्न असतो. या दोन खर्चांची पूर्ती करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आपली नाचक्की झाल्याची भावना निर्माण होते. त्यातूनच खचलेला शेतकरी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रशासनाने बळीराजा चेतना अभियानात पुढचे पाऊल टाकत सामूहिक विवाह मेळाव्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)मुलीच्या सासरी शौचालयाची भेटशेतकरी मुलामुलींच्या सामूहिक विवाह मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. या मेळाव्यामध्ये लग्न केल्यानंतर मुलगी सासरी जाण्यापूर्वी सासरच्या घरी प्रशासनातर्फे पक्के शौचालय बांधून देण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या आईच्या नावाने १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर विवाह मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांसाठी प्रतिलाभार्थी शासनातर्फे दोन हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.