शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

By admin | Updated: April 27, 2016 02:34 IST

वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामाचे आणखी दोन बळी ठरले. तालुक्यातील सराटी येथील शिक्षक व त्यांच्या पत्नीला या कामामुळे आपला जीव गमवावा लागला.

शिक्षकाचा समावेश : रस्ता रूंदीकरणाने घेतला बळीमारेगाव : वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामाचे आणखी दोन बळी ठरले. तालुक्यातील सराटी येथील शिक्षक व त्यांच्या पत्नीला या कामामुळे आपला जीव गमवावा लागला. ही घटना सोमवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.गजानन विठ्ठल मत्ते (४२) व त्यांची पत्नी वैशाली (३५), अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी मत्ते हे पत्नी वैशालीसह दुचाकीने (एम.एच.२९-ए.पी.९४0४) चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे एका लग्नाला गेले होते. तेथून सायंकाळी गावाकडे परत येत असताना येथील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयाजवळ अपघात झाला. रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने एक मार्ग बंद करण्यासाठी रस्त्यावर ठेवून असलेल्या लोखंडी फलकाला दुचाकी धडकल्याने दोघेही डिव्हायडरच्या भिंतीवर आदळले. दोघांच्याही डोक्याला जबर मार बसला. गजानन यांचे दोन्हीही पाय अनेक ठिकाणी तुटले. पोलिसांनी दोन्हीही जखमींना प्रथम येथील ग्रामीण रूग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रवाना केले. मात्र गजानन यांचा मारेगाव-वणी प्रवासादरम्यान वाटेतच मृत्यू झाला. तर वणी येथील रूग्णालयात त्यांची पत्नी वैशाली यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे सराटीवर शोककळा पसरली आहे.चौपदरी मार्ग ठरतोय यमदूतआत्तापर्यंत वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सोमवारीही एका बाजूचे डांबरीकरणाचे काम सुरू असताना लोखंडी बोर्ड व दगड लावून दुसऱ्या बाजूचा मार्ग बंद करण्यात आला होता. तेथे रिफ्लेक्टर लावले नव्हते. परिणामी समोरून आलेल्या वाहनाच्या लाईटने मत्ते दाम्पत्य दिपले असावे. त्यामुळे रस्ता बंद असल्याचे त्यांना कळलेच नाही आणि अपघात घडला असावा, असा कयास पोलिसांनी वर्तविला आहे. (शहर प्रतिनिधी)दोन मुलांचे छत्र हरविले गजानन मत्ते यांना दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा नागपूर येथे बी.ई. करीत आहे. दुसरा लहान मुलगा गावातच दहावीत शिकत आहे. आई-वडिलाच्या अपघाती मृत्यूने या भावंडांच्या डोक्यावरील छत्र हरविले आहे. गजानन मत्ते यांनी प्रथम सराटीनजीकच एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभी पोड येथे वस्तीशाळा शिक्षक म्हणून कार्य केले. वस्तीशाळा बंद झाल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेने आपल्या सेवेत सामावून घेतले. कुंभी पोड येथे आता वस्तीशाळेऐवजी पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. गेल्या चार वर्षांपासून गजानन तेथेच सहायक शिक्षक म्हणून कार्य करीत होते. पूर्णवेळ शिक्षक म्हणून त्यांची केवळ चारच वर्षांची सेवा झाली आहे. अपघातात त्यांचा बळी गेल्याने कुंभी पोडातील कोलाम बांधवांनीही हळहळ व्यक्त केली.