शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

By admin | Updated: April 27, 2016 02:34 IST

वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामाचे आणखी दोन बळी ठरले. तालुक्यातील सराटी येथील शिक्षक व त्यांच्या पत्नीला या कामामुळे आपला जीव गमवावा लागला.

शिक्षकाचा समावेश : रस्ता रूंदीकरणाने घेतला बळीमारेगाव : वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामाचे आणखी दोन बळी ठरले. तालुक्यातील सराटी येथील शिक्षक व त्यांच्या पत्नीला या कामामुळे आपला जीव गमवावा लागला. ही घटना सोमवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.गजानन विठ्ठल मत्ते (४२) व त्यांची पत्नी वैशाली (३५), अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी मत्ते हे पत्नी वैशालीसह दुचाकीने (एम.एच.२९-ए.पी.९४0४) चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे एका लग्नाला गेले होते. तेथून सायंकाळी गावाकडे परत येत असताना येथील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयाजवळ अपघात झाला. रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने एक मार्ग बंद करण्यासाठी रस्त्यावर ठेवून असलेल्या लोखंडी फलकाला दुचाकी धडकल्याने दोघेही डिव्हायडरच्या भिंतीवर आदळले. दोघांच्याही डोक्याला जबर मार बसला. गजानन यांचे दोन्हीही पाय अनेक ठिकाणी तुटले. पोलिसांनी दोन्हीही जखमींना प्रथम येथील ग्रामीण रूग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रवाना केले. मात्र गजानन यांचा मारेगाव-वणी प्रवासादरम्यान वाटेतच मृत्यू झाला. तर वणी येथील रूग्णालयात त्यांची पत्नी वैशाली यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे सराटीवर शोककळा पसरली आहे.चौपदरी मार्ग ठरतोय यमदूतआत्तापर्यंत वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सोमवारीही एका बाजूचे डांबरीकरणाचे काम सुरू असताना लोखंडी बोर्ड व दगड लावून दुसऱ्या बाजूचा मार्ग बंद करण्यात आला होता. तेथे रिफ्लेक्टर लावले नव्हते. परिणामी समोरून आलेल्या वाहनाच्या लाईटने मत्ते दाम्पत्य दिपले असावे. त्यामुळे रस्ता बंद असल्याचे त्यांना कळलेच नाही आणि अपघात घडला असावा, असा कयास पोलिसांनी वर्तविला आहे. (शहर प्रतिनिधी)दोन मुलांचे छत्र हरविले गजानन मत्ते यांना दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा नागपूर येथे बी.ई. करीत आहे. दुसरा लहान मुलगा गावातच दहावीत शिकत आहे. आई-वडिलाच्या अपघाती मृत्यूने या भावंडांच्या डोक्यावरील छत्र हरविले आहे. गजानन मत्ते यांनी प्रथम सराटीनजीकच एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभी पोड येथे वस्तीशाळा शिक्षक म्हणून कार्य केले. वस्तीशाळा बंद झाल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेने आपल्या सेवेत सामावून घेतले. कुंभी पोड येथे आता वस्तीशाळेऐवजी पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. गेल्या चार वर्षांपासून गजानन तेथेच सहायक शिक्षक म्हणून कार्य करीत होते. पूर्णवेळ शिक्षक म्हणून त्यांची केवळ चारच वर्षांची सेवा झाली आहे. अपघातात त्यांचा बळी गेल्याने कुंभी पोडातील कोलाम बांधवांनीही हळहळ व्यक्त केली.