शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या गर्दीने बाजार फुलला

By admin | Updated: June 13, 2017 01:21 IST

यावर्षी कधी नव्हे ते मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.

पावसाची हजेरी : पेरणीसाठी लगबग, कृषी केंद्रांमध्ये वाढली गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : यावर्षी कधी नव्हे ते मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. पुसद तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने पेरणीची लगबग वाढली आहे. बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची पुसदच्या बाजारात गर्दी दिसू लागली आहे. कृषी केंद्रात शेतकरी बियाण्यांची चाचपणी करीत आहे.पुसद शहरासह तालुक्यात गुरुवारपासून म्हणजे मृग नक्षत्राच्या दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली. तीन तासात ५५ मिमी पाऊस झाला. शुक्रवारी पुन्हा दोन तास पावसाने हजेरी लावली. १६ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री १० वाजेपर्यंत सुरू होता. या कालावधीत ३२ मिमीएवढा पाऊस झाला. मान्सूनपूर्व ८ मिमी एवढा झाला होता. आतापर्यंत १११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण याच पेरणीवर अवलंबून असल्याने शेतकरी या हंगामाच्या पेरणीसाठी मोठी काळजी करतो. कोणतीही कसर ठेवत नाही. शेतकऱ्यांसोबत बाजारपेठेचे भविष्यही याच हंगामावर अवलंबून असते. बाजारपेठेचा मुख्य कणा हा खरीप हंगामातील पेरणी असतो. व्यापाऱ्यांची खरीप हंगामापासून सुगी सुरू होते. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर बाजारपेठ शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलतो. यंदा मृगनक्षत्रात पावसाने हजेरी बऱ्याच वर्षानंतर लावली. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कामाला वेग आला असून बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे.यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी नगदी पिकाकडे वळल्याचे दिसत आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीनचा पेरा होणार आहे. यंदा कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिके सारखेच क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सध्या पुसदच्या बाजारात शेतकरी गर्दी करत असून सर्वच कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे.खरेदी केलेल्या बियाण्यांचे पक्के बिल घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहनदिग्रस : शेतकऱ्यांनी शासनाने बंदी घातलेली कोणतीही बियाणी घेवून नये. तसेच कोणत्याही कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र चालकाकडून पक्के बिल घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी.एस. बागडे यांनी केले आहे. अवैध बियाणे विक्री केल्यास त्वरित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पेरणी झाल्यानंतर बियाण्यांची पिशवी जपून ठेवावी. तसेच पिशवी खालून फोडावी. बोगस बियाणे निघाल्यास कारवाई करण्यास उपयोगी येईल. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना जागरूक राहावे, असे त्यांनी सांगितले.