शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शेतकऱ्यांच्या गर्दीने बाजार फुलला

By admin | Updated: June 13, 2017 01:21 IST

यावर्षी कधी नव्हे ते मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.

पावसाची हजेरी : पेरणीसाठी लगबग, कृषी केंद्रांमध्ये वाढली गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : यावर्षी कधी नव्हे ते मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. पुसद तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने पेरणीची लगबग वाढली आहे. बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची पुसदच्या बाजारात गर्दी दिसू लागली आहे. कृषी केंद्रात शेतकरी बियाण्यांची चाचपणी करीत आहे.पुसद शहरासह तालुक्यात गुरुवारपासून म्हणजे मृग नक्षत्राच्या दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली. तीन तासात ५५ मिमी पाऊस झाला. शुक्रवारी पुन्हा दोन तास पावसाने हजेरी लावली. १६ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री १० वाजेपर्यंत सुरू होता. या कालावधीत ३२ मिमीएवढा पाऊस झाला. मान्सूनपूर्व ८ मिमी एवढा झाला होता. आतापर्यंत १११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण याच पेरणीवर अवलंबून असल्याने शेतकरी या हंगामाच्या पेरणीसाठी मोठी काळजी करतो. कोणतीही कसर ठेवत नाही. शेतकऱ्यांसोबत बाजारपेठेचे भविष्यही याच हंगामावर अवलंबून असते. बाजारपेठेचा मुख्य कणा हा खरीप हंगामातील पेरणी असतो. व्यापाऱ्यांची खरीप हंगामापासून सुगी सुरू होते. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर बाजारपेठ शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलतो. यंदा मृगनक्षत्रात पावसाने हजेरी बऱ्याच वर्षानंतर लावली. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कामाला वेग आला असून बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे.यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी नगदी पिकाकडे वळल्याचे दिसत आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीनचा पेरा होणार आहे. यंदा कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिके सारखेच क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सध्या पुसदच्या बाजारात शेतकरी गर्दी करत असून सर्वच कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे.खरेदी केलेल्या बियाण्यांचे पक्के बिल घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहनदिग्रस : शेतकऱ्यांनी शासनाने बंदी घातलेली कोणतीही बियाणी घेवून नये. तसेच कोणत्याही कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र चालकाकडून पक्के बिल घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी.एस. बागडे यांनी केले आहे. अवैध बियाणे विक्री केल्यास त्वरित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पेरणी झाल्यानंतर बियाण्यांची पिशवी जपून ठेवावी. तसेच पिशवी खालून फोडावी. बोगस बियाणे निघाल्यास कारवाई करण्यास उपयोगी येईल. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना जागरूक राहावे, असे त्यांनी सांगितले.