शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बाजार समित्यांना केवळ तुरीचे टार्गेट

By admin | Updated: May 25, 2017 01:15 IST

तूर खरेदीसाठी केवळ आठ दिवस सध्या बाकी आहेत, असे असले तरी मोठया प्रमाणात तुरीची खरेदी व्हायची आहे.

वेग वाढविण्याचे निर्देश : शुक्रवारपासून इतर खरेदी बंदच्या हालचालीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तूर खरेदीसाठी केवळ आठ दिवस सध्या बाकी आहेत, असे असले तरी मोठया प्रमाणात तुरीची खरेदी व्हायची आहे. यामुळे शेतकरी नाईलाजास्तव खुल्या बाजारात तूर नेत आहेत. शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी बाजार समितीमध्ये अधिकाधिक तूर खरेदी करणे गरजचे आहे. त्यासाठी बाजार समितीने तूर खरेदी प्रक्रियेचा वेग वाढवून केवळ तूर खरेदीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे बाजार समितीमध्ये शुक्रवारपासून बुधवारपर्यंत केवळ तूर खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान इतर शेतमालास ब्रेक बसण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रतापसिंह यांनी बुधवारी जिल्ह्यातील तूर खरेदीचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हा उपनिबंधक, मार्केटींग फेडरेशन अधिकारी, वखार महामंडळाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यासोबतच शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले होेते.यावेळी सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. तूर खरेदी वेगाने करता यावी म्हणून काट्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या गेल्या. यासोबतच पावसाचा कुठलाही फटका तुरीला बसू नये म्हणून शेडमध्ये तुरीचे मोजमाप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे पुढील आठ दिवस इतर शेतमालांचे मोजमाप करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडणार आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी बाजार समितीमध्ये इतर शेतमालाचा लीलाव तूर्त बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जितके मोजमाप करता येतील तितकेच टोकन वाटण्याचे निर्देश बाजार समित्यांना देण्यात आले आहे. प्रत्येक टोकनधारकांच्या तुरीचे मोजमाप झालेच पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सर्व सबंधितांना दिल्या. बाजार समितीमध्ये तुरीच्या सरकारी थप्प्याट्रान्सपोर्ट करण्यासाठी वाहने मिळने अवघड झाले आहे. तूर घेवून गेलेल्या ट्रकचा नंबरच लागत नाही. त्यामुळे खरेदी झालेल्या तुरीची गंजी शासकीय संकलन केंद्रांवरच लागली आहे. या ठिकणी इतर शेतमाल विक्रीसाठी जागाच शिल्लक नाही. यामुळे नेहमी व्यापारी गंज्यांवर प्रश्न निर्माण करणाऱ्या यंत्रणेवर प्रथमच बाजार समितीच्या शेडमध्ये थप्पी लावण्याच्या प्रश्नात अडकली आहे.तीन दिवसांचा ‘अल्टीमेटम’ टोकनधारक शेतकऱ्यांना तुरीचा नंबर लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकरी लग्न अथवा काही कारणाने बाहेरगावी गेल्याचे निरोप येत आहेत. या प्रकरणात तीन दिवसाची प्रतिक्षा करण्यात यावी, यानंतर टोकन रद्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिले.