शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांना केवळ तुरीचे टार्गेट

By admin | Updated: May 25, 2017 01:15 IST

तूर खरेदीसाठी केवळ आठ दिवस सध्या बाकी आहेत, असे असले तरी मोठया प्रमाणात तुरीची खरेदी व्हायची आहे.

वेग वाढविण्याचे निर्देश : शुक्रवारपासून इतर खरेदी बंदच्या हालचालीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तूर खरेदीसाठी केवळ आठ दिवस सध्या बाकी आहेत, असे असले तरी मोठया प्रमाणात तुरीची खरेदी व्हायची आहे. यामुळे शेतकरी नाईलाजास्तव खुल्या बाजारात तूर नेत आहेत. शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी बाजार समितीमध्ये अधिकाधिक तूर खरेदी करणे गरजचे आहे. त्यासाठी बाजार समितीने तूर खरेदी प्रक्रियेचा वेग वाढवून केवळ तूर खरेदीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे बाजार समितीमध्ये शुक्रवारपासून बुधवारपर्यंत केवळ तूर खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान इतर शेतमालास ब्रेक बसण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रतापसिंह यांनी बुधवारी जिल्ह्यातील तूर खरेदीचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हा उपनिबंधक, मार्केटींग फेडरेशन अधिकारी, वखार महामंडळाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यासोबतच शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले होेते.यावेळी सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. तूर खरेदी वेगाने करता यावी म्हणून काट्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या गेल्या. यासोबतच पावसाचा कुठलाही फटका तुरीला बसू नये म्हणून शेडमध्ये तुरीचे मोजमाप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे पुढील आठ दिवस इतर शेतमालांचे मोजमाप करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडणार आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी बाजार समितीमध्ये इतर शेतमालाचा लीलाव तूर्त बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जितके मोजमाप करता येतील तितकेच टोकन वाटण्याचे निर्देश बाजार समित्यांना देण्यात आले आहे. प्रत्येक टोकनधारकांच्या तुरीचे मोजमाप झालेच पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सर्व सबंधितांना दिल्या. बाजार समितीमध्ये तुरीच्या सरकारी थप्प्याट्रान्सपोर्ट करण्यासाठी वाहने मिळने अवघड झाले आहे. तूर घेवून गेलेल्या ट्रकचा नंबरच लागत नाही. त्यामुळे खरेदी झालेल्या तुरीची गंजी शासकीय संकलन केंद्रांवरच लागली आहे. या ठिकणी इतर शेतमाल विक्रीसाठी जागाच शिल्लक नाही. यामुळे नेहमी व्यापारी गंज्यांवर प्रश्न निर्माण करणाऱ्या यंत्रणेवर प्रथमच बाजार समितीच्या शेडमध्ये थप्पी लावण्याच्या प्रश्नात अडकली आहे.तीन दिवसांचा ‘अल्टीमेटम’ टोकनधारक शेतकऱ्यांना तुरीचा नंबर लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकरी लग्न अथवा काही कारणाने बाहेरगावी गेल्याचे निरोप येत आहेत. या प्रकरणात तीन दिवसाची प्रतिक्षा करण्यात यावी, यानंतर टोकन रद्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिले.