शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

मारेगावात पुन्हा तापाची साथ

By admin | Updated: October 27, 2014 22:45 IST

वातावरणात अचानक झालेला बदल, प्रशासनाचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे तालुक्यात तापाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील ग्रामस्थांना ताप, सर्दी, खोकल्यामुळे हैराण करुन सोडले आहे.

मारेगाव : वातावरणात अचानक झालेला बदल, प्रशासनाचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे तालुक्यात तापाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील ग्रामस्थांना ताप, सर्दी, खोकल्यामुळे हैराण करुन सोडले आहे.तालुक्यासाठी तापाची साथ नवीन गोष्ट नाही़ वारंवार साथ सुरूच असते. त्यामुळे तालुक्यात आरोग्य विभाग नावापुरताच उरला आहे. शासनाच्या योजना कागदोपत्री राबविणे, एवढ्यासाठीच हा विभाग तालुक्यात कार्यरत असल्याचे दिसत आहे. या विभागाचे जवळपास सर्वच कर्मचारी बाहेर गावावरून अप-डाऊन करतात़ त्यामुळे कुणाचेच कुणावर नियंत्रण नसल्याने सर्वांची मनमानीच सुरू आहे़ आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम ठप्प असल्याने आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने वातावरणात थोडा जरी बदला झाला, तरी तालुक्यात तापाची साथ डोके वर काढते़ गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाला़ एक दिवस थंडी पडली, त्यापूर्वी कडक ऊन्ह तापले. गेल्या चार दिवसांपासून सूर्याचे दर्शन दुरापास्त होऊन अधूनमधून पाऊसही पडत आहे. त्यामुळे वातावरण दमट झाल्याने डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे़ या विपरीत वातावरणाचा परिणाम ग्रामीण जनतेच्या आरोग्यावर होत आहे़ ग्रामस्थांना थंडी वाजून ताप येणे, सर्दी, खोकला, अंग दुखणे आदी आजाराने ग्रासले आहे. मात्र शासकीय आरोग्य सेवेचा पुरेसा लाभ जनतेला मिळत नाही. परिणामी खिशात पैसा नसतानाही ग्रामस्थांना खासगी डॉक्टरांकडे धाव घेऊन उपचार करवून घ्यावे लागत आहे़ खासगी डॉक्टरही संधीचा पुरेपुर लाभ घेताना दिसत आहे़ बरेचदा रूग्णांना सलाईनची आवश्यकता नसतानाही खासगी डॉक्टर रूग्णांना सलाईन लावून आपला आर्थिक लाभ करून घेत आहे़ ग्रामीण भागात औषधी दुकाने नसल्याने डॉक्टरच तपासणीसोबतच औषधी विकण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. औषधे जादा प्रमाणात खपविण्याच्या नादात रूग्णांना वारेमाप औषधे दिले जात आहे़ त्यामुळे रूग्णांना नाहक आर्थिक झळ सोसावी लागत आहे़शासकीय आरोग्य सेवा ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने बोगस डॉक्टरांनी या संधीचा लाभ उठविणे सुरू केले आहे़ मारेगाव तालुक्यात खुलेआम बोगस डॉक्टरांची प्रॅक्टीस सुरू आहे़ त्यांना कुणाचाच धाक नसल्याने बोगस डॉक्टर खुलेआम जनतेची आर्थिक लूट करीत आहे़ त्यांचे उपचारही अघोरी असतात़ त्यामुळे काही रुग्णांवर अपंगत्वाची वेळ ओढवली आहे़ मात्र उपाय नसल्याने ग्रामस्थांना त्यांच्याकडून उपचार करवून घ्यावे लागत आहे़ अनेकांच्या आरोग्यात काळोख निर्माण करणाऱ्या या डॉक्टरांवर आरोग्य विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ (शहर प्रतिनिधी)