शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात पुन्हा तापाची साथ

By admin | Updated: October 27, 2014 22:45 IST

वातावरणात अचानक झालेला बदल, प्रशासनाचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे तालुक्यात तापाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील ग्रामस्थांना ताप, सर्दी, खोकल्यामुळे हैराण करुन सोडले आहे.

मारेगाव : वातावरणात अचानक झालेला बदल, प्रशासनाचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे तालुक्यात तापाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील ग्रामस्थांना ताप, सर्दी, खोकल्यामुळे हैराण करुन सोडले आहे.तालुक्यासाठी तापाची साथ नवीन गोष्ट नाही़ वारंवार साथ सुरूच असते. त्यामुळे तालुक्यात आरोग्य विभाग नावापुरताच उरला आहे. शासनाच्या योजना कागदोपत्री राबविणे, एवढ्यासाठीच हा विभाग तालुक्यात कार्यरत असल्याचे दिसत आहे. या विभागाचे जवळपास सर्वच कर्मचारी बाहेर गावावरून अप-डाऊन करतात़ त्यामुळे कुणाचेच कुणावर नियंत्रण नसल्याने सर्वांची मनमानीच सुरू आहे़ आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम ठप्प असल्याने आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने वातावरणात थोडा जरी बदला झाला, तरी तालुक्यात तापाची साथ डोके वर काढते़ गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाला़ एक दिवस थंडी पडली, त्यापूर्वी कडक ऊन्ह तापले. गेल्या चार दिवसांपासून सूर्याचे दर्शन दुरापास्त होऊन अधूनमधून पाऊसही पडत आहे. त्यामुळे वातावरण दमट झाल्याने डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे़ या विपरीत वातावरणाचा परिणाम ग्रामीण जनतेच्या आरोग्यावर होत आहे़ ग्रामस्थांना थंडी वाजून ताप येणे, सर्दी, खोकला, अंग दुखणे आदी आजाराने ग्रासले आहे. मात्र शासकीय आरोग्य सेवेचा पुरेसा लाभ जनतेला मिळत नाही. परिणामी खिशात पैसा नसतानाही ग्रामस्थांना खासगी डॉक्टरांकडे धाव घेऊन उपचार करवून घ्यावे लागत आहे़ खासगी डॉक्टरही संधीचा पुरेपुर लाभ घेताना दिसत आहे़ बरेचदा रूग्णांना सलाईनची आवश्यकता नसतानाही खासगी डॉक्टर रूग्णांना सलाईन लावून आपला आर्थिक लाभ करून घेत आहे़ ग्रामीण भागात औषधी दुकाने नसल्याने डॉक्टरच तपासणीसोबतच औषधी विकण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. औषधे जादा प्रमाणात खपविण्याच्या नादात रूग्णांना वारेमाप औषधे दिले जात आहे़ त्यामुळे रूग्णांना नाहक आर्थिक झळ सोसावी लागत आहे़शासकीय आरोग्य सेवा ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने बोगस डॉक्टरांनी या संधीचा लाभ उठविणे सुरू केले आहे़ मारेगाव तालुक्यात खुलेआम बोगस डॉक्टरांची प्रॅक्टीस सुरू आहे़ त्यांना कुणाचाच धाक नसल्याने बोगस डॉक्टर खुलेआम जनतेची आर्थिक लूट करीत आहे़ त्यांचे उपचारही अघोरी असतात़ त्यामुळे काही रुग्णांवर अपंगत्वाची वेळ ओढवली आहे़ मात्र उपाय नसल्याने ग्रामस्थांना त्यांच्याकडून उपचार करवून घ्यावे लागत आहे़ अनेकांच्या आरोग्यात काळोख निर्माण करणाऱ्या या डॉक्टरांवर आरोग्य विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ (शहर प्रतिनिधी)