शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

चौकशी समितीची मॅरॉथान बैठक

By admin | Updated: August 28, 2016 00:07 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केलेली साहित्य खरेदी वांद्यात सापडली आहे. यासाठी नियुक्त चौकशी समितीची शुक्रवारी मॅराथॉन बैठक झाली.

फलित नाही : जिल्हा परिषदेतील कृषी साहित्य खरेदी वांद्यातयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केलेली साहित्य खरेदी वांद्यात सापडली आहे. यासाठी नियुक्त चौकशी समितीची शुक्रवारी मॅराथॉन बैठक झाली. मात्र तूर्तास या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही.कृषी विभागाने गेल्या वर्षांत शेतीसंबंधी विविध साहित्याची खरेदी केली. मात्र या खरेदीत अनियमितता झाली असून भलत्याच पुरवठादारांकडून साहित्य खरेदी करण्यात आल्याचा काही सदस्यांचा आरोप आहे. यासंबंधी त्यांनी तक्रारीही केल्या आहेत. या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने स्थायी समिती सभेत या गौडबंगालाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे या समितीच्या अध्यक्ष आहेत. समितीत उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, अमन गावंडे, दिवाकर राठोड आदींचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी उपाध्यक्ष मांगुळकर यांच्या अध्यक्षतेत स्थायी समिती सभागृहात समितीची बैठक सुरू झाली. बैठकीला प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, दिवाकर राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुयार, देशमुख, कृषी विकास अधिकारी जगन राठोड आदी उपस्थित होते. यावेळी विविध दस्तावेजाची तपासणी करण्यात आली. कृषी साहित्य खरेदीत नेमकी कशी अनियमितता झाली, कृषी विभागाला कसा फटका बसला, यावर चर्चा झाली. मात्र अंतिमत: बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (शहर प्रतिनिधी)समितीच्या वैधतेवर प्रश्नचिन्हबैठकीत समितीच्या वैधतेवरच जगन राठोड यांनी प्रश्न उपस्थित केला. अशी समितीच नेमण्यात येऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच तक्रारदारांना समितीत राहता येते का, असा प्रश्नही केला. काही समिती सदस्यांनीही हा मुद्दा उचलला. यानंतर राठोड यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आले, असे खुद्ध राठोड यांनीच सांगितले. त्यामुळे या समितीच्या निष्कर्षाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीत उभी फूटकृषी विकास अधिकाऱ्यांच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्येच उभी फूट असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांचे काही पदाधिकारी व सदस्य परस्पर विरोधी भूमिका बजावत आहे. काही सदस्य, पदाधिकारी राठोड यांच्या बाजूने, तर काही विरूद्ध बाजूने दिसत असल्याने या संपूर्ण प्रकरणी नेमके कोण खरे व कोण खोटे, असा प्रश्न चर्चीला जात आहे.