शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

झाडीपट्टी असो वा दंडार, साहित्य परंपरांना मराठी मनाने कायमच जपले; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:37 IST

झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार या आणि अशा साहित्य परंपरांना मराठी मनांनी कायम जपल्या आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्दे वणी येथे विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राम शेवाळकर परिसर, वणी ) : विदर्भाची भूमी ही समृद्ध आहे. येथे अनेक गोष्टी पहायला, अनुभवायला मिळतात. झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार या आणि अशा साहित्य परंपरांना मराठी मनांनी कायम जपल्या आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आयोजित येथील राम शेवाळकर परिसरात ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वणीचे आमदार तथा स्वागताध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार राजू तोडसाम, आशुतोष शेवाळकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर, माजी कुलगुरू भालचंद्र चोपने, सुनील कातकडे, विजयराव देशमुख, आमंत्रक शुभदा फडणवीस, मुख्य संयोजक माधवराव सरपटवार, वणी तालुका शाखाध्यक्ष दिलीप अलोणे, नरेंद्र नगरवाला उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऐतिहासिक आणि साहित्य भूमी असलेल्या वणी शहरात आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मला बोलावले, त्याचा मला आनंद आहे. या शहराने अनेक साहित्यरत्न दिलेत, असे सांगत प्राचार्य राम शेवाळकर, लोकनायक बापूजी अणे, वसंत आबाजी डहाके यांच्या नावांचा त्यांनी उल्लेख केला. साहित्य हे कल्पना विलास नाही. साहित्यातून वास्तवता प्रतिबिंबीत होते. समाजनिर्मितीचे कामच साहित्यातून होते, असेही ते म्हणाले. सारगर्भीत साहित्य समाजापुढे येत नाही. अलिकडे संक्रमणाची अवस्था सुरू आहे. तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे मूलभूत साहित्याचे काय होणार, अशीही भीती वाटायला लागते असे सांगून जोपर्यंत मराठी माणूस जीवंत आहे, तोपर्यंत साहित्य संपणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी ना.हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजदत्त संमेलनाध्यक्ष शिरीष देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘बहुगुणी वणी’ या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संचालन प्रा.डॉ.अभिजीत अणे यांनी तर प्रास्ताविक शुभदा फडणवीस यांनी, तर आभार गजानन कासावार यांनी मानले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी संमेलनस्थळी तुडूंब गर्दी केली होती. तत्पूर्वी सकाळी वणी शहरातून गंथदिंडी काढण्यात आली. यात संमेलनाध्यक्ष शिरीष देशपांडे यांच्यासह आयोजन समितीतील पदाधिकारी, शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी तथा नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.समाज घडविण्यात लेखकांचे योगदान - संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडेवणी हे कामगार क्षेत्र असतानाही येथे वाचनाची आवड आहे, ते येथे जमलेल्या गर्दीवरून दिसून येते. समाज घडविण्यामध्ये लेखकांचे महत्वाचे योगदान असून क्रांती घडवून आणण्याची ताकद लेखकांमध्ये असल्याचे प्रतिपादन विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्य