शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नेहरूजींच्या यवतमाळ भेटीने अनेकांना हक्काची शेतजमीन

By admin | Updated: November 13, 2014 23:09 IST

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यवतमाळात आले. त्यांनी एक लाख ३७ हजार हेक्टर भूदानाच्या जमीनिचे वितरण केले. यामुळे हजारो भुमीहीन कुटुंबातील अंधार दूर झाला.

भूदानाच्या जमीनीचे वाटप यवतमाळ : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यवतमाळात आले. त्यांनी एक लाख ३७ हजार हेक्टर भूदानाच्या जमीनिचे वितरण केले. यामुळे हजारो भुमीहीन कुटुंबातील अंधार दूर झाला. चाचा नेहरूंची भेट यवतमाळकरांसाठी कायम मनात घर करून गेली. या ऐतिहासीक स्थळाला यवतमाळकरांनी कायम जपले आहे.विनोबा भावे यांनी भुदान चळवळ जिल्ह्यात राबविली. या चळवळीला गावा गावातून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील जमिनदार आणि मोठया आसामिंनी भुदान चळवळीत जमीनी दान दिल्या. एक लाख ३७ हजार एकर शेतजमीन विनोबाजींना दानपत्रातुन मिळाली. मिळालेल्या जमीनीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप कोणाच्या हस्ते करायचे याबाबत चर्चा झाली, अखेर देशाच्या पंतप्रधानांना बोलविण्यावर सर्वांचे एकमत झाले.या सोहळयाकरिता गोदनी मार्गावरील खुल्या मैदानाची निवड करण्यात आली. सध्याच्या आकाशवाणी केंद्राच्या लगत १८ एप्रिल १९५९ रोजी ही सभा घेण्यात आली. याकार्यक्रमाला पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी नेहरूजींची सभा झाली. ेया सभेत भूमीहीनांना जमीनीचा हक्क देण्यात आला. भुदान यज्ञ मंडळ त्यावेळी नियुक्त करण्यात आले. यामुळे भूमीहीन कुटुंबासाठी हा दिवस सुवर्णमयी होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सभेत झालेले राष्ट्रसंतांचे हे भजन यवतमाळकरांसाठी अजरामर ठरले आहे. हा दिवस जिल्ह्यासाठी अविस्मरणीय असाच होता. त्याची नोंद नगर परिषदेच्या दप्तरी करण्यात आली आहे. या क्षणाची आठवण जपण्यासाठी ऐतिहासीक वास्तु म्हणून उद्यान उभारण्यात आले. गोदनी मार्गावरचे उद्यान आजही अनेकांचे लक्ष वेधुन घेते. येथील भिंतीवर भुदान सभेच्या क्षणाचे चित्रण करण्यात आले आहे. सोबत मनाला प्रसन्न करणारे उद्याण उभारण्यात आले आहे. हे स्थळ आजही पंडितजींच्या यवतमाळ भेटीची आठवण करून देते. (शहर वार्ताहर)