शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अनेक शाळा शौचालयांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:43 IST

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व तीन हजार ५३ शाळांमध्ये मुला-मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालये बांधलेली आहे, असे प्रतिज्ञापत्र जिल्हा परिषदेने पाच वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सादर केले.

ठळक मुद्देसीईओंनी दिले खोटे शपथपत्र : जिल्हा परिषदेतील बनवाबनवी उघड

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व तीन हजार ५३ शाळांमध्ये मुला-मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालये बांधलेली आहे, असे प्रतिज्ञापत्र जिल्हा परिषदेने पाच वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सादर केले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या बनवाबनवीचा शिक्षण समितीतून भंडाफोड केला जात आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुली, शिक्षिकांसाठी स्वतंत्र शौचालये, स्वतंत्र मूत्रीघरे नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये राज्य शासनाला फटकारले होते. शिक्षण सचिवांना न्यायालयात हजर राहण्यास बजावले होते. त्यामुळे सचिवांनी सर्व जिल्हा परिषदांकडून शौचालयांची माहिती मागविली. त्या आधारे त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी पुरेसे स्वतंत्र शौचालय बांधण्यात आल्याचे त्यात म्हटले होते.या प्रतिज्ञापत्रासाठी तत्कालीन सीईओ नवलकिशोर राम यांनीही शिक्षण सचिवांकडे आपले प्रतिज्ञापत्र रवाना केले. ते शिक्षण विभागाच्या माहितीनुसार त्यांनी दिले. त्यात सर्व तीन हजार ५३ शाळांपैकी १३३ शाळांमध्ये मुलांसाठी, तर ९३३ शाळांमध्ये मुलींसाठी जानेवारी २०१२ पर्यंत शौचालये उपलब्ध नव्हती. मात्र, तातडीने बांधकाम करून मार्च २०१२ पर्यंत ही कमतरता भरून काढण्यात आली व सर्वच शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये असल्याचे म्हटले होते.न्यायालयापुढे तद्दन खोटी माहिती सादर करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेतून होत आहे. त्या प्रतिज्ञापत्रानुसार आज जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये उपलब्ध नाहीत. चक्क यवतमाळ शहरातील जिल्हा परिषद शाळेतही मुलींच्या शौचालयांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे खोटी माहिती देणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.