शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मांगलादेवीत भिंत कोसळून वृद्धा ठार

By admin | Updated: July 9, 2016 02:34 IST

जिल्ह्यात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : अतिवृष्टीचा इशारा यवतमाळ : जिल्ह्यात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाने नदी-नाले तुडुंब झाले असून नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे पावसाने भिंत कोसळून वृद्ध महिला ठार झाली. मांगलादेवी येथील पार्वताबाई शंकर सहारे (६७) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पार्वताबाई घराशेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पावसामुळे खिळखिळी झालेली गोठ्याची मातीची भिंत कोसळली. त्या खाली पार्वताबाई दबल्या. हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. तत्काळ नेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे पार्वतीबाईचा पुतण्या अविनाश याचा विवाह रविवारी यवतमाळात आहे. त्यासाठी त्या सहपरिवार जाणार होत्या. परंतु त्यापूर्वीच काळाने डाव साधला. त्यांच्या मागे दोन मुले व मुलगी आहे. पावसामुळे बळी जाण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना होय. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. कधी रिमझीम तर कधी जोरदार पाऊस बरसत होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वातावरणातही गारठा निर्माण झाला आहे. नागपूर वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात १० तारखेपर्यंत अतिवृष्टी होणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस बरसत आहे. आतापर्यंत मासिक सरासरीच्या ५१ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या पावसाने जलस्रोत वाढले असून तलावातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. काही नाल्यांना पूर आले आहे. मांगलादेवीची घटना वगळता जिल्ह्यात कुठेही नुकसानीची माहिती नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. (शहर वार्ताहर) पावसाचा जोर कायम गत २४ तासात म्हणजे ८ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३.८ मिमी पाऊस कोसळला. त्यात यवतमाळ ८.४०, बाभूळगाव ७, कळंब ५, नेर २, घाटंजी ५, राळेगाव १६, वणी ५, मारेगाव ५, झरी जामणी ४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकरी सुखावला जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला.