शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

चांगल्या कामातून जीवन सार्थकी लावा

By admin | Updated: December 3, 2014 22:57 IST

सर्व मानवजात एकाच ईश्वराची संतान आहे. ईश्वर भक्तीसाठी कोणत्याही पुरोहिताची अथवा मध्यस्थाची गरज नाही. विश्वरूप निर्मिकाला ओळखून स्वत:ला ओळखा, बहुमूल्य जीवनात चांगली कामे करून

वाजीद कादरी : स्मृती पर्वात जमात-ए-इस्लामीच्या संयोजनात व्याख्यानयवतमाळ : सर्व मानवजात एकाच ईश्वराची संतान आहे. ईश्वर भक्तीसाठी कोणत्याही पुरोहिताची अथवा मध्यस्थाची गरज नाही. विश्वरूप निर्मिकाला ओळखून स्वत:ला ओळखा, बहुमूल्य जीवनात चांगली कामे करून जीवन सार्थकी लावा, असे मत इंजिनिअर वाजीद कादरी (औरंगाबाद) यांनी व्यक्त केले. ‘जमात-ए-इस्लामी (हिंद)’ यवतमाळ द्वारा आयोजित स्मृती पर्वात ‘स्वतंत्रता, समता, बंधुता आणि इस्लाम’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, मानव म्हणून आपण समान आहोत हाच विचार गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, कबीर, महात्मा फुले आदी संतांनी दिला आहे. ज्यांना जाती व्यवस्थेने नाकारले, ज्यांना मंदिराचे दरवाजे बंद होते त्यांच्यासाठी मशिदीचे दरवाजे खुले करण्याचे काम पैगंबराने केले आहे. बरोबरीची वागणूक देवून सन्मान दिला आहे, असे असतानाही कधी अज्ञानाने, कधी जातीय अहंकाराने तर कधी प्रत्यक्ष ईश्वर-अल्लाच्या नावाचा दुरुपयोग करून अशांतता निर्माण करणारे घटक पूर्वी होते आणि आजही आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.अध्यक्षस्थानाहून बोलताना नांदेड येथील गुलाम समदानी म्हणाले, आपण नेहमी सकारात्मक आणि कृतज्ज्ञ असले पाहिजे. १९५० पासून दुर्बल घटकांना घटनेने आरक्षण दिले. त्याबद्दल मुस्लीमांसह सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच त्यावेळच्या लोकप्रतिनिधींचा आदर केला पाहिजे. केवळ विरोधासाठी विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. एकच ईश्वर माननाऱ्या इंग्रजांनी या देशात शिक्षण आणि इतरही क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे देश समृद्ध झाला, हे विसरून चालणार नाही. तसेच केवळ ब्राह्मणांना टारगेट करून चालणार नाही. सावरकरांसारखे अनेक विज्ञाननिष्ठ आणि पुरोगामी लोकांनी जे चांगले कार्य केले असेल त्यांचेही स्मरण ठेवणे अगत्याचे आहे. मुस्लीमांनी मानसिक गुलामगिरी नाकारली आहे. तो फक्त ईश्वराला भितो. इतर कोणापुढेही झुकत नाही. म्हणूनच तो प्राणाची पर्वा करीत नाही - निडर झाला आहे. ‘आधुनिक काळातील मानवी गुलामी व त्यातून मुक्तता’ या विषयावर बाळासाहेब गावंडे यांनी विचार मांडले. १५ आॅगस्ट हा बहुजनांच्यादृष्टीने स्वातंत्र्याचा नव्हे तर सत्तांतराचा दिवस ठरतो आहे. शासन प्रशासन जोडण्यासाठी दुवा असणारी माणसे बहुजनांची असतील तर खऱ्या अर्थाने प्रजातंत्र सुरू होईल, असेही ते म्हणाले. संत कबीर विचार मंचावर यावेळी मो. तारिक मो. शमी (लोखंडवाला) यांचा विविध संस्था-संघटनांच्यावतीने सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त डीएफओ सलिमोद्दिन काझी, आसिफ गिलाणी, मो. लुकमान, शेख मुस्तफा, सैयद याकुब, अ‍ॅड. इमरान देशमुख, शेख मेहबूब आलम, मेहबूब कुरेशी, सै. जमील सै. लतीफ, आबिद खान, डॉ. मुश्ताक आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक जियाउद्दिन यांनी केले. संचालन अजमतउल्लाह खान यांनी तर आभार डॉ. अबरार अहमद खान यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)