शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

ग्रामपंचायती मॉडेल व्हिलेज बनवा

By admin | Updated: May 9, 2017 01:19 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे.

पालकमंत्री : स्मार्ट ग्रामपंचायतींना पुरस्काराचे वितरणलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. या निधीचा सदुपयोग करून ग्रामपंचायती केवळ कागदोपत्री स्मार्ट न करता मॉडेल व्हिलेज करा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ग्रामीण भागाच्या विकासाचा राजमार्ग हा स्वच्छतेतून जातो. त्यामुळे स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्यनिर्मूलन, पर्यावरण संतुलन तसेच इतर बाबतीत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्मार्ट ग्राम पुरस्कार दिला जातो. जिल्ह्याच्या १६ तालुक्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना ना. मदन येरावार यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींमध्ये तळेगाव (ता.यवतमाळ), तिरझडा (ता.कळंब), कोलुरा (ता.नेर), पहूर (ता.बाभूळगाव), निंभा (ता.दारव्हा), रावेरी (ता.राळेगाव), साकूर (ता.आर्णी), नागापूर (ता.उमरखेड), खर्षी (ता.पुसद), रुई मोठी (ता.दिग्रस), कसारबेहळ (ता.महागाव), कुंभारी (ता.घाटंजी), कळंबवेल्ली (ता.झरीजामणी), देवाळा (ता.मारेगाव), सिंगलदीप (ता.पांढरकवडा), चिखली (ता.वणी) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.