शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

भाजपा सदस्यांना सांभाळा

By admin | Updated: March 19, 2017 01:23 IST

प्रमुख चारही पक्षातील गुंतागुंत पाहता जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या लढाईत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

जिल्हा परिषद : नेत्यांना आदेश, सर्वच पक्षांना फुटीची भीती यवतमाळ : प्रमुख चारही पक्षातील गुंतागुंत पाहता जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या लढाईत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सर्वच पक्ष एकमेकांच्या सदस्यांवर नजर ठेऊन आहेत. त्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २१ मार्चला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. परंपरागत भाजपा-शिवसेना युती झाल्यास सहज सत्ता स्थापन होऊ शकते. परंतु हे दोनही पक्ष एकमेकाला पाण्यात पाहत आहेत. दोघांनीही एकमेकाला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. वर्चस्वाच्या या लढाईत यातील एका पक्षाने तर चक्क विरोधी बाकावरील काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत बसली तरी हरकत नाही, अशी मानसिकता बनविल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण नेमके कसे बसणार याची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा आहे. भाजपा-सेना युती होणार, शिवसेना-राष्ट्रवादी सोबत बसणार की या दोनही पक्षांना भाजपा बाहेरुन पाठिंबा देणार असे वेगवेगळे पर्याय पुढे येत आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे समीकरण पुसदमधून जुळण्यासाठी पोषक वातावरण असले तरी यवतमाळातील नेत्याकडून त्याला विरोध होतो आहे. विशेष असे राष्ट्रवादीच्या तमाम सदस्यांची सूत्रे गटनेत्याच्या हातात असून हा पदाधिकारी यवतमाळातील पक्षाच्या नेत्याच्या शब्दाच्या बाहेर नाही. आधी यवतमाळचा शब्द नंतर पुसदचा अशी या गटनेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे पुसदमधून काहीही गणित जुळले तरी सभागृहात गटनेता काय भूमिका घेतो यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. यवतमाळातून सेनेच्या समीकरणाला होणाऱ्या विरोधामागे येथील नेत्याची भाजपाशी असलेली जवळीक आणि विधान परिषदेतील अर्थकारणावरून सेनेला असलेला विरोध हे कारण चर्चिले जात आहे. अखेरच्या दिवसापर्यंत भाजपा-सेनेतील छत्तीसचा आकडा कायम राहिल्यास या संधीचा लाभ उठविण्याची तयारी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही चालविली आहे. हे दोनही पक्ष एकत्र येऊन आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वच पक्षांना आपले उमेदवार फुटण्याची भीती आहे. दरम्यान भाजपाला आपल्या पक्षातील जिल्हा परिषद सदस्य सांभाळून ठेवा, अशा सूचना श्रेष्ठींकडून स्थानिक नेत्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपा आमदारांचा आपल्या मतदारसंघातील पक्षाच्या सदस्यांवर वॉच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेसाठी सात ते आठ सदस्यांची गरज असल्याने त्यांनीही भाजपा, सेनेच्या सदस्यांवर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)