शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

‘अरुणावती’चा मुख्य उजवा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:56 IST

यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच.....

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना : लाखो लिटर पाणी जात आहे वाया

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच दुसरीकडे मात्र शेतकºयांच्या पिकासाठी अरुणावतीचा उजवा मुख्य कालवा सोडताना नियोजनाअभावी हा कालवा फुटून दर तासाला लाखो लिटर पाणी वाया गेले.कार्यकारी अभियंता व संबंधित कर्मचाºयांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. अरुणावतीच्या उजव्या मुख्य कालव्यास साधारणत: चार ते पाच दिवसांपासून तूर, कापूस पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यानंतर संबंधित अधिकाºयांच्या भेटी त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. सकाळच्या सुमारास अचानक कालव्यात जास्त पाणी सोडण्यात आले. अशातच दुपारी ४ वाजता तुपटाकळी ते बेलुरा रोडवरील उजव्या मुख्य कालव्याला ५० फुटापर्यंत गायकी यांच्या शेताजवळ ओलावा फुटला. साधारणत: ६ वाजेपर्यंत कुणीही अधिकारी, कर्मचारी याकडे फिरकला नाही. पाणी वाया जात असताना शेतकरीवर्ग हतबलपणे केवळ पाहात होते. काही शेतकºयांनी तत्परतेने कार्यकारी अभियंता व इतर कर्मचाºयांना फोन लावले. परंतु सर्व कॉल संपर्क कक्षेच्या बाहेर येत होते. तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काही प्रमाणात हालचालीला वेग आला. मागील वर्षीसुद्धा उजवा मुख्य कालवा लाख (रायाजी) गावाजवळ फुटला होता.यावर्षी अरुणावती प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्केच पाणीसाठा आहे. या मोजक्या पाणीसाठ्यातून शेतीला पाणी दिल्या जात आहे. अशा स्थितीत मुख्य उजवा कालवा फुटल्याने दुष्काळात तेरावा महिना आला आहे. कार्यकारी अभियंत्याच्या थोड्याशा दुर्लक्षितपणामुळे हा प्रसंग निर्माण झाला आहे, तर सहायक कार्यकारी अधिकारी यांचेही ढिसाळ नियोजन यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळेच आजपर्यंत शेताच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचविण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे.योग्य नियोजनाचा अभावमागील वर्षी १०० टक्के धरण भरूनही कालव्यांना मनमानी पाणी सोडण्यात आले होते. योग्य नियोजन नसल्यामुळे यावर्षी हरभरा पिकाला पाणी मिळू शकले नाही. लाखो लिटर पाणी काही वेळातच वाया गेले. एकीकडे पीक परिस्थिती वाईट असताना आणि येत्या उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासण्याची शक्यता असताना अधिकारीवर्गाच्या अशा दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.