शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

‘अरुणावती’चा मुख्य उजवा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:56 IST

यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच.....

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना : लाखो लिटर पाणी जात आहे वाया

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच दुसरीकडे मात्र शेतकºयांच्या पिकासाठी अरुणावतीचा उजवा मुख्य कालवा सोडताना नियोजनाअभावी हा कालवा फुटून दर तासाला लाखो लिटर पाणी वाया गेले.कार्यकारी अभियंता व संबंधित कर्मचाºयांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. अरुणावतीच्या उजव्या मुख्य कालव्यास साधारणत: चार ते पाच दिवसांपासून तूर, कापूस पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यानंतर संबंधित अधिकाºयांच्या भेटी त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. सकाळच्या सुमारास अचानक कालव्यात जास्त पाणी सोडण्यात आले. अशातच दुपारी ४ वाजता तुपटाकळी ते बेलुरा रोडवरील उजव्या मुख्य कालव्याला ५० फुटापर्यंत गायकी यांच्या शेताजवळ ओलावा फुटला. साधारणत: ६ वाजेपर्यंत कुणीही अधिकारी, कर्मचारी याकडे फिरकला नाही. पाणी वाया जात असताना शेतकरीवर्ग हतबलपणे केवळ पाहात होते. काही शेतकºयांनी तत्परतेने कार्यकारी अभियंता व इतर कर्मचाºयांना फोन लावले. परंतु सर्व कॉल संपर्क कक्षेच्या बाहेर येत होते. तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काही प्रमाणात हालचालीला वेग आला. मागील वर्षीसुद्धा उजवा मुख्य कालवा लाख (रायाजी) गावाजवळ फुटला होता.यावर्षी अरुणावती प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्केच पाणीसाठा आहे. या मोजक्या पाणीसाठ्यातून शेतीला पाणी दिल्या जात आहे. अशा स्थितीत मुख्य उजवा कालवा फुटल्याने दुष्काळात तेरावा महिना आला आहे. कार्यकारी अभियंत्याच्या थोड्याशा दुर्लक्षितपणामुळे हा प्रसंग निर्माण झाला आहे, तर सहायक कार्यकारी अधिकारी यांचेही ढिसाळ नियोजन यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळेच आजपर्यंत शेताच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचविण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे.योग्य नियोजनाचा अभावमागील वर्षी १०० टक्के धरण भरूनही कालव्यांना मनमानी पाणी सोडण्यात आले होते. योग्य नियोजन नसल्यामुळे यावर्षी हरभरा पिकाला पाणी मिळू शकले नाही. लाखो लिटर पाणी काही वेळातच वाया गेले. एकीकडे पीक परिस्थिती वाईट असताना आणि येत्या उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासण्याची शक्यता असताना अधिकारीवर्गाच्या अशा दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.