शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

‘अरुणावती’चा मुख्य उजवा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:56 IST

यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच.....

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना : लाखो लिटर पाणी जात आहे वाया

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच दुसरीकडे मात्र शेतकºयांच्या पिकासाठी अरुणावतीचा उजवा मुख्य कालवा सोडताना नियोजनाअभावी हा कालवा फुटून दर तासाला लाखो लिटर पाणी वाया गेले.कार्यकारी अभियंता व संबंधित कर्मचाºयांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. अरुणावतीच्या उजव्या मुख्य कालव्यास साधारणत: चार ते पाच दिवसांपासून तूर, कापूस पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यानंतर संबंधित अधिकाºयांच्या भेटी त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. सकाळच्या सुमारास अचानक कालव्यात जास्त पाणी सोडण्यात आले. अशातच दुपारी ४ वाजता तुपटाकळी ते बेलुरा रोडवरील उजव्या मुख्य कालव्याला ५० फुटापर्यंत गायकी यांच्या शेताजवळ ओलावा फुटला. साधारणत: ६ वाजेपर्यंत कुणीही अधिकारी, कर्मचारी याकडे फिरकला नाही. पाणी वाया जात असताना शेतकरीवर्ग हतबलपणे केवळ पाहात होते. काही शेतकºयांनी तत्परतेने कार्यकारी अभियंता व इतर कर्मचाºयांना फोन लावले. परंतु सर्व कॉल संपर्क कक्षेच्या बाहेर येत होते. तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काही प्रमाणात हालचालीला वेग आला. मागील वर्षीसुद्धा उजवा मुख्य कालवा लाख (रायाजी) गावाजवळ फुटला होता.यावर्षी अरुणावती प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्केच पाणीसाठा आहे. या मोजक्या पाणीसाठ्यातून शेतीला पाणी दिल्या जात आहे. अशा स्थितीत मुख्य उजवा कालवा फुटल्याने दुष्काळात तेरावा महिना आला आहे. कार्यकारी अभियंत्याच्या थोड्याशा दुर्लक्षितपणामुळे हा प्रसंग निर्माण झाला आहे, तर सहायक कार्यकारी अधिकारी यांचेही ढिसाळ नियोजन यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळेच आजपर्यंत शेताच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचविण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे.योग्य नियोजनाचा अभावमागील वर्षी १०० टक्के धरण भरूनही कालव्यांना मनमानी पाणी सोडण्यात आले होते. योग्य नियोजन नसल्यामुळे यावर्षी हरभरा पिकाला पाणी मिळू शकले नाही. लाखो लिटर पाणी काही वेळातच वाया गेले. एकीकडे पीक परिस्थिती वाईट असताना आणि येत्या उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासण्याची शक्यता असताना अधिकारीवर्गाच्या अशा दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.