शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जमिनीतील मुख्य घटक नामशेष

By admin | Updated: September 25, 2014 23:35 IST

आधुनिक युगात नवनवीन तंत्र वापरून कृषी विभागाने पिकांचे उत्पन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यात येत असल्याने

रासायनिक खताचा परिणाम : शेती बंजर होण्याची भीतीगणेश रांगणकर -नांदेपेराआधुनिक युगात नवनवीन तंत्र वापरून कृषी विभागाने पिकांचे उत्पन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यात येत असल्याने जमिनीतीत मुख्य पोषक तत्वेच आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेती बंजर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी पाळीव जनावरे पाळत होते. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी उपयोगी येत होती. या जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीकरिता उपयोगी पडत होती. जनावरांची विष्ठा खताचे काम करीत होती. हे शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. या खतापासून शेतजमिनीतील पोषक तत्वांना कोणतीही हानीसुद्धा पोहोचत नव्हती़ पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्याला भाजीपाला व इतरही पिके घेत येत होती. त्यामुळे उत्पादनचा दर्जा अत्यंत चांगला राहात होता.यापूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून, खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते़ वयोवृध्द शेतकरी गावातील चौथऱ्यावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. पिकांवर कोणतेही संकट आले, की शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते़ परंतु हल्लीच्या काळात तसे चित्र दिसून येत नाही. पिके चांगली राहण्याकरिता आता शेतकरी अधिकाधिक रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहे़ त्यामुळे शेतजमिनीचा दर्जा घसरत आहे. जमिनीतील अत्यंत सुपिक तत्वे नष्ट होत आहे़ आता शेतकरी रासायनिक खताचा वापर जादा प्रमाणात करीत असल्याने उपजाऊ शेतजमिनी ओसाड पडण्याची शक्यता बळावली आहे़ शेतीत अधिकाधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतासोबतच अनेक प्रकारच्या महागड्या किटकनाशकांचाही अत्याधिक वापर होऊ लागला आहे. या किटकनाशकांमुळे शेतीतील ज्या वनस्पती पिकासाठी उपयोगी ठरतात, त्या वनस्पती व पोषक तत्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किटकनाशकांच्या फवारणीमुळेत्यांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार आणि अधिक रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमिनीलाही आता रासायनिक खतांची सवय झाली आहे़ आधुनिक काळात पिकांना रासायनिक खताचा डोज दिला नाही, तर उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांचा वारेमाप वापर करताना दिसत आहे. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. सिंचनाची सुविधा अत्यंत तोकडी आहे. यापूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात ‘वांगोडे’ तयार करून त्यामध्ये भाजीपाला लागवड करायचे़ त्याच भाजीपाल्यावर त्यांचा घरगुती खर्च अवलंबून असायचा. परंतु हल्लीच्या काळात मात्र कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्टच झाले आहे़ अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे़ आता तर शेतकरी, मजुरदारांसह सर्वच जनता रासायनिकयुक्त भाजीपाला खात आहे़ नवीन किटकनाशकांतील विषारी घटक भाजीपाल्यात मिसळत असल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. आता खास किटकनाशक निघाले. सोबतच शेतातील कचरा नष्ट करणारी औषधी आली आह़े त्यात जंगली जनावरांच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त असल्याने ही जंगली जनावरे शेतात येऊ नये म्हणूनही अनेक शेतकरी खास औषधींची फवारणी करीत आहे. हे औषध धुऱ्याने फवारल्यास कोणतेही जनावरे शेतात शिरणार नाही, असा शेतकऱ्यांचा समज आहे़