शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जमिनीतील मुख्य घटक नामशेष

By admin | Updated: September 25, 2014 23:35 IST

आधुनिक युगात नवनवीन तंत्र वापरून कृषी विभागाने पिकांचे उत्पन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यात येत असल्याने

रासायनिक खताचा परिणाम : शेती बंजर होण्याची भीतीगणेश रांगणकर -नांदेपेराआधुनिक युगात नवनवीन तंत्र वापरून कृषी विभागाने पिकांचे उत्पन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यात येत असल्याने जमिनीतीत मुख्य पोषक तत्वेच आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेती बंजर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी पाळीव जनावरे पाळत होते. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी उपयोगी येत होती. या जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीकरिता उपयोगी पडत होती. जनावरांची विष्ठा खताचे काम करीत होती. हे शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. या खतापासून शेतजमिनीतील पोषक तत्वांना कोणतीही हानीसुद्धा पोहोचत नव्हती़ पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्याला भाजीपाला व इतरही पिके घेत येत होती. त्यामुळे उत्पादनचा दर्जा अत्यंत चांगला राहात होता.यापूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून, खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते़ वयोवृध्द शेतकरी गावातील चौथऱ्यावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. पिकांवर कोणतेही संकट आले, की शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते़ परंतु हल्लीच्या काळात तसे चित्र दिसून येत नाही. पिके चांगली राहण्याकरिता आता शेतकरी अधिकाधिक रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहे़ त्यामुळे शेतजमिनीचा दर्जा घसरत आहे. जमिनीतील अत्यंत सुपिक तत्वे नष्ट होत आहे़ आता शेतकरी रासायनिक खताचा वापर जादा प्रमाणात करीत असल्याने उपजाऊ शेतजमिनी ओसाड पडण्याची शक्यता बळावली आहे़ शेतीत अधिकाधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतासोबतच अनेक प्रकारच्या महागड्या किटकनाशकांचाही अत्याधिक वापर होऊ लागला आहे. या किटकनाशकांमुळे शेतीतील ज्या वनस्पती पिकासाठी उपयोगी ठरतात, त्या वनस्पती व पोषक तत्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किटकनाशकांच्या फवारणीमुळेत्यांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार आणि अधिक रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमिनीलाही आता रासायनिक खतांची सवय झाली आहे़ आधुनिक काळात पिकांना रासायनिक खताचा डोज दिला नाही, तर उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांचा वारेमाप वापर करताना दिसत आहे. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. सिंचनाची सुविधा अत्यंत तोकडी आहे. यापूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात ‘वांगोडे’ तयार करून त्यामध्ये भाजीपाला लागवड करायचे़ त्याच भाजीपाल्यावर त्यांचा घरगुती खर्च अवलंबून असायचा. परंतु हल्लीच्या काळात मात्र कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्टच झाले आहे़ अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे़ आता तर शेतकरी, मजुरदारांसह सर्वच जनता रासायनिकयुक्त भाजीपाला खात आहे़ नवीन किटकनाशकांतील विषारी घटक भाजीपाल्यात मिसळत असल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. आता खास किटकनाशक निघाले. सोबतच शेतातील कचरा नष्ट करणारी औषधी आली आह़े त्यात जंगली जनावरांच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त असल्याने ही जंगली जनावरे शेतात येऊ नये म्हणूनही अनेक शेतकरी खास औषधींची फवारणी करीत आहे. हे औषध धुऱ्याने फवारल्यास कोणतेही जनावरे शेतात शिरणार नाही, असा शेतकऱ्यांचा समज आहे़