शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बोगस बियाणे विक्रेत्यांवर नेर कृषी विभाग मेहेरबान

By admin | Updated: August 10, 2014 23:14 IST

सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या निष्कर्षाप्रत कृषी विभाग पोहोचला. मात्र संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. हा विभाग त्यांच्यावर एवढा मेहेरबान का, असा साधार

नेर : सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या निष्कर्षाप्रत कृषी विभाग पोहोचला. मात्र संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. हा विभाग त्यांच्यावर एवढा मेहेरबान का, असा साधार प्रश्न फसगत झालेल्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दुबार पेरणीने आर्थिकदृष्ट्या मोडलेला बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत आहे. गारपीट आणि परतीच्या पावसामुळे बियाण्याचे सोयाबीन हाती लागले नाही. बोगस सोयाबीन बियाणे बाजारात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु नाईलाजास्तव काही शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु चांगल्या पावसानंतरही बियाणे उगवले नाही. याविषयीच्या तक्रारी कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात झाल्या. यावर चौकशीही करण्यात आली. त्यात बियाण्यांची उगवण क्षमताच नव्हती असा निष्कर्ष काढण्यात आला. परंतु संबंधित विक्रेत्यांवर कारवाईस टाळाटाळ होत आहे. वटफळी, मोझर, सारंगपूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ‘एसीएन’ कंपनीच्या बियाण्यांचा वापर केला होता. शिवाय कृषी विभागाने वितरित केलेल्या महाबीजचीही पेरणी झाली होती, अशा तक्रारींवर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुक्यातील दोन कृषी अधिकारी आणि कंपनीचा एक प्रतिनिधी यांनी बियाणे उगवले नसलेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात त्यांना बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास आले. या बाबीची माहिती संबंधित वरिष्ठांना देण्यात आली. मात्र कारवाईबाबत निश्चित सांगितले गेले नाही. कृषी अधिकारी झंझाळ यांनीही बियाण्यांची उगवणशक्ती नसल्याचे सांगितले. मग कारवाईस विलंब का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेताच्या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्यांनी ठरविलेल्या धोरणानंतर कारवाई होईल, असे सांगितले जाते.दरम्यान, अजूनही पाहणीचे पंचनामे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. मात्र सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीविषयी कृषी विभागाजवळ कुठलेही उत्तर नाही. बियाणे कंपन्यांनी हात वर केले तर कृषी विभाग कागदी घोडे नाचवित असल्याने बळीराजा दुहेरी समस्येत अडकला आहे. (तालुका प्रतिनिधी)