शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

महायुती, आघाडीत संभ्रमावस्था कायम

By admin | Updated: September 17, 2014 00:03 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभा मतदार संघात शाखा स्थापनेचा धडाका सुरु केला. दररोज किमान १0 ते १२ गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात येत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभा मतदार संघात शाखा स्थापनेचा धडाका सुरु केला. दररोज किमान १0 ते १२ गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात येत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी सुरू असून महायुतीत उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.वणी विधानसभा मतदार संघात तूर्तास केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच निवडणूक तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. पक्षाने स्वतंत्रपणे नांदेपेरा मार्गावर ‘शिवनेरी’ नामक कार्यालयही सुरू केले आहे. या कार्यालयात दररोज कार्यकर्त्यांचा राबता सुरू झाला आहे. दररोज शाखा स्थापन करण्यासाठी मनसेच्या जिल्हा परिषद सदस्य अल्का टेकाम, पंचायत समिती सदस्य मिलींद पाटील व इतर पदाधिकारी जिवाचे रान करीत आहे. जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांनी स्वत: निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहे. दररोज पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मनसेची निवडणूक तयारी सुरू असताना कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी सुरू झाली आहे. विद्यमान आमदार वामनराव कासावार यांना त्यांच्याच गोटातील ‘विश्वासूं’कडून सुरूंग लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यातूनच येत्या शुक्रवारी १९ सप्टेंबरला काही ‘पत्ते’ उघड होण्याची शक्यता आहे. मात्र संभाव्य बंडखोरीही कासावार यांच्या पथ्यावर पाडण्यासाठीच केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसमध्ये एकमेव कासावार यांचेच नाव उमेदवारीसाठी पुढे आले असले, तरी निवडणुकीत ‘तिसरा’ प्रबळ उमेदवार राहण्यासाठीच व्यूह रचना आखली जात आहे.महायुतीत तर अद्याप संभ्रमावस्था कायम आहे. अद्याप महायुतीच झाली नसल्याने युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर झाले आहे. त्यातच मुंबई, दिल्लीत जोरदार घडामोडी सुरू असल्याने युतीचे कार्यकर्ते युती तुुटणार की कायम राहणार, याबाबत साशंकीत आहेत. त्यातच युती झाली तरी उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निष्ठावंत की नवखा, आपला की परका, घरचा की बाहेरचा, युतीचा उमेदवार नक्की कोण, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. स्पर्धेतील मातब्बर उमेदवारही अद्याप संभ्रमातच आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्दिधा मनस्थितीत दिसत आहे.महायुतीचे जागा वाटप रखडल्याने भाजपानेही आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. तथापि भाजपातही उभे दोन गट दिसून येत आहे. युती तुटल्यास भाजपचा उमेदवार नक्कीच मैदानात राहणार आहे. मात्र तो कोण असेल, हे युती तुटल्यानंतरच कळणार आहे. दुसरीकडे महायुती झालीच अन् शिवसेनेने ‘दुसऱ्या’च उमेदवाराला उमेदवारी बहाल केली, तर काय करायचे याचा खलही भाजपात सुरू आहे. लोकसभेत अहीर यांना विरोध करणाऱ्यांच्या पाठीशी कसे राहावे, असा प्रश्न भाजपामध्ये उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)