शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महावितरणने शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे

By admin | Updated: November 13, 2014 23:10 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नाबाबत खासदार भावना गवळी यांनी महावितरण कंपनीचे प्रबंध संचालक अजय मेहता यांची भेट घेऊन यवतमाळ

यवतमाळ : निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नाबाबत खासदार भावना गवळी यांनी महावितरण कंपनीचे प्रबंध संचालक अजय मेहता यांची भेट घेऊन यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. यावेळी महावितरणचे संचालक देशपांडे हे सुद्धा उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी राज्यात यवतमाळ व वाशिम हे दोन जिल्हे अग्रस्थानी आहेत. या आत्महत्या थांबवायच्या असतील तर महावितरणकडे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रतिक्षा यादी निकाली काढावी व शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्यावी अशी मागणी खासदारांनी केली. कृषीपंपाची योग्य वेळेस विद्युत जोडणी करावयास पाहिजे. शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून विद्युत विभागाकडून जोडण्यास देण्यात येत नसल्यामुळे आता त्यांना आपले पीक वाचविणे अवघड झाल्याचे त्या म्हणाल्या. यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अनेक महिन्यांपासून रोहित्र नाहीत, बऱ्याच गावांमध्ये ६३ किलो व्हॅट अ‍ॅम्पीअर क्षमतेचे रोहित्र बसविले जातात. परंतु तेथे १०० केव्हीची आवश्यकता असते. त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रकार वारंवार घडता. परिणामी विद्युत पुरवठा एक ते दोन महिने खंडीत होतो. यामध्ये महावितरणचेही नुकसान होते. तसेच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. हे दुहेरी नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावात आवश्यकतेनुसार योग्य क्षमतेचे रोहित्र बसविण्यात यावे असे खासदार गवळी यांनी सुचविले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी वीज कनेक्शन जोडणी उशिरा मिळणे, वारंवार रोहित्र जळने, विद्युत पुरवठा खंडीत होणे ही कारणे मोठ्या प्रमाणात आहेत. कृषीपंपांची प्रतिक्षा यादी संपविण्यासाठी महावितरणने कालबाह्य कार्यक्रम आखून सहा महिन्यात ती निकाली काढावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वीज वितरण कंपनीने प्लार्इंग स्कॉड प्रमाणे टास्क फोर्स स्कॉडची निर्मिती करावी. ज्या व्दारा हे स्कॉड शेतकऱ्यांच्या समस्यांचे वेळेत निरसन करतील. कोणत्या गावाला किती पॉवरचे ट्रान्सफार्मर लागेल, शेतकऱ्यांना लागणारे वीजेचे नियोजन व शेतकऱ्यांच्या विजेशी निगडीत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातून उपाय योजना करतील. याचा शेतकरी आत्महत्यांवर आळा बसेल. सोबतच प्रलंबित असलेले १३२ केव्ही सबस्टेशनची कामे लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांनी सुचविले. यावेळी महावितरणचे प्रबंध संचालक अजय मेहता यांनी खासदार गवळी यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेऊन यासंदर्भात त्वरित अंमलबजावणीचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)