शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

महाराष्ट्राची गायिका रमली चिमुकल्यांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:54 IST

रिअ‍ॅलिटी शो जिंकून अवघ्या रसिकांची मनेही जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका अंजली गायकवाड रविवारी यवतमाळात आली होती. रविवारची सुट्टी अन् त्यात अंजलीचे आगमन म्हणजे, यवतमाळच्या बालगोपाळांसाठी सुवर्णसंधी ठरली. ‘सारेगामापा’च्या मंचावर परिपक्व गाणारी अंजलीही समवयस्कांच्या गर्दीत रममाण झाली.

ठळक मुद्देअंजली गायकवाड : अभ्यास कराच, पण कलाही जोपासा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रिअ‍ॅलिटी शो जिंकून अवघ्या रसिकांची मनेही जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका अंजली गायकवाड रविवारी यवतमाळात आली होती. रविवारची सुट्टी अन् त्यात अंजलीचे आगमन म्हणजे, यवतमाळच्या बालगोपाळांसाठी सुवर्णसंधी ठरली. ‘सारेगामापा’च्या मंचावर परिपक्व गाणारी अंजलीही समवयस्कांच्या गर्दीत रममाण झाली. ‘अभ्यास तर केलाच पाहिजे, पण अभ्यासासोबतच एखादी कलाही जरूर जोपासली पाहिजे’ हे तिचे शब्द बालमैत्रिणींना बरेच काही शिकवून गेले.‘सारेगामापा’ची विजेती अंजली गायकवाड हिने शनिवारी वणीत महिला दिना निमित्त गायन केले. त्यानंतर रविवारी ती यवतमाळात आली. अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख प्रा. राहुल एकबोटे यांच्या घरी अंजलीच्या भोवती बच्चेकंपनीचा गोतावळा जमला. या बालमित्रांमध्ये अंजली चेंडू घेऊन मनसोक्त खेळली.यावेळी ‘लोकमत’शी तिने मनमुराद गप्पा केल्या. ती म्हणाली, ‘यवतमाळचे लोकं खूप प्रेमळ आहे. या गावातली भाषा मला खूप आवडते. यवतमाळचा चिवडा प्रसिद्ध आहे. मी आस्वाद घेतला त्याचा.’ गाण्यामुळे महाराष्ट्रच काय, देशभरात ओळख मिळालेली अंजली बोलताना तिचा बालसुलभ निरागसपणा कायम होता. ती म्हणाली, मी तीन चार वर्षाची असतानापासूनच गायला लागली. वडील घरी क्लास घ्यायचे ते ऐकून मलाही शिकता आले.’ कुठल्या प्रकारचे गाणे अधिक आवडते, असे विचारल्यावर अंजली म्हणाली, ‘गाणं कुठलंही चांगलंच. पण शास्त्रीय संगीत अधिक जवळचे. ते आपले मूळ आहे. कार्यक्रमात लोक वेगवेगळ्या गाण्याची फर्माईश करतात, म्हणून चित्रपटातील गाणीही गाते. पण पहिली आवड आहे ते शास्त्रीय संगीतच.’ अवघ्या तेरा वर्षाची अंजली आपल्या करिअरविषयी जागरूक आहे. ती म्हणते, ‘प्रसिद्धी जशी चांगली असते, तसे प्रसिद्धीचे तोटेही असतात. प्रसिद्धीमुळे माझ्यात अनाठायी स्वाभिमान येऊ नये, एवढीच प्रार्थना आहे. पण एक खरे, आपण प्रसिद्ध झालो की आपल्याला प्रत्येक वेळी अपडेट राहावेच लागते.’अंजलीचे वडील अंगद गायकवाड अहमदनगरमध्ये गाणे शिकवितात. ते म्हणाले, अंजली लहान असताना मी तिला निजवताना गाणे म्हणायचो. तेव्हा तिच्या डोळ्यात स्मित असे. ते पाहून मला जाणवले, हिच्या मनात गाणे रुजलेले आहे.