शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिलांच्या घरात केले घर

By admin | Updated: October 11, 2014 02:17 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. उंबरकर ज्या गावात जातात, तेथे महिलांकडून ओवाळणी होत असल्याने त्यांच्यासह कार्यकर्तेही भारावून गेले आहेत.विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच उमेदवार परिसर पिंजून काढत आहेत. यात मनसेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. त्यानंतर पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांची वणीत जाहीर सभा झाली. या सभेनंतर मनसेचे कार्यकर्ते एकदम ‘चार्ज‘ झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर हळूहळू राजकीय वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा जोमाने प्रचारात गुंतले आहेत. सध्या राजू उंबरकर ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून आहे. दररोज पहाटेच ते एखाद्या गावात पोहोचतात. ते गावात आल्याची माहिती कळताच क्षणार्धात महिला पुढे सरसावतात. उंबरकर यांना ओवाळण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. प्रत्येक गावात माता-भगिनींकडून अत्यंत जिव्हाळ्याने ओवाळणी होत असल्याने उंबरकरही स्तब्ध झाले आहे. त्यांना कल्पना नसतानाही गावांमध्ये त्यांची ओवाळणी होत आहे. वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील गावांमध्येही त्यांची ओवाळणी सुरू आहे. त्यामुळे महिलांचा त्यांना मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेली पाच वर्षे उंबरकर यांनी सामान्य जनता, महिला, भगिनींसाठी केलेले कार्य, आता कुठे दिसून येत आहे. त्याचमुळे गावोगावी त्यांची ओवाळणी सुरू आहे. या भारावलेल्या वातावरणाने निवडणुकीपेक्षाही मिळालेले प्रेम बघून उंबरकर स्वत: आश्चर्यचकित होत आहे. कोणतीही निवडणूक येईल आणि जाईल, मात्र महिला, भगिनींच्या जिव्हाळ्याला आपण तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ते जागोजागी देत आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षाही त्यांना प्रत्येक गावात मिळणाऱ्या जिव्हाळ्याचे ‘मोल‘ अधिक महत्वाचे वाटत आहे. निवडणुकीतील जय आणि पराजय, यांच्यापेक्षाही माता-भगिनींचे हे प्रेम सदैव असेच कायम राहावे, अशा भावना ते व्यक्त करीत आहे. या प्रेमाने भारावून गेलेले राजू उंबरकर खऱ्या अर्थाने इतर उमेदवारांपेक्षा वेगळे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांनी आता जय आणि पराजयाची, पर्वा न करता केवळ जनतेच्या समस्यांसाठी कायम लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ओवाळणीसह गावोगावी त्यांना भेटण्यासाठी ग्रामस्थ वाट बघत असल्याने उंबरकर प्रचंड भारावून गेले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)