शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिलांच्या घरात केले घर

By admin | Updated: October 11, 2014 02:17 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. उंबरकर ज्या गावात जातात, तेथे महिलांकडून ओवाळणी होत असल्याने त्यांच्यासह कार्यकर्तेही भारावून गेले आहेत.विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच उमेदवार परिसर पिंजून काढत आहेत. यात मनसेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. त्यानंतर पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांची वणीत जाहीर सभा झाली. या सभेनंतर मनसेचे कार्यकर्ते एकदम ‘चार्ज‘ झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर हळूहळू राजकीय वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा जोमाने प्रचारात गुंतले आहेत. सध्या राजू उंबरकर ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून आहे. दररोज पहाटेच ते एखाद्या गावात पोहोचतात. ते गावात आल्याची माहिती कळताच क्षणार्धात महिला पुढे सरसावतात. उंबरकर यांना ओवाळण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. प्रत्येक गावात माता-भगिनींकडून अत्यंत जिव्हाळ्याने ओवाळणी होत असल्याने उंबरकरही स्तब्ध झाले आहे. त्यांना कल्पना नसतानाही गावांमध्ये त्यांची ओवाळणी होत आहे. वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील गावांमध्येही त्यांची ओवाळणी सुरू आहे. त्यामुळे महिलांचा त्यांना मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेली पाच वर्षे उंबरकर यांनी सामान्य जनता, महिला, भगिनींसाठी केलेले कार्य, आता कुठे दिसून येत आहे. त्याचमुळे गावोगावी त्यांची ओवाळणी सुरू आहे. या भारावलेल्या वातावरणाने निवडणुकीपेक्षाही मिळालेले प्रेम बघून उंबरकर स्वत: आश्चर्यचकित होत आहे. कोणतीही निवडणूक येईल आणि जाईल, मात्र महिला, भगिनींच्या जिव्हाळ्याला आपण तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ते जागोजागी देत आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षाही त्यांना प्रत्येक गावात मिळणाऱ्या जिव्हाळ्याचे ‘मोल‘ अधिक महत्वाचे वाटत आहे. निवडणुकीतील जय आणि पराजय, यांच्यापेक्षाही माता-भगिनींचे हे प्रेम सदैव असेच कायम राहावे, अशा भावना ते व्यक्त करीत आहे. या प्रेमाने भारावून गेलेले राजू उंबरकर खऱ्या अर्थाने इतर उमेदवारांपेक्षा वेगळे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांनी आता जय आणि पराजयाची, पर्वा न करता केवळ जनतेच्या समस्यांसाठी कायम लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ओवाळणीसह गावोगावी त्यांना भेटण्यासाठी ग्रामस्थ वाट बघत असल्याने उंबरकर प्रचंड भारावून गेले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)