शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिलांच्या घरात केले घर

By admin | Updated: October 11, 2014 02:17 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. उंबरकर ज्या गावात जातात, तेथे महिलांकडून ओवाळणी होत असल्याने त्यांच्यासह कार्यकर्तेही भारावून गेले आहेत.विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच उमेदवार परिसर पिंजून काढत आहेत. यात मनसेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. त्यानंतर पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांची वणीत जाहीर सभा झाली. या सभेनंतर मनसेचे कार्यकर्ते एकदम ‘चार्ज‘ झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर हळूहळू राजकीय वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा जोमाने प्रचारात गुंतले आहेत. सध्या राजू उंबरकर ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून आहे. दररोज पहाटेच ते एखाद्या गावात पोहोचतात. ते गावात आल्याची माहिती कळताच क्षणार्धात महिला पुढे सरसावतात. उंबरकर यांना ओवाळण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. प्रत्येक गावात माता-भगिनींकडून अत्यंत जिव्हाळ्याने ओवाळणी होत असल्याने उंबरकरही स्तब्ध झाले आहे. त्यांना कल्पना नसतानाही गावांमध्ये त्यांची ओवाळणी होत आहे. वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील गावांमध्येही त्यांची ओवाळणी सुरू आहे. त्यामुळे महिलांचा त्यांना मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेली पाच वर्षे उंबरकर यांनी सामान्य जनता, महिला, भगिनींसाठी केलेले कार्य, आता कुठे दिसून येत आहे. त्याचमुळे गावोगावी त्यांची ओवाळणी सुरू आहे. या भारावलेल्या वातावरणाने निवडणुकीपेक्षाही मिळालेले प्रेम बघून उंबरकर स्वत: आश्चर्यचकित होत आहे. कोणतीही निवडणूक येईल आणि जाईल, मात्र महिला, भगिनींच्या जिव्हाळ्याला आपण तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ते जागोजागी देत आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षाही त्यांना प्रत्येक गावात मिळणाऱ्या जिव्हाळ्याचे ‘मोल‘ अधिक महत्वाचे वाटत आहे. निवडणुकीतील जय आणि पराजय, यांच्यापेक्षाही माता-भगिनींचे हे प्रेम सदैव असेच कायम राहावे, अशा भावना ते व्यक्त करीत आहे. या प्रेमाने भारावून गेलेले राजू उंबरकर खऱ्या अर्थाने इतर उमेदवारांपेक्षा वेगळे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांनी आता जय आणि पराजयाची, पर्वा न करता केवळ जनतेच्या समस्यांसाठी कायम लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ओवाळणीसह गावोगावी त्यांना भेटण्यासाठी ग्रामस्थ वाट बघत असल्याने उंबरकर प्रचंड भारावून गेले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)