शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

रेशीम उत्पादनात महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 11:35 IST

राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून दखलक्षेत्र वाढण्यात अमरावती विभागासह यवतमाळचा सिंहाचा वाटा

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. रेशीम उत्पादनात उदयोन्मुख राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला आहे. या गौरवात अमरावती विभाग आणि यवतमाळ जिल्ह्यातील लागवडक्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे.जगभरात रेशीम उत्पादनात ९९.९९ टक्के वाटा चिनचा आहे. यामुळे रेशीम उत्पादनात संपूर्ण बाजारपेठ चिनने काबीज केली आहे. भारतालाही रेशीम उत्पादनात सर्वाधिक वाव आहे. अशा प्रकारची सुपीक जमीन महाराष्ट्रात आहे. यामुळे महाराष्ट्रात रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडण्याची शक्यता आहे. रेशीम उत्पादनाला जागतिक बाजारात चांगली किंमत आहे. किमान ६०० रूपये किलोच्या वरच आजपर्यंत कोशाचे दर राहिले आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना किमान सहा वेळा पीक घेता येते. अमरावती विभागाचा लागवड क्षेत्राचा आकडा चार हजार एकरवर गेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात १३०० एकरवर लागवड झाली आहे. ५९० एकर लागवडीसाठी शेतकरी तयार आहेत. एकूणच रेशीम लागवडीकडे शेतकरी वळत आहे.रेशीम धाग्याला मोठी मागणीजागतिक बजारात रेशीम धाग्याला मोठी मागणी आहे. यातून चांगला रोजगारही मिळू शकतो. यामुळे असे युनिट तयार करण्यासाठी शेतकरी आता पुढे येत आहेत. यातून शेतकऱ्यांना कोषापेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे.रेशीम उत्पादनात जिल्ह्याला मोठी संधी आहे. यामुळे जिल्हा २०० एकरवरून दोन हजार एकरकडे वाटचाल करीत आहे. पुढील काळात हे क्षेत्र वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती