शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रेशीम उत्पादनात महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 11:35 IST

राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून दखलक्षेत्र वाढण्यात अमरावती विभागासह यवतमाळचा सिंहाचा वाटा

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. रेशीम उत्पादनात उदयोन्मुख राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला आहे. या गौरवात अमरावती विभाग आणि यवतमाळ जिल्ह्यातील लागवडक्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे.जगभरात रेशीम उत्पादनात ९९.९९ टक्के वाटा चिनचा आहे. यामुळे रेशीम उत्पादनात संपूर्ण बाजारपेठ चिनने काबीज केली आहे. भारतालाही रेशीम उत्पादनात सर्वाधिक वाव आहे. अशा प्रकारची सुपीक जमीन महाराष्ट्रात आहे. यामुळे महाराष्ट्रात रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडण्याची शक्यता आहे. रेशीम उत्पादनाला जागतिक बाजारात चांगली किंमत आहे. किमान ६०० रूपये किलोच्या वरच आजपर्यंत कोशाचे दर राहिले आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना किमान सहा वेळा पीक घेता येते. अमरावती विभागाचा लागवड क्षेत्राचा आकडा चार हजार एकरवर गेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात १३०० एकरवर लागवड झाली आहे. ५९० एकर लागवडीसाठी शेतकरी तयार आहेत. एकूणच रेशीम लागवडीकडे शेतकरी वळत आहे.रेशीम धाग्याला मोठी मागणीजागतिक बजारात रेशीम धाग्याला मोठी मागणी आहे. यातून चांगला रोजगारही मिळू शकतो. यामुळे असे युनिट तयार करण्यासाठी शेतकरी आता पुढे येत आहेत. यातून शेतकऱ्यांना कोषापेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे.रेशीम उत्पादनात जिल्ह्याला मोठी संधी आहे. यामुळे जिल्हा २०० एकरवरून दोन हजार एकरकडे वाटचाल करीत आहे. पुढील काळात हे क्षेत्र वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती