शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Maharashtra Election 2019 ; ‘गुन्हेगारीला राजकीय पाठबळ’ हाच यवतमाळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही काँग्रेसच्या उमेदवाराने दिली आहे. तर भाजप हे मुद्दे दुर्लक्षित करून पालकमंत्री म्हणून खेचून आणलेल्या विकास निधीवर जोर देताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर आणि शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात तिरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत.भाजप यवतमाळ शहरासाठी कोट्यवधींचा विकास निधी आणल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक या मुद्यावर होताना दिसत नाही. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही काँग्रेसच्या उमेदवाराने दिली आहे. तर भाजप हे मुद्दे दुर्लक्षित करून पालकमंत्री म्हणून खेचून आणलेल्या विकास निधीवर जोर देताना दिसत आहे. शिवाय गुन्हेगारीच्या मुद्यावर भाजपकडून पलटवारही केला जात आहे.शिवसेना बंडखोर नेमके कुणाला ‘मायनस’ करणार याबाबत तर्क लावले जात आहे. मात्र त्यातून सामाजिक मतांमध्ये फूट पडण्याचा धोका काँग्रेसला अधिक वाटतो. विकासाच्या नावाने सर्वत्र झालेले खोदकाम व त्यातून शहराचा विद्रूप झालेला चेहरा पाहता हा विकास भाजपवर बुमरँग होण्याची चिन्हे आहे.जमेच्या बाजू

मदन येरावारपालकमंत्री म्हणून यवतमाळ शहरासाठी खेचून आणलेला कोट्यवधींचा विकास निधी, ३०२ कोटींची अमृत योजना, नगरपरिषद, जिल्हा परिषदेतील सत्ता, लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला ३७ हजार मतांची आघाडी, शासकीय यंत्रणेवरील पकड, शहरी मतदारसंघ असल्याने भाजपची हक्काची मते, प्रचंड आर्थिक सुबत्ता, काश्मिरातील रद्द केलेले ३७० कलम, मोदींच्या नावाने मिळणारी मते, आमदारकीचा अनुभव.बाळासाहेब मांगुळकरजिल्हा परिषदेत दोन वेळा उपाध्यक्ष, सभापती, त्यातून जनतेची कामे करताना ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ, सर्व परिचित चेहरा, सामान्यांमध्ये असलेली आपुलकी, ग्रामीण भागात पक्षासोबतच स्वत:चे असलेले कार्यकर्त्यांचे नेटवर्क, दलित, अल्पसंख्यक, मागासवर्गीय व ओबीसींचे भक्कम पाठबळ, काँग्रेसचा नवा सामान्य चेहरा, जनतेच्या संपर्कात, काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून घेतलेल परिश्रम, जनतेची सहानुभूती.उणे बाजू

मदन येरावार

दोन उन्हाळे जाऊनही अद्याप न पोहोचलेले बेंबळाचे पाणी, विकासाच्या नावाने शहरभर सर्वत्र झालेले खोदकाम, त्यातून विद्रूप झालेले शहर, ठिकठिकाणी उखडलेले रस्ते, अवती-भोवती गुन्हेगारी जगतातील सदस्यांचा वावर, त्यांना सातत्याने दिले जाणारे राजकीय पाठबळ, त्यातून निर्माण झालेली जनतेची नाराजी, बिघडलेली प्रतिमा, दबावामुळे शासकीय यंत्रणेची नाराजी, जुन्या निष्ठावंत, प्रतिष्ठीतांनी साधलेला दुरावा.बाळासाहेब मांगुळकरजनतेच्या मनातील चेहरा असला तरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत, लोकवर्गणी करण्याची वेळ, तब्बल २३ वर्षानंतर विधानसभेच्या आखाड्यात, शिवसेनेच्या बंडखोरामुळे सामाजिक मतांमध्ये होणारे विभाजन, आर्थिक दृष्ट्या भक्कम असलेल्या उमेदवाराचे आव्हान, आघाडीत अद्यापही दिसत नसलेली एकजूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख गटाचा विरोधी सूर, त्यांची भाजपशी असलेली जवळीक, अल्पसंख्यकांमधील किंचित फूट.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ