शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; ‘गुन्हेगारीला राजकीय पाठबळ’ हाच यवतमाळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही काँग्रेसच्या उमेदवाराने दिली आहे. तर भाजप हे मुद्दे दुर्लक्षित करून पालकमंत्री म्हणून खेचून आणलेल्या विकास निधीवर जोर देताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर आणि शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात तिरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत.भाजप यवतमाळ शहरासाठी कोट्यवधींचा विकास निधी आणल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक या मुद्यावर होताना दिसत नाही. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही काँग्रेसच्या उमेदवाराने दिली आहे. तर भाजप हे मुद्दे दुर्लक्षित करून पालकमंत्री म्हणून खेचून आणलेल्या विकास निधीवर जोर देताना दिसत आहे. शिवाय गुन्हेगारीच्या मुद्यावर भाजपकडून पलटवारही केला जात आहे.शिवसेना बंडखोर नेमके कुणाला ‘मायनस’ करणार याबाबत तर्क लावले जात आहे. मात्र त्यातून सामाजिक मतांमध्ये फूट पडण्याचा धोका काँग्रेसला अधिक वाटतो. विकासाच्या नावाने सर्वत्र झालेले खोदकाम व त्यातून शहराचा विद्रूप झालेला चेहरा पाहता हा विकास भाजपवर बुमरँग होण्याची चिन्हे आहे.जमेच्या बाजू

मदन येरावारपालकमंत्री म्हणून यवतमाळ शहरासाठी खेचून आणलेला कोट्यवधींचा विकास निधी, ३०२ कोटींची अमृत योजना, नगरपरिषद, जिल्हा परिषदेतील सत्ता, लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला ३७ हजार मतांची आघाडी, शासकीय यंत्रणेवरील पकड, शहरी मतदारसंघ असल्याने भाजपची हक्काची मते, प्रचंड आर्थिक सुबत्ता, काश्मिरातील रद्द केलेले ३७० कलम, मोदींच्या नावाने मिळणारी मते, आमदारकीचा अनुभव.बाळासाहेब मांगुळकरजिल्हा परिषदेत दोन वेळा उपाध्यक्ष, सभापती, त्यातून जनतेची कामे करताना ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ, सर्व परिचित चेहरा, सामान्यांमध्ये असलेली आपुलकी, ग्रामीण भागात पक्षासोबतच स्वत:चे असलेले कार्यकर्त्यांचे नेटवर्क, दलित, अल्पसंख्यक, मागासवर्गीय व ओबीसींचे भक्कम पाठबळ, काँग्रेसचा नवा सामान्य चेहरा, जनतेच्या संपर्कात, काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून घेतलेल परिश्रम, जनतेची सहानुभूती.उणे बाजू

मदन येरावार

दोन उन्हाळे जाऊनही अद्याप न पोहोचलेले बेंबळाचे पाणी, विकासाच्या नावाने शहरभर सर्वत्र झालेले खोदकाम, त्यातून विद्रूप झालेले शहर, ठिकठिकाणी उखडलेले रस्ते, अवती-भोवती गुन्हेगारी जगतातील सदस्यांचा वावर, त्यांना सातत्याने दिले जाणारे राजकीय पाठबळ, त्यातून निर्माण झालेली जनतेची नाराजी, बिघडलेली प्रतिमा, दबावामुळे शासकीय यंत्रणेची नाराजी, जुन्या निष्ठावंत, प्रतिष्ठीतांनी साधलेला दुरावा.बाळासाहेब मांगुळकरजनतेच्या मनातील चेहरा असला तरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत, लोकवर्गणी करण्याची वेळ, तब्बल २३ वर्षानंतर विधानसभेच्या आखाड्यात, शिवसेनेच्या बंडखोरामुळे सामाजिक मतांमध्ये होणारे विभाजन, आर्थिक दृष्ट्या भक्कम असलेल्या उमेदवाराचे आव्हान, आघाडीत अद्यापही दिसत नसलेली एकजूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख गटाचा विरोधी सूर, त्यांची भाजपशी असलेली जवळीक, अल्पसंख्यकांमधील किंचित फूट.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ