शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Election 2019 ; यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार २२५३ मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

सुरुवातीला काँग्रेसकडे लीड होता. नंतर हळूहळू भाजपाच्या बाजूने जनमताचा कौल जात असल्याचे मतमोजणीतून पुढे आले. पोस्टल मतदानापैकी ८७९ मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, तर ५०८ मते भाजपचे मदन येरावार यांना आहे. याशिवाय अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे यांनी ३८ हजार ३४५ मते घेतली. निवडणूक मतमोजणी दरम्यान पाच इव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या.

ठळक मुद्देअधिकृत घोषणेची रात्री उशिरापर्यंत करावी लागली प्रतीक्षा : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, फेरमतमोजणीची मागणी

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप उमेदवारात थेट लढत झाली. भाजपचे विद्यमान मंत्री मदन येरावार यांना काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी जोरदार टक्कर दिली. मतमोजणीच्या २६ व्या फेरीपर्यंत मांगुळकर यांचे मताधिक्य कायम होते. मात्र नंतर मदन येरावार यांनी कमबॅक करत काँग्रेसचा लीड भरून काढत आघाडी घेतली. ३० फेऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा येरावार यांच्याकडे दोन हजार २५३ मतांची आघाडी होती. निवडणूक निकालाबाबत अधिकृत घोषणा रात्री उशिरापर्यंत झाली नाही.मतमोजणीच्या ३० फेऱ्या झाल्या. त्यामध्ये सुरुवातीला काँग्रेसकडे लीड होता. नंतर हळूहळू भाजपाच्या बाजूने जनमताचा कौल जात असल्याचे मतमोजणीतून पुढे आले. पोस्टल मतदानापैकी ८७९ मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, तर ५०८ मते भाजपचे मदन येरावार यांना आहे. याशिवाय अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे यांनी ३८ हजार ३४५ मते घेतली.निवडणूक मतमोजणी दरम्यान पाच इव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. त्याची मतमोजणी स्वतंत्ररित्या घेण्यात आली. यामध्ये कोण्या उमेदवाराला किती मते मिळाली हे जाहीर करण्यात आले नाही. याउपरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सर्वच प्रमुख चौकात आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. काही ठिकाणी ढोलताशे वाजवून विजयाचा मनमुराद आनंद घेण्यात आला. निकालाबाबत अधिकृत घोषणा वृत्त लिहिपर्यंत झाली नव्हती.विजयाची तीन कारणे...1भाजपा उमेदवाराला ग्रामीण भागातून विशेष करून बोरीअरब, अकोलाबाजार या परिसरातून मोठ्या प्रमाणात साथ मिळाली. त्यामुळेच काँग्रेसचे मताधिक्य पुढे कमी झाले.2मतदारसंघातील विकास कामांचा मुद्दा पुढे करून ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्या, असे भावनिक आवाहन भाजपने केले होते.3काँग्रेसला पारंपरिक मते भाजपला जाण्यापासून रोखण्यात अपयश आले. त्यामुळे शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर भाजप उमेदवाराने मते घेतली.विकासाकरिता सदैव तत्परयवतमाळकरांनी मला पुन्हा दिलेल्या संधीचा पुरेपूर वापर करत विकास कामे पूर्णत्वास नेण्यावर भर दिला जाईल. हा विजय जनसामान्यांसह कार्यकर्त्यांचा आणि पक्षातील ध्येय धोरणाचा आहे.- मदन येरावार, भाजपजनतेचा प्रचंड मतांचा आशीर्वादजनतेने एक लाख ३६ हजार मतांचा प्रचंड आशीर्वाद दिला आहे. चौथ्यांदा सेवक म्हणून माझी निवड केली आहे. समाजसेवेचं व्रत घेऊन वाटचाल करत आलो. मतदारसंघाच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करणार.- संजय राठोड, शिवसेनासर्वसामान्य जनतेचा विजयपाच वर्षात विकासाची अनेक कामे केलीत. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. सर्वांसोबत प्रेम आणि आपुलकीची वागणूक होती. मंत्री असलो तरी कधी मंत्रिपदाचा आव आणला नाही. त्यामुळे हा विजय जनतेचा आहे.- डॉ.अशोक उईके, भाजपपराभवाचे चिंतन करूकाँगे्रस कार्यकर्त्याने निवडणुकीत विजयासाठी खूप परिश्रम घेतले. पाच जागांपैकी काही जागा अतिशय कमी फरकाने गेल्या. विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पराभवाच्या कारणांचे विवेचन करण्यात येईल.- आमदार डॉ. वजाहत मिर्झा, काँग्रेस जिल्हाध्यक्षअगदी थोड्या फरकाने पराभवकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुसदची जागा कायम राखली. मात्र यवतमाळ, आर्णी, उमरखेड, वणी येथे कमी मताने पराभव झाला. जनमताचा कौल सत्तेविरोधातच आहे. वेळेवरच्या समीकरणाने मतांचे विभाजन झाले.- आमदार ख्वाजा बेग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसजिल्ह्यातील शेतकरी भाजपसोबतइतर जिल्ह्याप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी रोष प्रगट केला नाही. ते भाजपसोबतच राहिले. आता त्यांना भाजपने न्याय द्यावा. पालकमंत्र्यांना चांगला निरोप मतदारांनी दिला आहे. स्वभाव बदलवून ते विनम्रता अंगिकारतील अशी अपेक्षा आहे.- किशोर तिवारी, शेतकरी नेते

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ