शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

Maharashtra Election 2019 ; बंडखोरांच्या माघारीसाठी युतीत ‘सशर्त’ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:21 IST

दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसेनेपुढे खरी डोकेदुखी ठरली ती माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची बंडखोरी.

ठळक मुद्देसंडे अँकर । दिग्रसमध्ये भाजपची माघार असेल तरच यवतमाळ, उमरखेड, आर्णी, वणीत शिवसेनेचा ‘विड्रॉल’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असली तरी पाच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांच्या भूमिकेवर युतीच्या उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. तुम्ही दिग्रसमध्ये माघार घ्याल तरच आम्ही यवतमाळ, आर्णी, वणी व उमरखेड विधानसभा मतदारसंघात माघार घेऊ असा सशर्त प्रस्ताव शिवसेनेने भाजपकडे ठेवल्याची माहिती आहे.दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसेनेपुढे खरी डोकेदुखी ठरली ती माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची बंडखोरी. देशमुख रिंगणात असल्यास युतीला मिळणाऱ्या मतांचे विभाजन निश्चित आहे. देशमुख यांनीही शिवसेनेच्याच बरोबरीने नामांकनाच्या वेळी शक्तीप्रदर्शन करताना गर्दी जमविली होती. या गर्दीने शिवसैनिकांच्या हृदयाचे ठोके वाढविले आहे. मतदारसंघातील राजकारण देशमुखांच्या भोवती केंद्रीत होण्याचे व राठोड विरोधकांची त्यांना साथ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संजय राठोड यांनी आधी भाजप बंडखोर संजय देशमुख यांची उमेदवारी मागे घ्या असा जोरदार आग्रह जिल्हा व राज्याच्या भाजप श्रेष्ठींपुढे ठेवला आहे. देशमुखांनी माघार घेतली तरच शिवसेनेतील बंडखोरी मागे घेता येईल, असा तडजोडीचा प्रस्ताव ठेवला गेला. वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, सुनील कातकडे, आर्णीत नयना शैलेश ठाकूर, अमोल मंगाम, यवतमाळ मतदारसंघात संपर्क प्रमुख संतोष ढवळे, नगरसेवक गजानन इंगोले तर उमरखेड मतदारसंघात डॉ. विश्वनाथ विणकरे, निर्मला विणकरे यांनी बंडखोरी केली. या बंडखोरांमुळे भाजपच्या चार जागा वांद्यात येऊ शकतात. त्या तुलनेत सेनेला एकाच जागेवर आणि तेही मतांची आघाडी कमी होण्यापुरतेच नुकसान होऊ शकते, असा राजकीय अंदाज आहे.शिवसेनेचा प्रस्ताव असला तरी भाजप व सेनेतील बंडखोर खरोखरच माघार घेतील का, याबाबत साशंकता आहे. कारण संजय देशमुख भाजप बंडखोर मानले जात असले तरी त्यांनी अपक्ष राहून पर्यायी आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न चालविला होता. त्यामुळे त्यांनी भाजप सोडल्यात जमा असल्याचे मानले जाते. पर्यायाने भाजप श्रेष्ठींचे ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच ते रिंगणात कायम राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे. अशीच स्थिती यवतमाळ, आर्णी व उमरखेड मतदारसंघात आहे. संतोष ढवळे, नयना ठाकूर, विश्वनाथ विणकरे यांचा निर्धार पक्का असल्याने ते माघार घेण्याची चिन्हे नाहीत. सेनेतील या असंतुष्टांना मुंबईतून मूकसंमती तर नाही ना अशीही शंका व्यक्त होते.एक लाख मतांच्या आघाडीचे काय ?दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २०१४ च्या निवडणुकीत राज्यात दुसºया क्रमांकाची सर्वाधिक ८० हजार मतांची आघाडी घेतली होती. पहिल्या क्रमांकाची आघाडी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत संजय राठोड यांनी मतांची ही आघाडी एक लाखांवर नेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. परंतु भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या उमेदवारीने राठोड यांचे स्वप्न भंगणार तर नाही ना याची हूरहूर पहायला मिळते.वणीत सेनेची बंडखोरी भाजपच्या फायद्याचीजिल्ह्यात पुसद व राळेगाव वगळता पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी आहे. या बंडखोरांना बसविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. ही बंडखोरी पक्षाच्या उमेदवारासाठी कशी नुकसानकारक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न अधिकृत उमेदवारांकडून श्रेष्ठींकडे केला जात असताना वणी मतदारसंघ मात्र याला अपवाद ठरला आहे. तेथे शिवसेनेचे विश्वास नांदेकर व सुनील कातकडे यांनी युतीत असतानाही केलेली बंडखोरी भाजपसाठी फलदायी ठरणार असल्याचा भाजप उमेदवाराच्या समर्थकांचा युक्तीवाद आहे.

टॅग्स :digras-acदिग्रासYavatmalयवतमाळ