शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra Election 2019 ; बंडखोरांच्या माघारीसाठी युतीत ‘सशर्त’ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:21 IST

दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसेनेपुढे खरी डोकेदुखी ठरली ती माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची बंडखोरी.

ठळक मुद्देसंडे अँकर । दिग्रसमध्ये भाजपची माघार असेल तरच यवतमाळ, उमरखेड, आर्णी, वणीत शिवसेनेचा ‘विड्रॉल’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असली तरी पाच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांच्या भूमिकेवर युतीच्या उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. तुम्ही दिग्रसमध्ये माघार घ्याल तरच आम्ही यवतमाळ, आर्णी, वणी व उमरखेड विधानसभा मतदारसंघात माघार घेऊ असा सशर्त प्रस्ताव शिवसेनेने भाजपकडे ठेवल्याची माहिती आहे.दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसेनेपुढे खरी डोकेदुखी ठरली ती माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची बंडखोरी. देशमुख रिंगणात असल्यास युतीला मिळणाऱ्या मतांचे विभाजन निश्चित आहे. देशमुख यांनीही शिवसेनेच्याच बरोबरीने नामांकनाच्या वेळी शक्तीप्रदर्शन करताना गर्दी जमविली होती. या गर्दीने शिवसैनिकांच्या हृदयाचे ठोके वाढविले आहे. मतदारसंघातील राजकारण देशमुखांच्या भोवती केंद्रीत होण्याचे व राठोड विरोधकांची त्यांना साथ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संजय राठोड यांनी आधी भाजप बंडखोर संजय देशमुख यांची उमेदवारी मागे घ्या असा जोरदार आग्रह जिल्हा व राज्याच्या भाजप श्रेष्ठींपुढे ठेवला आहे. देशमुखांनी माघार घेतली तरच शिवसेनेतील बंडखोरी मागे घेता येईल, असा तडजोडीचा प्रस्ताव ठेवला गेला. वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, सुनील कातकडे, आर्णीत नयना शैलेश ठाकूर, अमोल मंगाम, यवतमाळ मतदारसंघात संपर्क प्रमुख संतोष ढवळे, नगरसेवक गजानन इंगोले तर उमरखेड मतदारसंघात डॉ. विश्वनाथ विणकरे, निर्मला विणकरे यांनी बंडखोरी केली. या बंडखोरांमुळे भाजपच्या चार जागा वांद्यात येऊ शकतात. त्या तुलनेत सेनेला एकाच जागेवर आणि तेही मतांची आघाडी कमी होण्यापुरतेच नुकसान होऊ शकते, असा राजकीय अंदाज आहे.शिवसेनेचा प्रस्ताव असला तरी भाजप व सेनेतील बंडखोर खरोखरच माघार घेतील का, याबाबत साशंकता आहे. कारण संजय देशमुख भाजप बंडखोर मानले जात असले तरी त्यांनी अपक्ष राहून पर्यायी आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न चालविला होता. त्यामुळे त्यांनी भाजप सोडल्यात जमा असल्याचे मानले जाते. पर्यायाने भाजप श्रेष्ठींचे ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच ते रिंगणात कायम राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे. अशीच स्थिती यवतमाळ, आर्णी व उमरखेड मतदारसंघात आहे. संतोष ढवळे, नयना ठाकूर, विश्वनाथ विणकरे यांचा निर्धार पक्का असल्याने ते माघार घेण्याची चिन्हे नाहीत. सेनेतील या असंतुष्टांना मुंबईतून मूकसंमती तर नाही ना अशीही शंका व्यक्त होते.एक लाख मतांच्या आघाडीचे काय ?दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २०१४ च्या निवडणुकीत राज्यात दुसºया क्रमांकाची सर्वाधिक ८० हजार मतांची आघाडी घेतली होती. पहिल्या क्रमांकाची आघाडी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत संजय राठोड यांनी मतांची ही आघाडी एक लाखांवर नेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. परंतु भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या उमेदवारीने राठोड यांचे स्वप्न भंगणार तर नाही ना याची हूरहूर पहायला मिळते.वणीत सेनेची बंडखोरी भाजपच्या फायद्याचीजिल्ह्यात पुसद व राळेगाव वगळता पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी आहे. या बंडखोरांना बसविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. ही बंडखोरी पक्षाच्या उमेदवारासाठी कशी नुकसानकारक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न अधिकृत उमेदवारांकडून श्रेष्ठींकडे केला जात असताना वणी मतदारसंघ मात्र याला अपवाद ठरला आहे. तेथे शिवसेनेचे विश्वास नांदेकर व सुनील कातकडे यांनी युतीत असतानाही केलेली बंडखोरी भाजपसाठी फलदायी ठरणार असल्याचा भाजप उमेदवाराच्या समर्थकांचा युक्तीवाद आहे.

टॅग्स :digras-acदिग्रासYavatmalयवतमाळ