शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पेरणीच्या तोंडावर महाबीजचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

खासगी कंपन्यांच्या तुलनेत शासकीय कंपनी असलेल्या महाबीज कंपनीकडून जाहीर होणाऱ्या दरावरच इतर बियाण्याचे दर ठरतात. यावर्षी महाबीजचा बियाण्याचा दर ३६०० रुपये बॅग आहे. तर खासगी कंपन्यांचा दर चार हजार ते साडेचार हजार दर आहे. ३० किलो बियाण्यांसाठी इतके मोठे दर कंपन्या आकारत आहेत. अशा परिस्थितीत महाबीजकडून शेतकऱ्यांना मोठी आशा होती. प्रत्यक्षात बाजारपेठेत बियाणे आलेच नाही. यावर्षी ११ हजार क्विंटल प्रमाणित बियाणे मिळणार असल्याचे  सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाबीज कंपनीच्या मार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून हे विशेष नियोजन आहे. कधीकाळी ३५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला मिळाले होते. यावर्षी केवळ अडीच हजार क्विंटल बियाणे महाबीजने पुरविले आहे.  कापसाच्यानंतर सर्वात मोठे पीक क्षेत्र सोयाबीनचे आहे. यासाठी अनेक कंपन्या बाजारात बियाणे वितरणासाठी उतरल्या आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, सोबतच दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळावे म्हणून महाबीज कंपनी पुढाकार घेत आहे. यावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. बीजोत्पादन कार्यक्रम आणि प्रमाणित बियाणे या माध्यमातून फार मोठे क्षेत्र महाबीजच्या बियाण्यातून कव्हर होते. खासगी कंपन्यांच्या तुलनेत शासकीय कंपनी असलेल्या महाबीज कंपनीकडून जाहीर होणाऱ्या दरावरच इतर बियाण्याचे दर ठरतात. यावर्षी महाबीजचा बियाण्याचा दर ३६०० रुपये बॅग आहे. तर खासगी कंपन्यांचा दर चार हजार ते साडेचार हजार दर आहे. ३० किलो बियाण्यांसाठी इतके मोठे दर कंपन्या आकारत आहेत. अशा परिस्थितीत महाबीजकडून शेतकऱ्यांना मोठी आशा होती. प्रत्यक्षात बाजारपेठेत बियाणे आलेच नाही. यावर्षी ११ हजार क्विंटल प्रमाणित बियाणे मिळणार असल्याचे  सांगण्यात आले. प्रत्यक्षात पाच हजार क्विंटल बियाणे यवतमाळ जिल्ह्याला मिळणार आहे. यातही अडीच हजार क्विंटल बियाणेच जिल्ह्यात दाखल झाले आहे. यातून महाबीज कंपनी कार्यालयात  येणारा प्रत्येक शेतकरी बीजोत्पादनासाठी थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्हाला बियाणे हवे होते, असे सांगत आहे; मात्र वरूनच प्रोग्राम नसल्याने आम्ही असमर्थ आहोत, असे उत्तर  ऐकायला मिळत आहे.  गतवर्षी १२ हजार क्विंटल बियाणे मिळाले होते. २०१९ मध्ये २७ हजार क्विंटल बियाणे मिळाले. त्याच्या आधी ३५ हजार क्विंटल बियाणे मिळाले; मात्र यंदाच महाबीजने बियाण्याचा कोटा यवतमाळसाठी कमी का केला, हा संशोधनाचा विषय आहे. 

शेतकरी आत्महत्यग्रस्त जिल्ह्यात चिंता वाढली- शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला अनुदानावर बियाणे देणाऱ्या महाबीज कंपनीने अचानक हा पवित्रा का घेतला, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या जिल्ह्यावर  मेहेरनजर असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याच्या वाट्याला फार कमी बियाणे आले आहे. यामुळे  जिल्ह्यातील चिंता वाढली आहे. ३०० हेक्टरवर बीजोत्पादन- यावर्षी ३०० हेक्टरवरच बीजोत्पादन मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी २२५ क्विंटल बियाणे जिल्ह्याकडे वळते झाले आहे. बीजोत्पादन कार्यक्रमासाठी अनेक शेतकरी तत्पर आहेत; मात्र त्यांना बियाणे मिळणार नाही, असे स्पष्ट सांगितले जात आहे.  ठराविक शेतकऱ्यांनाच हे बियाणे उपलब्ध झाले आहे. नियमित कार्यक्रम राबवित असल्याने या शेतकऱ्यांना ही बियाणे मिळाली आहेत. मग नवीन शेतकऱ्यांनी हा प्रयोग करू नये का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

अतिवृष्टी आणि उन्हाची तीव्रता यामुळे बीजोत्पादनाचा कार्यक्रम कमी झाला आहे. पुरेसे बियाणे उपलब्ध नाही. जिल्ह्याला मिळणाऱ्या बियाण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडूनच नियोजन करण्यात आलेेले आहे. - अशोक ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक महाबीज, यवतमाळ.

 

टॅग्स :agricultureशेती